शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाला दिलासा! अतिवृष्टीबाधितांना १४ कोटी; सातारा जिल्ह्यात २१ हजार शेतकरी लाभार्थी 

By नितीन काळेल | Updated: April 5, 2023 12:57 IST

उशिरा का असेना शासनाने मदत निधी मंजूर केला. ही मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

सातारा : जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमधील बाधित शेतकऱ्यांना मदत निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत २१ हजार ४८७ शेतकऱ्यांना १४ कोटी ४ लाख रुपये नुकसानीपोटी मदत मिळणार आहे. यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्यानंतर प्रशासनानेही युद्धपातळीवर पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. मात्र, त्याची मदत आता जाहीर झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना १४ कोटी ४ लाख १८ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.फलटण तालुक्यातील २ हजार ६५८ शेतकऱ्यांचे ८७३ हेक्टरचे नुकसान झाले होते. यासाठी २ कोटी २८ लाख ४४ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. कोरेगाव तालुक्यातील ६८४ शेतकऱ्यांच्या २०८ हेक्टरसाठी ३५ लाख ८८ हजार, कऱ्हाड तालुक्यातील १६८ शेतकऱ्यांना ३३ हेक्टरसाठी ६ लाख ७ हजार रुपये मदतीसाठी वितरित केले जाणार आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील ५४४ शेतकऱ्यांचे १७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आता ४७ लाख ५६ हजार, पाटणमधील ३७२ शेतकऱ्यांना ४०.६१ हेक्टरसाठी ३ लाख ९३ हजार रुपयांचा मदत निधी मंजूर झालेला आहे. तर खंडाळा तालुक्यातील ७ हजार ७८० शेतकऱ्यांचे १ हजार ८५५ हेक्टरवरील पीक बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना ४ कोटी ३३ लाख २५ हजार रुपये मिळणार आहेत. खटाव तालुक्यातील ४ हजार ४३३ शेतकऱ्यांना १ हजार ५४७ हेक्टरवरील नुकसानीपोटी ३ कोटी ६४ लाख ३९ हजार, माण तालुक्यातील ३ हजार २२१ शेतकऱ्यांना १ हजार ५० हेक्टरसाठी २ कोटी ५८ लाख ४६ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर सातारा तालुक्यातील ३२ शेतकऱ्यांचे सुमारे आठ हेक्टरचे नुकसान झालेले. त्यासाठी १ लाख ११ हजार, जावळी तालुक्यातील ७३ शेतकऱ्यांना ७७ हजार आणि वाई तालुक्यातील १ हजार ५२२ शेतकऱ्यांना २४ लाख ३२ हजार रुपये भरपाई मिळणार आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण २१ हजार ४८७ शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झालेली आहे.

सहा हजार हेक्टरचे नुकसान; भरपाई लवकरची अपेक्षा...जिल्ह्यात गेल्यावर्षी सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये ५ हजार ९७३ हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते. यामुळे बळीराजा कोलमडून पडला होता. आता उशिरा का असेना शासनाने मदत निधी मंजूर केला आहे. ही मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी