शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

साताऱ्याला अतिवृष्टीचा फटका; पाचजणांचा मृत्यू, ४७४ गावांना बाधा, ५४९ घरांची पडझड

By नितीन काळेल | Updated: August 21, 2024 18:49 IST

शेतकऱ्यांचे नुकसान 

सातारा : जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यातील अतिवृष्टीतील नुकसानीची माहिती समोर आली असून एकूण ४७४ गावे बाधित झाली. यामध्ये ५४९ घरांची पडझड झाली. त्याचबरोबर विविध कारणांनी पाचजणांचा मृत्यू झाला असून २९ जनावरेही दगावलीत. शेतीक्षेत्रालाही काही प्रमाणात फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होते. विशेषत: करुन पश्चिम भागातील सातारा, जावळी, पाटण, महाबळेश्वर आणि वाई तालुक्याला याचा फटका बसतो. यंदा मात्र, जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरूवात झाली होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या मध्यावर अतिवृष्टी झाली. सलग १२ दिवस धो-धो पाऊस कोसळत होता. यामुळे नुकसानीच्या घटना वाढल्या. याचा फटका शेती, घरे आणि जनावरांना बसला. जून आणि जुलै महिन्यातील नुकसानीची आकडेवारी समोर आलेली आहे. त्यानुसार नुकसानीचे प्रमाण चांगलेच दिसून आलेले आहे.

जून महिन्यात अतिवृष्टी होऊन २५ गावे बाधित झाली होती. यामध्ये ४१ घरांची पडझड झाली. पाटण तालुक्यातच पावसामुळे अधिक नुकसान झाल्याचे समोर आले होते. इतर तालुक्यात किरकोळ स्वरुपात हानी झाली. तसेच जूनमधीलच अतिवृष्टीत २ गोठ्यांचेही नुकसान झाले होते. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यातील अतिवृष्टीत नुकसानीचा आकडा मोठा राहिला. पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर आदी तालुक्यातील ४४९ गावे बाधित झाली होती. यामध्ये ५०८ घरांना फटका बसला. काही घरे भुईसपाट झाली. तर काही घरांचे अंशत: नुकसान झाले. तरीही या अतिवृष्टीने अनेकांना दुसरीकडे निवारा शोधावा लागला होता. तसेच अतिवृष्टीत एक गोठ्याचेही नुकसान झाले होते.अतिवृष्टीच्या काळात पूर येणे व अन्य कारणाने पाच व्यक्तींना प्राणाला मुकावे लागले. जुलै महिन्यातील अतिवृष्टीतच या घटना घडल्या होत्या. तर एक व्यक्ती बेपत्ता आहे. तर जून महिन्यात १८ आणि जुलैत ११ पशुधनाचा बळी गेला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

घरांसाठी २४ लाखांचा निधी अपेक्षित..अतिवृष्टीत घरे तसेच गोठे, पशुधन, शेतीचे नुकसान झाल्यास शासनाकडून मदत करण्यात येते. जून आणि जुलैमधील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त घरांसाठी सुमारे २४ लाखांचा निधी अपेक्षित आहे. जूनमधील घर पडझडसाठी २ लाख ४२ हजार तर जुलैमधील घरांसाठी २१ लाख ४५ हजारांचा निधी अपेक्षित आहे. तर बाधित तीन गोठ्यांसाठी नऊ हजार रुपये मदतीसाठी लागणार आहेत. पशुधनाच्या मृत्युमुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी साडे पाच लाखांवर निधी लागणार आहे. जूनमधील पशुधनाच्या मृत्यूसाठी ३ लाख ५६ हजार तर जुलै महिन्यातील मृत जनावरांसाठी २ लाख १३ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस