शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

साताऱ्याला अतिवृष्टीचा फटका; पाचजणांचा मृत्यू, ४७४ गावांना बाधा, ५४९ घरांची पडझड

By नितीन काळेल | Updated: August 21, 2024 18:49 IST

शेतकऱ्यांचे नुकसान 

सातारा : जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यातील अतिवृष्टीतील नुकसानीची माहिती समोर आली असून एकूण ४७४ गावे बाधित झाली. यामध्ये ५४९ घरांची पडझड झाली. त्याचबरोबर विविध कारणांनी पाचजणांचा मृत्यू झाला असून २९ जनावरेही दगावलीत. शेतीक्षेत्रालाही काही प्रमाणात फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होते. विशेषत: करुन पश्चिम भागातील सातारा, जावळी, पाटण, महाबळेश्वर आणि वाई तालुक्याला याचा फटका बसतो. यंदा मात्र, जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरूवात झाली होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या मध्यावर अतिवृष्टी झाली. सलग १२ दिवस धो-धो पाऊस कोसळत होता. यामुळे नुकसानीच्या घटना वाढल्या. याचा फटका शेती, घरे आणि जनावरांना बसला. जून आणि जुलै महिन्यातील नुकसानीची आकडेवारी समोर आलेली आहे. त्यानुसार नुकसानीचे प्रमाण चांगलेच दिसून आलेले आहे.

जून महिन्यात अतिवृष्टी होऊन २५ गावे बाधित झाली होती. यामध्ये ४१ घरांची पडझड झाली. पाटण तालुक्यातच पावसामुळे अधिक नुकसान झाल्याचे समोर आले होते. इतर तालुक्यात किरकोळ स्वरुपात हानी झाली. तसेच जूनमधीलच अतिवृष्टीत २ गोठ्यांचेही नुकसान झाले होते. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यातील अतिवृष्टीत नुकसानीचा आकडा मोठा राहिला. पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर आदी तालुक्यातील ४४९ गावे बाधित झाली होती. यामध्ये ५०८ घरांना फटका बसला. काही घरे भुईसपाट झाली. तर काही घरांचे अंशत: नुकसान झाले. तरीही या अतिवृष्टीने अनेकांना दुसरीकडे निवारा शोधावा लागला होता. तसेच अतिवृष्टीत एक गोठ्याचेही नुकसान झाले होते.अतिवृष्टीच्या काळात पूर येणे व अन्य कारणाने पाच व्यक्तींना प्राणाला मुकावे लागले. जुलै महिन्यातील अतिवृष्टीतच या घटना घडल्या होत्या. तर एक व्यक्ती बेपत्ता आहे. तर जून महिन्यात १८ आणि जुलैत ११ पशुधनाचा बळी गेला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

घरांसाठी २४ लाखांचा निधी अपेक्षित..अतिवृष्टीत घरे तसेच गोठे, पशुधन, शेतीचे नुकसान झाल्यास शासनाकडून मदत करण्यात येते. जून आणि जुलैमधील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त घरांसाठी सुमारे २४ लाखांचा निधी अपेक्षित आहे. जूनमधील घर पडझडसाठी २ लाख ४२ हजार तर जुलैमधील घरांसाठी २१ लाख ४५ हजारांचा निधी अपेक्षित आहे. तर बाधित तीन गोठ्यांसाठी नऊ हजार रुपये मदतीसाठी लागणार आहेत. पशुधनाच्या मृत्युमुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी साडे पाच लाखांवर निधी लागणार आहे. जूनमधील पशुधनाच्या मृत्यूसाठी ३ लाख ५६ हजार तर जुलै महिन्यातील मृत जनावरांसाठी २ लाख १३ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस