शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

सातारा जिल्ह्यातील ७०४ गावांमध्ये टंचाई, शासनाकडे आराखडा सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 13:31 IST

मे महिन्याला अद्याप दोन महिने बाकी असतानाच जिल्ह्यातील तब्बल ७०४ गावांमध्ये पाणी टंचाई भासत असल्याचे समोर आले असून, या गावांमध्ये तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने शासनाला नुकताच आराखडा सादर केला आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील ७०४ गावांमध्ये टंचाई, शासनाकडे आराखडा सादर सर्वाधिक कोरेगाव तर सर्वात कमी खंडाळा तालुक्याचा समावेश

सातारा : मे महिन्याला अद्याप दोन महिने बाकी असतानाच जिल्ह्यातील तब्बल ७०४ गावांमध्ये पाणी टंचाई भासत असल्याचे समोर आले असून, या गावांमध्ये तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने शासनाला नुकताच आराखडा सादर केला आहे.जिल्ह्यात दरवर्षी पाणी टंचाईचे मोठे संकट आवासून उभे राहात असते. त्यामुळे यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून खासगी टँकर आणि विहिरींचे अधिग्रहण करण्यात येते. यंदा १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यातूनही नागरिकांना पाणी टंचाईची झळ पोहोचत असेल तर टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. २८८ गावांनी टँकरची मागणी केली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात तब्बल ७०४ गावांमध्ये पाण्याची टंचाई भासत असल्याचे जिल्हा परिषदेने केलेल्या सर्र्वेक्षणात निष्पन्न झाले आहे.गेल्या महिनाभरापासून हा टंचाईचा आढावा घेणे सुरू होते. यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवक, तलाठी यांच्यामार्फत मागणी अर्ज घेण्यात आले होते. आगामी जिल्हा नियोजन बैठकीत हा आराखडा मंजूर झाल्यानंतर टंचाई गावांमध्ये उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत.कोरेगाव तालुक्यातील सर्वाधिक १५४ गावांमध्ये तर सर्वात कमी खंडाळा तालुक्यात केवळ १२ गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती आहे. पाण्याच्या टंचाईचा आराखडा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तयार केला असून, हा आराखडा नुकताच शासनाला सादरही करण्यात आला आहे.

पाणी टंचाई भासणारी गावेमाण-९३, खटाव-१०३, कोरेगाव-१५४, खंडाळा-१२, फलटण-५७, वाई-४३, पाटण-२७, जावळी-३६, महाबळेश्वर-५१, सातारा-३२, कऱ्हाडमधील ९६ गावांचा पाणी टंचाईमध्ये समावेश आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीzpजिल्हा परिषद