शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

शेखर गोरेंसह ५ जणांना मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:32 IST

सातारा : माण तालुक्यातील गिरिराज रिन्यूएबल्स या सौरऊर्जा कंपनीचे नुकसान करून खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोरे यांच्यासह पाचजणांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माण तालुक्यातील वरकुटे मलवडी आणि शिरताव हद्दीत गिरिराज रिन्यूएबल्स या सौरऊर्जा कंपनीचे काम सुरू ...

सातारा : माण तालुक्यातील गिरिराज रिन्यूएबल्स या सौरऊर्जा कंपनीचे नुकसान करून खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोरे यांच्यासह पाचजणांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माण तालुक्यातील वरकुटे मलवडी आणि शिरताव हद्दीत गिरिराज रिन्यूएबल्स या सौरऊर्जा कंपनीचे काम सुरू आहे. आॅक्टोबर महिन्यात काहीजणांनी कार आणि जेसीबी नेऊन ‘तुम्ही तालुक्यात काम कसे करता,’ असे म्हणत तेथील इन्व्हर्टर रूम, सिमेंट काँक्रीट केलेल्या कॉलमचे जेसीबीच्या साह्याने नुकसान केले. तसेच कंपनीकडून खंडणी म्हणून काही रक्कम मागण्यात येऊन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात खंडणी मागणे, कंपनीचे नुकसान केल्यामुळे विशाल दिलीप पट्टेबहादूर (वय २७, मूळ रा. नाशिक, सध्या रा. दहिवडी) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे शेखर भगवान गोरे (रा. बोराटवाडी, ता. माण), नगरसेवक संग्राम अनिल शेटे (वय २३, रा. म्हसवड, ता. माण), विलास बाबूराव पाटोळे (३६) सतीश आनंदा धडांबे (३६) व सागर शंकर जाधव (३०, तिघेही रा. महिमानगड, ता. माण) यांच्यासह इतर १५ जणांवर गुन्हा दाखल झाला होता.गोरेंचा जामीन फेटाळला होतागिरिराज रिन्यूएबल कंपनीचे बांधकाम उकरून टाकून खंडणी मागितल्याप्रकरणात शेखर गोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज वडूज न्यायालयाने फेटाळून लावला होता.गेल्या आठवड्यात वडूज न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली होती. त्यावेळी सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने गोरे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला होता.१ टोळीच्या माध्यमातून खंडणीसाठी दहशत निर्माण करून आर्थिकफायदा करून घेणाºयांना आळा बसण्यासाठी अशा गुन्हेगारांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याची सूचना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकाºयांना केली होती.२ म्हसवड पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता. म्हसवडचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी यावर लक्ष ठेवले होते.३ त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठविला होता. पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा