शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सातारा जिल्ह्यात ऊस गाळप वेगात, उताऱ्यात घट 

By दीपक शिंदे | Updated: February 1, 2024 15:39 IST

पिंपोडे बुद्रूक : जिल्ह्यात गेले अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या ९ सहकारी व ६ खासगी मिळून १६ कारखान्यांकडून मिळून ६० ...

पिंपोडे बुद्रूक : जिल्ह्यात गेले अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या ९ सहकारी व ६ खासगी मिळून १६ कारखान्यांकडून मिळून ६० लाख ९२ हजार ३०१ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून सरासरी ९.७७ उताऱ्यानुसार ५९ लाख ५४ हजार ३५६ क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे.चालू वर्षी अंत्यत कमी प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यात सद्य:स्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या परिसरात ऊस वाळू लागले आहेत. याचा परिणाम साखर उताऱ्यावर झाल्याचे दिसून येत आहेत. जिल्ह्यात साखर उताऱ्यात खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी साखर कारखाने आघाडीवर आहेत. सहकारी नऊ कारखान्यांनी आतापर्यंत ३१ लाख ११ हजार १६० टन उसाचे गाळप करत ३३ लाख ७३ हजार ८७० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सहकारी साखर कारखान्यांना सरासरी १०.८४ टक्के साखर उतारा मिळाल्याचे अहवालावरून दिसत आहे, तर खासगी सात कारखान्यांनी आतापर्यंत २९ लाख ८१ हजार १४१ टन उसाचे गाळप करत २५ लाख ८० हजार ४८७ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. खासगी कारखान्यांना सरासरी ८.६६ टक्के उतारा पडला आहे.दरम्यान, दिवसेंदिवस पाण्याचे संकट अधिक गडद होऊ लागल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ऊसतोडणीची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांची हीच दुखरी नस ओळखून ऊसतोड यंत्रणांकडून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याची प्रकरणे उद्भवत आहेत.

दिवसेंदिवस निर्माण होणारी पाणीटंचाईमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणीसाठी लगबग सुरू आहे. याची दखल घेत शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, अथवा गैरसोय होऊ नये याबाबत कारखान्यांकडून दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी ऊस तोडणीसाठी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. -जिवाजी मोहिते, कार्यकारी संचालक, अजिंक्यतारा कारखाना 

दिवसेंदिवस पाणी पातळीत विलक्षण घट होत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे उसाच्या वजनात घट होत आहे. ही बाब लक्षात घेऊन कारखाना व्यवस्थापनाने ऊस तोडणीसाठी पाणीटंचाई भागात प्राधान्य देण्याची गरज आहे. -शंकरराव गोडसे, कार्याध्यक्ष शेतकरी संघटना किसान मंच

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखाने