शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

पाऊस दमदार बरसला; सातारा जिल्ह्यात खरीप हंगामातील ५० टक्के पेरणी पूर्ण

By नितीन काळेल | Updated: June 26, 2024 19:15 IST

पाटण तालुक्यात सर्वाधिक पेरणी

सातारा : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल होऊन दमदारही बरसला. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. जून महिना संपण्यापूर्वीच १ लाख ४५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ५० इतके झाले आहे. त्यामुळे यंदा १०० टक्के पेरणीचा अंदाज आहे. तर सध्या भात लागण, बाजरी, ज्वारी, मका पेरणीला वेग आला आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन पीक हंगाम घेण्यात येतात. यामधील सर्वात मोठा हंगाम खरीपचा असतो. यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये भाताचे सुमारे ४४ हाजर हेक्टर, ज्वारी ११ हजार, बाजरी ६० हजार ७३४ हेक्टर, मका १५ हजार, भुईमूग २९ हजार ४३५ आणि सोयाबीनचे ७४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे.तर नागली, तूर, मूग, उडीद, तीळ, कारळा, सूर्यफूलचे क्षेत्र अत्यल्प असते. यावर्षी मान्सूनचा पाऊस जून महिन्याच्या सुरुवातीलाच दाखल झाला. तसेच आतापर्यंत बहुतांशी तालुक्यात चांगले पर्जन्यमान झाले आहे. यामुळे खरीप हंगामाील पेरणीला वेग आला आहे. तरीही अनेक भागात पावसामुळे जमिनीला वापसा नाही. त्यामुळे पेरणी रखडली आहे. असे असलेतरी आतापर्यंत ५० टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे.

पश्चिम भागात पाऊस चांगला झाल्याने भात लागणीला वेग आला आहे. आतापर्यंत सुमारे १७ हजार हेक्टरवर लागण झाली. हे प्रमाण ३८ टक्के आहे. तर ज्वारीचीही पावणे चार हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. दुष्काळी तालुक्यात बाजरी हे हक्काचे पीक असते. त्यातच माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने बाजरीची आतापर्यंत ३८ टक्के पेरणी झाली. २३ हजार ३०० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. माण तालुक्यात सर्वाधिक १४ हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. यानंतर खटाव आणि खंडाळा तालुक्यात बाजरी पेरणी अधिक झाली आहे. मकेचीही ३६ टक्के पेरणी झाली आहे. सध्या साडे पाच हजार हेक्टरवर मका पेरणी आहे.पाटण तालुक्यात खरीपातील पेरणी सर्वाधिक ८० टक्के झालेली आहे. तर कऱ्हाड तालुक्यात ७१, खंडाळा ५३, सातारा ४९, कोरेगाव तालुका ४४, खटाव ४१, माण ४०, जावळी तालुका ३२, वाई २९ आणि फलटण तालुक्यात २८ टक्के पेरणी झालेली आहे. महाबळेश्वर तालुक्यात खरीपचे क्षेत्र कमी असते. तालुक्यात भात नागली, तृणधान्य, कडधान्ये घेतली जातात. सध्या तालुक्यात पेरणीचे प्रमाण शुन्य टक्के आहे.

भुईमूग ७१, सोयाबीनची ८१ टक्के पेरणी पूर्ण..जिल्ह्यात भुईमूग आणि सोयाबीन पेरणीला वेग आहे. भुईमुगाची सुमारे २१ हजार हेक्टरवर लागण झाली आहे. हे प्रमाण ७१ टक्के आहे. तर सोयाबीनची ६० हजार हेक्टरवर पेर झाली. हे प्रमाण ८१ टक्के आहे. सोयाबीनची सातारा तालुक्यात १२ हजार हेक्टर, जावळी ५ हजार २००, पाटण तालुका सुमारे १० हजार हेक्टर, कऱ्हाड १६ हजार, कोरेगाव साडे सहा हजार हेक्टर, खटाव तालुका पाच हजार तर वाई तालुक्यात साडे तीन हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र