शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

बळीराजाला दिलासा! अतिवृष्टीबाधितांना १४ कोटी; सातारा जिल्ह्यात २१ हजार शेतकरी लाभार्थी 

By नितीन काळेल | Updated: April 5, 2023 12:57 IST

उशिरा का असेना शासनाने मदत निधी मंजूर केला. ही मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

सातारा : जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमधील बाधित शेतकऱ्यांना मदत निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत २१ हजार ४८७ शेतकऱ्यांना १४ कोटी ४ लाख रुपये नुकसानीपोटी मदत मिळणार आहे. यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्यानंतर प्रशासनानेही युद्धपातळीवर पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. मात्र, त्याची मदत आता जाहीर झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना १४ कोटी ४ लाख १८ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.फलटण तालुक्यातील २ हजार ६५८ शेतकऱ्यांचे ८७३ हेक्टरचे नुकसान झाले होते. यासाठी २ कोटी २८ लाख ४४ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. कोरेगाव तालुक्यातील ६८४ शेतकऱ्यांच्या २०८ हेक्टरसाठी ३५ लाख ८८ हजार, कऱ्हाड तालुक्यातील १६८ शेतकऱ्यांना ३३ हेक्टरसाठी ६ लाख ७ हजार रुपये मदतीसाठी वितरित केले जाणार आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील ५४४ शेतकऱ्यांचे १७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आता ४७ लाख ५६ हजार, पाटणमधील ३७२ शेतकऱ्यांना ४०.६१ हेक्टरसाठी ३ लाख ९३ हजार रुपयांचा मदत निधी मंजूर झालेला आहे. तर खंडाळा तालुक्यातील ७ हजार ७८० शेतकऱ्यांचे १ हजार ८५५ हेक्टरवरील पीक बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना ४ कोटी ३३ लाख २५ हजार रुपये मिळणार आहेत. खटाव तालुक्यातील ४ हजार ४३३ शेतकऱ्यांना १ हजार ५४७ हेक्टरवरील नुकसानीपोटी ३ कोटी ६४ लाख ३९ हजार, माण तालुक्यातील ३ हजार २२१ शेतकऱ्यांना १ हजार ५० हेक्टरसाठी २ कोटी ५८ लाख ४६ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर सातारा तालुक्यातील ३२ शेतकऱ्यांचे सुमारे आठ हेक्टरचे नुकसान झालेले. त्यासाठी १ लाख ११ हजार, जावळी तालुक्यातील ७३ शेतकऱ्यांना ७७ हजार आणि वाई तालुक्यातील १ हजार ५२२ शेतकऱ्यांना २४ लाख ३२ हजार रुपये भरपाई मिळणार आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण २१ हजार ४८७ शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झालेली आहे.

सहा हजार हेक्टरचे नुकसान; भरपाई लवकरची अपेक्षा...जिल्ह्यात गेल्यावर्षी सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये ५ हजार ९७३ हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते. यामुळे बळीराजा कोलमडून पडला होता. आता उशिरा का असेना शासनाने मदत निधी मंजूर केला आहे. ही मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी