शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

दुसऱ्यांना फसवलं, स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं; सातारा जिल्ह्यात आरोपींची ५९ कोटींची मालमत्ता होणार जप्त

By दत्ता यादव | Updated: February 28, 2025 13:14 IST

सातारा : कोणी सेवानिवृत्त होऊन आयुष्याची पुंजी पतसंस्थेत ठेवली, तर कोणी सहकारी बँकेत गुंतवली. उतारवयात उपयोगाला येणारी ही पुंजी ...

सातारा : कोणी सेवानिवृत्त होऊन आयुष्याची पुंजी पतसंस्थेत ठेवली, तर कोणी सहकारी बँकेत गुंतवली. उतारवयात उपयोगाला येणारी ही पुंजी भ्रष्ट्र लोकांनी मात्र गिळंकृत केली. ज्यांनी दुसऱ्यांना फसवलं. त्यांनीच स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं. अशा आरोपींची ५९ कोटी ५७ लाखांची मालमत्ता आता जप्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा ठेवीदारांसाठी आशेचा किरण आहे.आर्थिक फसवणुकीचे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. पतसंस्था, सहकारी बँका, बचत गट, शेअर मार्केट अशा संस्थांमध्ये पैसे गुंतवून अनेकांवर पश्चातापाची वेळ आली आहे. अनेक बँका, पतसंस्था बंद पडल्या. त्यामध्ये गुंतवलेले पैसे मात्र, परत मिळविण्यासाठी ठेवीदारांना शासनदरबारी हेलपाटे मारावे लागतात. अशा अपहार प्रकरणातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यापासून पैसे वसूल करण्यापर्यंतची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ आहे. पोलिस मुख्यालयाशेजारी असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचे तपास सोपविण्यात आले आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही आरोपींच्या अटकेपासून त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रियेपर्यंत शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. वाई येथील हरिहरेश्वर बँकेतील ठेवीदारांना तब्बल ६० कोटी रुपये परत मिळवून देण्यात या शाखेचा मोठा वाटा आहे. आरोपींची मालमत्ता जप्त करताना अनेक अडचणी येतात. त्यांच्या मालमत्तेची खरी कागदपत्रे जमा करणे, मालमत्ता कोणत्या ठिकाणी आहेत, याचा शोध घेणे. कोणत्या मालमत्तेवर किती कर्ज आहे, याची सारी माहिती घेऊन नंतर आरोपीला अटक केली जाते. केवळ अटक होऊनही तातडीने आरोपींकडून रिकव्हरी होत नाही.अटक झाल्यानंतर आरोपींकडून फार फार तर त्याच्या छुप्या मालमत्तेची माहिती मिळते. त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी बराच कालावधी लागतो. प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून मालमत्तेच्या लिलावासाठी मंजुरी घेतली जाते. या मंजुरीनंतर आरोपीच्या मालमत्तेचा लिलाव केला जातो. त्यानंतरच ज्यांची फसवणूक झाली आहे. त्यांना त्यांची रक्कम परत दिली जाते. सध्या अशा प्रकारे आर्थिक गुन्हे शाखेने ८ प्रस्ताव पाठविले आहेत. या प्रस्तावांमधील ५९ कोटी ५७ लाखांची आरोपींची मालमत्ता जप्त होणार आहे.

३८ पैकी २४ गुन्ह्यांचा तपास पूर्णसातारा जिल्ह्यात गत दहा वर्षांत आर्थिक फसवणुकीचे ३८ गुन्हे घडले आहेत. यातील २४ गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून पूर्ण झाला आहे. अद्याप १४ गुन्ह्यांचा तपास बाकी आहे. याचे कारण अपुरे मनुष्यबळ हे आहे. पूर्वी आर्थिक गुन्हे शाखेत २१ अधिकारी व कर्मचारी होते. सध्या या शाखेत केवळ सहाजण आहे.

आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया किचकट आहे. प्रस्तावात कोणतीही त्रुटी राहू नये, याची काळजी घेणे गरजेचे असते, असे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच आरोपींच्या मालमत्तेचा लिलाव केला जातो. - शिवाजी भोसले-सहायक पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस