शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

२०० वर्षांचा गाळ १५ दिवसांत निघणार-पालिका व जलसंपदा विभागाकडून कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:49 IST

सातारा शहराच्या पश्चिम भागाची तहान भागविणारा ऐतिहासिक महादरे तलाव तब्बल २०० वर्षांनंतर गाळमुक्त होणार आहे. सातारा पालिका व जलसंपदा विभागाच्या वतीने या तळ्यातील गाळ काढण्याच्या कामास बुधवारी प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देमहादरे तलाव : ; ऐतिहासिक तलावातील पाणीसाठ्यात होणार वाढ

सचिन काकडे ।सातारा : शहराच्या पश्चिम भागाची तहान भागविणारा ऐतिहासिक महादरे तलाव तब्बल २०० वर्षांनंतर गाळमुक्त होणार आहे. सातारा पालिका व जलसंपदा विभागाच्या वतीने या तळ्यातील गाळ काढण्याच्या कामास बुधवारी प्रारंभ करण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत हे काम पूर्णत्वास येणार आहे.

नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापती यशोधन नारकर, नगरसेवक वसंत लेवे, नगरसेविका रजनी जेधे, साधना फाळके, नगरसेवक किशोर शिंदे, सागर पावसे, सागर साळुंखे यांच्या उपस्थितीत या कामाचा प्रारंभ करण्यात आला.

सातारा शहराच्या पश्चिम भागाला पूर्वी ऐतिहासिक महादरे तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. या तलावात साठणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ते तुंबून राहत होते. पाण्याचा वापर जेमतेम होत असताना हा तलाव दुर्गंधीच्या विळख्यात सापडला होता. बारमाही वाहणारा हा तलाव सध्या कोरडा पडला आहे. उभारणीच्या तब्बल दोनशे वर्षांनंतर प्रथमच यातील गाळ काढण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

बुधवारी जलसंपदा विभागाच्या वतीने जेसीबी व पोकलॅनच्या साह्याने तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. सातारा विकास आघाडीने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यानुसार महादरे तलाव गाळमुक्त करण्याचे ऐतिहासिक काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. तलावातील गाळ प्रथमच काढण्यात येत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सूचनेनुसार हे काम येत्या पंधरा दिवसांतच मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी दिली.कामासाठी ९.५० लाखांची तरतूदसातारा पालिकेच्या वतीने जलसपंदा विभागाकडे सहा लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे. हा निधी क्रेन, पोकलॅन, डिझेल यांसह विविध कामांसाठी खर्च केला जाणार आहे. दरम्यान, या कामासाठी पालिकेच्या वतीने एक क्रेन व व एक यारी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी पालिकेकडून निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. सुमारे साडे तीन लाखांची तरतूद या कामासाठी करण्यात आली आहे. अशाप्रकारे तलाव गाळमुक्त करण्यासाठी एकूण ९.५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.शेतीसाठी मिळणार गाळतलावातून निघणारा गाळ शेजारी असलेल्या शेतामध्ये साठविला जाणार आहे. पालिकेकडून आवश्यकतेनुसार नागरिकांना शेती व बागांसाठी हा गाळ दिला जाणार आहे. तलावातील गाळ जुना असल्याचे शेतीसाठी तसेच झाडांसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई