शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांना फसवलं, स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं; सातारा जिल्ह्यात आरोपींची ५९ कोटींची मालमत्ता होणार जप्त

By दत्ता यादव | Updated: February 28, 2025 13:14 IST

सातारा : कोणी सेवानिवृत्त होऊन आयुष्याची पुंजी पतसंस्थेत ठेवली, तर कोणी सहकारी बँकेत गुंतवली. उतारवयात उपयोगाला येणारी ही पुंजी ...

सातारा : कोणी सेवानिवृत्त होऊन आयुष्याची पुंजी पतसंस्थेत ठेवली, तर कोणी सहकारी बँकेत गुंतवली. उतारवयात उपयोगाला येणारी ही पुंजी भ्रष्ट्र लोकांनी मात्र गिळंकृत केली. ज्यांनी दुसऱ्यांना फसवलं. त्यांनीच स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं. अशा आरोपींची ५९ कोटी ५७ लाखांची मालमत्ता आता जप्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा ठेवीदारांसाठी आशेचा किरण आहे.आर्थिक फसवणुकीचे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. पतसंस्था, सहकारी बँका, बचत गट, शेअर मार्केट अशा संस्थांमध्ये पैसे गुंतवून अनेकांवर पश्चातापाची वेळ आली आहे. अनेक बँका, पतसंस्था बंद पडल्या. त्यामध्ये गुंतवलेले पैसे मात्र, परत मिळविण्यासाठी ठेवीदारांना शासनदरबारी हेलपाटे मारावे लागतात. अशा अपहार प्रकरणातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यापासून पैसे वसूल करण्यापर्यंतची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ आहे. पोलिस मुख्यालयाशेजारी असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचे तपास सोपविण्यात आले आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही आरोपींच्या अटकेपासून त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रियेपर्यंत शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. वाई येथील हरिहरेश्वर बँकेतील ठेवीदारांना तब्बल ६० कोटी रुपये परत मिळवून देण्यात या शाखेचा मोठा वाटा आहे. आरोपींची मालमत्ता जप्त करताना अनेक अडचणी येतात. त्यांच्या मालमत्तेची खरी कागदपत्रे जमा करणे, मालमत्ता कोणत्या ठिकाणी आहेत, याचा शोध घेणे. कोणत्या मालमत्तेवर किती कर्ज आहे, याची सारी माहिती घेऊन नंतर आरोपीला अटक केली जाते. केवळ अटक होऊनही तातडीने आरोपींकडून रिकव्हरी होत नाही.अटक झाल्यानंतर आरोपींकडून फार फार तर त्याच्या छुप्या मालमत्तेची माहिती मिळते. त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी बराच कालावधी लागतो. प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून मालमत्तेच्या लिलावासाठी मंजुरी घेतली जाते. या मंजुरीनंतर आरोपीच्या मालमत्तेचा लिलाव केला जातो. त्यानंतरच ज्यांची फसवणूक झाली आहे. त्यांना त्यांची रक्कम परत दिली जाते. सध्या अशा प्रकारे आर्थिक गुन्हे शाखेने ८ प्रस्ताव पाठविले आहेत. या प्रस्तावांमधील ५९ कोटी ५७ लाखांची आरोपींची मालमत्ता जप्त होणार आहे.

३८ पैकी २४ गुन्ह्यांचा तपास पूर्णसातारा जिल्ह्यात गत दहा वर्षांत आर्थिक फसवणुकीचे ३८ गुन्हे घडले आहेत. यातील २४ गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून पूर्ण झाला आहे. अद्याप १४ गुन्ह्यांचा तपास बाकी आहे. याचे कारण अपुरे मनुष्यबळ हे आहे. पूर्वी आर्थिक गुन्हे शाखेत २१ अधिकारी व कर्मचारी होते. सध्या या शाखेत केवळ सहाजण आहे.

आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया किचकट आहे. प्रस्तावात कोणतीही त्रुटी राहू नये, याची काळजी घेणे गरजेचे असते, असे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच आरोपींच्या मालमत्तेचा लिलाव केला जातो. - शिवाजी भोसले-सहायक पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस