शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

वळसे येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ५० एकर ऊस खाक, लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 19:08 IST

वाऱ्यामुळे आगीची तीव्रता खूप जोराची असल्यामुळे आणि अग्निशमन बंबास शेतामध्ये येण्यास व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे आग विझवण्यासाठी अडचणी येत होत्या.

नागठाणे : नागठाणे परिसरातील वळसे येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत गावातील जवळपास ३० शेतकऱ्यांचा ४५ ते ५० एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वळसे येथील पालेकर कंपनीचे मागील शेतातील नारगौंडी भागातील विहिरीजवळ शनिवारी दुपारी शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत जवळपास ३० शेतकऱ्यांचा ४५ ते ५० एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतू, वाऱ्यामुळे आगीची तीव्रता खूप जोराची असल्यामुळे आणि अग्निशमन बंबास शेतामध्ये येण्यास व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे आग विझवण्यासाठी अडचणी येत होत्या. यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या महिन्यातच भरतगाव येथेही काही शेतकऱ्यांचा जवळपास १५ एकर ऊस आगीत जळाला होता. ही घटना ताजी असतानाच या महिन्यात पुन्हा अशीच भीषण घटना घडली आहे. या भीषण घटनेमध्ये वळसे येथील ३० शेतकऱ्यांचे मिळून ४५ एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. जवळपास ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचे स्पष्ट झाले असल्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग