शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

डरकाळीची ६ वर्षे!

By admin | Updated: January 5, 2016 00:39 IST

वीस गावांचे भाग्य उजळले

राजीव मुळ्ये ल्ल साताराएकाच भूभागावरील तीन वेगवेगळी स्थलांतरे अनुभवलेल्या कोयना अभयारण्यातील गावांपैकी वीस गावे शामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेद्वारे पर्यावरणपूरक विकासाच्या उंंबरठ्याशी उभी आहेत. या गावांच्या विकासाचे सूक्ष्म आराखडे तयार झाले असून, केंद्राच्या शामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेमधून वीस गावांसाठी दहा कोटींचा एकत्रित निधी आणि इतर विभागांच्या समायोजनातून होणारी कामे यातून वर्षानुवर्षाचे स्थलांतर थांबणार आहे.कोयना धरण आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यामुळे येथील गावांचे दोनदा विस्थापन झाले. तिसरे विस्थापन परिस्थितीजन्य कारणातून कायम होत राहिले. गावागावात फक्त पन्नाशी ओलांडलेली माणसे दिसतात; कारण कमावते हात मुंबईत आहेत. दळणवळणाची सोय नाही. हे रोखण्यासाठी आणि बफर झोनमध्येच राहून उपजीविकेची साधने मिळण्यासाठी वन्यजीव विभाग आणि ‘ड्रोंगो’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत ‘वन-जन जोडो’ अभियान आॅगस्ट २०१४ मध्ये सुरू झाले. या अभियानातील आराखड्यांनुसार विकासासाठी ज्या योजनेतून निधी उपलब्ध झाला, तिचे नावही डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजना असे आहे. एक आॅक्टोबर २०१४ पासून कांदाटी खोऱ्यातील पाच गावे निवडून ‘वन-जन जोडो’ अभियानाचा प्रारंभ झाला होता. पारंपरिक नाचणी आणि भात पिकांव्यतिरिक्त कंदवर्गीय पिके आणि फरसबीसारखी पिके या भागात जोमाने येऊ शकतात. मसाल्याची झाडेही बहरू शकतात. शेततळी केल्यास शेतीपाण्याचा प्रश्न सुटून मत्स्यशेतीही करता येऊ शकते. ‘होम स्टे’सारख्या योजना राबवून रोजगारनिर्मिती करता येऊ शकते, पापड-लोणचीसारखे पदार्थ बनविणारे गृहोद्योग महिला करू शकतात, बांधावर येणारी वनौषधी-सुगंधी वनस्पती पैसा मिळवून देऊ शकते, हे हेरून विविधांगी उपायांची आखणी तेव्हाच झाली. आॅगस्ट २०१४ मध्ये मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांनी स्थानिक सल्लागार समितीसमोर केलेल्या सादरीकरणाला मूर्त रूप येण्याची चिन्हे दिसू लागली. तथापि, कृषी विभाग, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग अशा विभागांकडून कसा आणि किती निधी मिळणार, स्थानिक विकास आराखड्यातून किती मिळणार, अशी चिंताही सोबत आली.हा प्रश्न केंद्राच्या शामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेने सोडविला. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावाला पन्नास लाख याप्रमाणे वीस कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. 

सर्व विभागांचे सहकार्यजिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर विभागांनीही कोयनेतील सह्याद्रिपुत्रांकडे आता लक्ष वळविले आहे. रस्त्यांचे आराखडे तयार केले असून, वन्यजीव विभागाने रस्त्यांची शिफारसही दिली आहे. लवकरच रस्त्यांची कामे या विभागांकडून सुरू होतील. कृषी विभागाने शेततळ्यांसाठी पुढाकार घेतला असून, पशुसंवर्धन विभागांचे अधिकारीही या दुर्गम भागाला भेटी देत आहेत. ग्रामसभेच्या मंजुऱ्या घेऊन स्थानिक परिस्थितिकीय विकास समिती (व्हिलेज ईको डेव्हलपमेन्ट) कमिटी ही स्थानिकांची समितीच ही कामे करणार आहे. या प्रक्रियेचा प्रारंभ २०१४ मध्ये झाला तेव्हा ‘लोकमत’ने ‘सह्याद्रिपुत्रांचा एल्गार’ या मालिकेद्वारे ७ भागांत प्रसिद्ध केलेले हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे.  

व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील प्रत्येक गावाची पूर्ण माहिती सततच्या भेटींमुळे पूर्वीपासून होतीच. त्यातूनच सर्वांगीण विकासाचा बृहत आराखडा स्थानिक सल्लागार समितीमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. त्यानंतर सूक्ष्म आराखड्यांच्या आखणीला सुरुवात झाली. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतरही प्रत्यक्ष आराखडे तयार करण्याचे काम दीड वर्षाहून अधिक काळ चालले.- सुनील भोईटे, मानद वन्यजीवरक्षक