शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

सातारा जिल्ह्यात ऊस गाळप वेगात, उताऱ्यात घट 

By दीपक शिंदे | Updated: February 1, 2024 15:39 IST

पिंपोडे बुद्रूक : जिल्ह्यात गेले अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या ९ सहकारी व ६ खासगी मिळून १६ कारखान्यांकडून मिळून ६० ...

पिंपोडे बुद्रूक : जिल्ह्यात गेले अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या ९ सहकारी व ६ खासगी मिळून १६ कारखान्यांकडून मिळून ६० लाख ९२ हजार ३०१ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून सरासरी ९.७७ उताऱ्यानुसार ५९ लाख ५४ हजार ३५६ क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे.चालू वर्षी अंत्यत कमी प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यात सद्य:स्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या परिसरात ऊस वाळू लागले आहेत. याचा परिणाम साखर उताऱ्यावर झाल्याचे दिसून येत आहेत. जिल्ह्यात साखर उताऱ्यात खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी साखर कारखाने आघाडीवर आहेत. सहकारी नऊ कारखान्यांनी आतापर्यंत ३१ लाख ११ हजार १६० टन उसाचे गाळप करत ३३ लाख ७३ हजार ८७० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सहकारी साखर कारखान्यांना सरासरी १०.८४ टक्के साखर उतारा मिळाल्याचे अहवालावरून दिसत आहे, तर खासगी सात कारखान्यांनी आतापर्यंत २९ लाख ८१ हजार १४१ टन उसाचे गाळप करत २५ लाख ८० हजार ४८७ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. खासगी कारखान्यांना सरासरी ८.६६ टक्के उतारा पडला आहे.दरम्यान, दिवसेंदिवस पाण्याचे संकट अधिक गडद होऊ लागल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ऊसतोडणीची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांची हीच दुखरी नस ओळखून ऊसतोड यंत्रणांकडून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याची प्रकरणे उद्भवत आहेत.

दिवसेंदिवस निर्माण होणारी पाणीटंचाईमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणीसाठी लगबग सुरू आहे. याची दखल घेत शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, अथवा गैरसोय होऊ नये याबाबत कारखान्यांकडून दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी ऊस तोडणीसाठी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. -जिवाजी मोहिते, कार्यकारी संचालक, अजिंक्यतारा कारखाना 

दिवसेंदिवस पाणी पातळीत विलक्षण घट होत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे उसाच्या वजनात घट होत आहे. ही बाब लक्षात घेऊन कारखाना व्यवस्थापनाने ऊस तोडणीसाठी पाणीटंचाई भागात प्राधान्य देण्याची गरज आहे. -शंकरराव गोडसे, कार्याध्यक्ष शेतकरी संघटना किसान मंच

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखाने