शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

दुसऱ्यांना फसवलं, स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं; सातारा जिल्ह्यात आरोपींची ५९ कोटींची मालमत्ता होणार जप्त

By दत्ता यादव | Updated: February 28, 2025 13:14 IST

सातारा : कोणी सेवानिवृत्त होऊन आयुष्याची पुंजी पतसंस्थेत ठेवली, तर कोणी सहकारी बँकेत गुंतवली. उतारवयात उपयोगाला येणारी ही पुंजी ...

सातारा : कोणी सेवानिवृत्त होऊन आयुष्याची पुंजी पतसंस्थेत ठेवली, तर कोणी सहकारी बँकेत गुंतवली. उतारवयात उपयोगाला येणारी ही पुंजी भ्रष्ट्र लोकांनी मात्र गिळंकृत केली. ज्यांनी दुसऱ्यांना फसवलं. त्यांनीच स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं. अशा आरोपींची ५९ कोटी ५७ लाखांची मालमत्ता आता जप्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा ठेवीदारांसाठी आशेचा किरण आहे.आर्थिक फसवणुकीचे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. पतसंस्था, सहकारी बँका, बचत गट, शेअर मार्केट अशा संस्थांमध्ये पैसे गुंतवून अनेकांवर पश्चातापाची वेळ आली आहे. अनेक बँका, पतसंस्था बंद पडल्या. त्यामध्ये गुंतवलेले पैसे मात्र, परत मिळविण्यासाठी ठेवीदारांना शासनदरबारी हेलपाटे मारावे लागतात. अशा अपहार प्रकरणातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यापासून पैसे वसूल करण्यापर्यंतची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ आहे. पोलिस मुख्यालयाशेजारी असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचे तपास सोपविण्यात आले आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही आरोपींच्या अटकेपासून त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रियेपर्यंत शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. वाई येथील हरिहरेश्वर बँकेतील ठेवीदारांना तब्बल ६० कोटी रुपये परत मिळवून देण्यात या शाखेचा मोठा वाटा आहे. आरोपींची मालमत्ता जप्त करताना अनेक अडचणी येतात. त्यांच्या मालमत्तेची खरी कागदपत्रे जमा करणे, मालमत्ता कोणत्या ठिकाणी आहेत, याचा शोध घेणे. कोणत्या मालमत्तेवर किती कर्ज आहे, याची सारी माहिती घेऊन नंतर आरोपीला अटक केली जाते. केवळ अटक होऊनही तातडीने आरोपींकडून रिकव्हरी होत नाही.अटक झाल्यानंतर आरोपींकडून फार फार तर त्याच्या छुप्या मालमत्तेची माहिती मिळते. त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी बराच कालावधी लागतो. प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून मालमत्तेच्या लिलावासाठी मंजुरी घेतली जाते. या मंजुरीनंतर आरोपीच्या मालमत्तेचा लिलाव केला जातो. त्यानंतरच ज्यांची फसवणूक झाली आहे. त्यांना त्यांची रक्कम परत दिली जाते. सध्या अशा प्रकारे आर्थिक गुन्हे शाखेने ८ प्रस्ताव पाठविले आहेत. या प्रस्तावांमधील ५९ कोटी ५७ लाखांची आरोपींची मालमत्ता जप्त होणार आहे.

३८ पैकी २४ गुन्ह्यांचा तपास पूर्णसातारा जिल्ह्यात गत दहा वर्षांत आर्थिक फसवणुकीचे ३८ गुन्हे घडले आहेत. यातील २४ गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून पूर्ण झाला आहे. अद्याप १४ गुन्ह्यांचा तपास बाकी आहे. याचे कारण अपुरे मनुष्यबळ हे आहे. पूर्वी आर्थिक गुन्हे शाखेत २१ अधिकारी व कर्मचारी होते. सध्या या शाखेत केवळ सहाजण आहे.

आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया किचकट आहे. प्रस्तावात कोणतीही त्रुटी राहू नये, याची काळजी घेणे गरजेचे असते, असे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच आरोपींच्या मालमत्तेचा लिलाव केला जातो. - शिवाजी भोसले-सहायक पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस