शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

दुष्काळाचा फटका; सातारा जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना

By नितीन काळेल | Updated: January 29, 2024 18:48 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याचा फटका खरीपनंतर आता रब्बी पेरणीवर झाला आहे. अवघी ८१ टक्के पेरणी झालेली ...

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याचा फटका खरीपनंतर आता रब्बी पेरणीवर झाला आहे. अवघी ८१ टक्के पेरणी झालेली आहे. तर सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिलेले आहे. त्याचबरोबर ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झालेली आहे.जिल्ह्यातील शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. चांगला पाऊस झाल्यास दोन हंगाम चांगल्यारितीने घेण्यात येतात. त्यातच जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. त्यानंतर रब्बी हंगाम असतो. मात्र, गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. सरासरीच्या ६५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला होता. यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पेरणीवर परिणाम झाला. तसेच उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख १३ हजार हेक्टरवर निश्चित करण्यात आले होते. यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र होते. त्यानंतर गव्हाचे ३७ हजार हेक्टर, हरभरा २७ हजार हेक्टरवर होते. या तीन प्रमुख पिकांशिवाय मका, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस घेणारे शेतकरी आहेत. पण, या पिकांचे क्षेत्र अत्यल्प आहे. जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने रब्बीच्या पेरणीवरही परिणाम झाला आहे.कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार ८१.१२ टक्केच पेरणी झालेली आहे. त्यामुळे १ लाख ७२ हजार ९५० हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. यामध्ये प्रमुख पीक असणाऱ्या ज्वारीची १ लाख ३ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. ७६ टक्क्यांवर ही पेरणी आहे. तर गव्हाची सुमारे ३३ हजार हेक्टरवर पेर आहे. पेरणीची टक्केवारी ८८ इतकी आहे. हरभऱ्याची ७७ टक्के क्षेत्रावर पेर आहे. म्हणजे, २१ हजार ३३९ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. तसेच मकेला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मका क्षेत्रात वाढ झालेली आहे. कृषी विभागाने १० हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केले होते. प्रत्यक्षात १४ हजार हेक्टरवर मका घेण्यात आलेली आहे. मकेची पेरणी टक्केवारी १३८ इतकी आहे.गेल्यावर्षी जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता नाही. दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांनी पाणी उपलब्धततेचा विचार करुन रब्बी हंगाम पेरणी केलेली आहे. तसेच पेरणी होऊनही पिकांना पाणी कमी पडत असल्याने पीक उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

माण तालुक्यात ६५ टक्केच पेरणी..

जिल्ह्यात सातारा आणि कऱ्हाड तालुक्यातच रब्बी हंगामात १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. साताऱ्यात १५ हजार ४९२ तर कऱ्हाडला सुमारे १५ हजार हेक्टवर रब्बी पिके आहेत. तर सर्वात कमी पेरणी माण तालुक्यात झालेली आहे. ४६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील ३० हजार हेक्टरवरच पेर झाली. माणमधील पेरणीची टक्केवारी ६५ इतकीच आहे. तर जावळी तालुक्यात ७९ टक्के, पाटण ८८, कोरेगाव ७५, खटाव ७३ टक्के, फलटण ८८, खंडाळा ८०, वाई ८४ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

खरीपात १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर..जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामावरही दुष्काळी सावट होते. त्यामुळे खरिपाची ९३ टक्केच पेरणी झालेली. त्यामुळे १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले होते. आता रब्बीतही मोठ्या प्रमाणात क्षेत्र पेरणीविना आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी