शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

दुष्काळाचा फटका; सातारा जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना

By नितीन काळेल | Updated: January 29, 2024 18:48 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याचा फटका खरीपनंतर आता रब्बी पेरणीवर झाला आहे. अवघी ८१ टक्के पेरणी झालेली ...

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याचा फटका खरीपनंतर आता रब्बी पेरणीवर झाला आहे. अवघी ८१ टक्के पेरणी झालेली आहे. तर सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिलेले आहे. त्याचबरोबर ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झालेली आहे.जिल्ह्यातील शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. चांगला पाऊस झाल्यास दोन हंगाम चांगल्यारितीने घेण्यात येतात. त्यातच जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. त्यानंतर रब्बी हंगाम असतो. मात्र, गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. सरासरीच्या ६५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला होता. यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पेरणीवर परिणाम झाला. तसेच उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख १३ हजार हेक्टरवर निश्चित करण्यात आले होते. यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र होते. त्यानंतर गव्हाचे ३७ हजार हेक्टर, हरभरा २७ हजार हेक्टरवर होते. या तीन प्रमुख पिकांशिवाय मका, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस घेणारे शेतकरी आहेत. पण, या पिकांचे क्षेत्र अत्यल्प आहे. जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने रब्बीच्या पेरणीवरही परिणाम झाला आहे.कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार ८१.१२ टक्केच पेरणी झालेली आहे. त्यामुळे १ लाख ७२ हजार ९५० हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. यामध्ये प्रमुख पीक असणाऱ्या ज्वारीची १ लाख ३ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. ७६ टक्क्यांवर ही पेरणी आहे. तर गव्हाची सुमारे ३३ हजार हेक्टरवर पेर आहे. पेरणीची टक्केवारी ८८ इतकी आहे. हरभऱ्याची ७७ टक्के क्षेत्रावर पेर आहे. म्हणजे, २१ हजार ३३९ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. तसेच मकेला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मका क्षेत्रात वाढ झालेली आहे. कृषी विभागाने १० हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केले होते. प्रत्यक्षात १४ हजार हेक्टरवर मका घेण्यात आलेली आहे. मकेची पेरणी टक्केवारी १३८ इतकी आहे.गेल्यावर्षी जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता नाही. दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांनी पाणी उपलब्धततेचा विचार करुन रब्बी हंगाम पेरणी केलेली आहे. तसेच पेरणी होऊनही पिकांना पाणी कमी पडत असल्याने पीक उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

माण तालुक्यात ६५ टक्केच पेरणी..

जिल्ह्यात सातारा आणि कऱ्हाड तालुक्यातच रब्बी हंगामात १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. साताऱ्यात १५ हजार ४९२ तर कऱ्हाडला सुमारे १५ हजार हेक्टवर रब्बी पिके आहेत. तर सर्वात कमी पेरणी माण तालुक्यात झालेली आहे. ४६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील ३० हजार हेक्टरवरच पेर झाली. माणमधील पेरणीची टक्केवारी ६५ इतकीच आहे. तर जावळी तालुक्यात ७९ टक्के, पाटण ८८, कोरेगाव ७५, खटाव ७३ टक्के, फलटण ८८, खंडाळा ८०, वाई ८४ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

खरीपात १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर..जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामावरही दुष्काळी सावट होते. त्यामुळे खरिपाची ९३ टक्केच पेरणी झालेली. त्यामुळे १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले होते. आता रब्बीतही मोठ्या प्रमाणात क्षेत्र पेरणीविना आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी