कोरोनाच्या काळात जिल्ह्यात २६ अल्पवयीन मुली बेपत्ता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST2021-09-23T04:45:25+5:302021-09-23T04:45:25+5:30
सातारा : न कळत्या वयात मुलींना लग्नाचे आमिष दाखवून, त्यांना पळवून नेण्याचे प्रकार अलीकडे वाढलेले पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या ...

कोरोनाच्या काळात जिल्ह्यात २६ अल्पवयीन मुली बेपत्ता!
सातारा : न कळत्या वयात मुलींना लग्नाचे आमिष दाखवून, त्यांना पळवून नेण्याचे प्रकार अलीकडे वाढलेले पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यातून तब्बल २६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे निम्म्याहून अधिक मुली सुखरूप घरी परतल्या आहेत.
जिल्ह्यात अधूनमधून लाॅकडाऊन होता. त्यावेळी मात्र, मुली घरातच सुरक्षित होत्या. मात्र, लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर, घरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले. काही वेळेला गृहकलह मुली घरातून निघून जाण्यास कारणीभूत ठरला आहे, तसेच अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लग्नाचे आमिष दाखविले जाते. त्यामुळे मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढत आहेत.
चाैकट : ५० टक्के मुलींचाच लागला शोध
घरातून बेपत्ता झालेल्या १३ मुली अद्याप पोलिसांना सापडल्या नाहीत. काहींनी म्हणे, आठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न केेले आहे. घरातून गेलेल्या मुलींबाबत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काही वेळेला मुलीचे पालक तक्रार मागे घेतात. त्यामुळे या गुन्ह्यातील गांभीर्य शेवटी कमी होते.
चाैकट : १० टक्के मुलांवर गुन्हे दाखल
काही वेळेला मुलगी नेमकी कुठे गेली, हे समोर येत नाही. अज्ञाताने फूस लावून पळवून नेली, अशी तक्रार पालक करत असतात. त्यामुळे जोपर्यंत मुलगी सापडत नाही, तोपर्यंत अज्ञातावरच गुन्हा दाखल असतो. साधारण दहा टक्के मुलांवर या कोरोना काळात अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
चाैकट : जिल्ह्यातील एकूण बेपत्ता
५७
मुले-३१
मुली-२६
चाैकट : २०२० मध्ये चार मुलांचे खून
खून
अत्याचार-१३
आत्महत्या-२८
खुनाचा प्रयत्न-१८
भ्रुणहत्या-०
मारहाण-२६५
अपहरण-२८
अल्पवयीन मुलीवर अत्याचार-८
सायबर क्राइम-२३