शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अतिवृष्टीत जिल्ह्यातील ३७ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:35 AM

सातारा : जिल्ह्यात मागील पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीत पाच तालुक्यांतील ३७ जणांचा बळी गेल्याचे रविवारी दुपारपर्यंत स्पष्ट झाले होते. ...

सातारा : जिल्ह्यात मागील पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीत पाच तालुक्यांतील ३७ जणांचा बळी गेल्याचे रविवारी दुपारपर्यंत स्पष्ट झाले होते. तर पाटण तालुक्यातील भूस्खलनामधील ५ आणि वाई व जावळी तालुक्यातील पुरात बेपत्ता झालेल्या चौघा नागरिकांचा शोध सुरूच आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढणार आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे सर्वाधिक बळी हे पाटण तालुक्यात गेले आहेत.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारपासून जोरदार पावसास सुरुवात झाली. त्याचबरोबर वारे वाहत होते. बुधवारी सायंकाळपासून तर धो-धो पाऊस कोसळत होता. आभाळ फाटल्यासारखी सर्वत्र स्थिती होती. गुरुवारी तर कोयना, नवजा येथे विक्रमी पाऊस झाला होता. त्यामुळे कोयना धरणात अवघ्या २४ तासात १६ टीएमसीहून अधिक साठा वाढला होता. या पावसामुळे भूस्खलन होऊन दरडी कोसळल्या. ओढ्यांतील पाण्याने पात्र सोडले. नद्यांना महापूर आला. तसेच अतिवृष्टीमुळे घरेही पडली. मागील चार दिवसांत २२ जुलैपासून अतिवृष्टीमुळे ३७ जणांचा बळी गेल्याचे रविवारी दुपारपर्यंत स्पष्ट झाले होते. तर अन्य बेपत्ता असणाऱ्या काहींचा शोध सुरूच आहे.

दि. २१ जुलै रोजी वाई तालुक्यातील कोंढावळेतील वामन आबाजी जाधव (वय ६५) यांचा घराचे छत पडल्याने बळी गेला होता. तर दि. २२ जुलै रोजी कोंढावळे येथीलच राहीबाई मारुती कोंढाळकर (७५), भीमाबाई सखाराम वाशिवले (५२) यांचा भूस्खलन झाल्याने मृत्यू झाला. महाबळेश्वर तालुक्यात दरड कोसळून विजय उर्फ अंकुश मारुती सपकाळ (२९, रा. घावरी) याचा मृत्यू झाला. दि. २३ जुलैला पुराच्या पाण्यात जावळी तालुक्यातील रेंगडी येथील तानाबाई किसन कासुर्डे (५०), भागाबाई सहदेव कासुर्डे (५०) यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील वैभव तायाप्पा भोळे (२२, रा. बोंद्री), जळव येथील तात्याबा रामचंद्र कदम (४७) यांचाही पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला. तर मंद्रुळकोळे, ता. पाटण येथील सचिन बापूराव पाटील (४२) यांचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला. २४ जुलै रोजी जावळी तालुक्यातील वाटंबेमधील जयवंत केशव कांबळे (४५), मेढा येथील कोंडिराम बाबूराव मुकणे (४५) यांचाही पुराच्या पाण्याने बळी गेला.

२४ जुलै रोजी भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या. यामध्ये पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी येथील रामचंद्र विठ्ठल कोळेकर (५५), मंदा रामचंद्र कोळेकर (५०), अनुसया लक्ष्मण कोळेकर (४५), सीमा धोंडिराम कोळेकर (२३), लक्ष्मी वसंत कोळेकर (५४), विनायक वसंत कोळेकर (२८), सुनीता विनायक कोळेकर (२४), विघ्नेश विनायक कोळेकर (६), वेदिका विनायक कोळेकर (३), मारुती वसंत कोळेकर (२१), आणि लक्ष्मण विठ्ठल कोळेकर (५०) यांचा मृत्यू झाला. पाटणमधीलच काहीर येथील उमा धोंडिबा शिंदे (१४) हिचाही बळी भूस्खलनामध्ये गेला.

पाटण तालुक्यातील रिसवड (ढोकावळे) येथील भूस्खलनामध्ये सुरेश भांबू कांबळे (५३), हरिबा रामचंद्र कांबळे (७५), पूर्वा गौतम कांबळे (३), राहिबाई धोंडिबा कांबळे (५०) यांचा मृत्यू झाला. तर पाटणमधील मिरगावमध्ये भूस्खलन झाल्याने ८ जणांचा बळी गेला. आनंदा रामचंद्र बाकाडे (५०), मंगल आनंदा बाकाडे (४५), भूषण आनंदा बाकाडे (१७), शीतल आनंदा बाकाडे (१४), यशोदा केशव बाकाडे (६८), वेदांत जयवंत बाकाडे (८), मुक्ता महेश बाकाडे (१०) आणि विजया रामचंद्र देसाई (६९) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. २४ जुलै रोजीच सातारा तालुक्यात पुराच्या पाण्यात दोघांचा मृत्यू झाला. कुस बुद्रूक येथील सुमन विठ्ठल लोटेकर (६५) आणि अमन इलाही नालबंद (२१, रा. कोंडवे) अशी संबंधितांची नावे आहेत.

चौकट :

युध्दपातळीवर काम...

पाटण तालुक्यात भूस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचा शोध सुरूच आहे. अंदाजे अजूनही ५ लोक बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी यंत्रणा जोरदार प्रयत्न करीत आहे. तर वाई आणि जावळी तालुक्यात प्रत्येकी दोघेजण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचाही शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

.......................................................

चौकट :

भूस्खलनात २६, पुरात ८ जणांचा मृत्यू...

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ३७ जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये भूस्खलन, दरड कोसळणे, पुरात वाहून गेलेल्यांचा समावेश आहे. भूस्खलनात सर्वाधिक २६, पुरात ८, दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर एका वृध्दाचा घराचे छत अंगावर पडल्याने बळी गेला आहे.

........................................................................