शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

१७६८ गावांत प्रवचनकार करणार स्वच्छतेचा जागर! : १२४ जणांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 21:42 IST

सातारा : जिल्'ाने हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेत नावलौकिक मिळविला असताना आता स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रवचनकार पुढे आले आहेत. ...

ठळक मुद्देलोकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी प्रयत्न

सातारा : जिल्'ाने हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेत नावलौकिक मिळविला असताना आता स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रवचनकार पुढे आले आहेत. त्यासंबंधीची बैठक जिल्हा परिषदेत झाली असून, एकूण १२४ प्रवचनकारांनी उपस्थिती लावली होती. या सर्वांच्या माध्यमातून जिल्'ातील १७६८ गावांत स्वच्छतेचा जागर होणार आहे.

 

येथील जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, वारकरी साहित्य परिषद आणि सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मधुकर दीक्षित, बाबा महाराज गजवडीकर, दीपक दाभाडे महाराज, हणमंत महाराज, किशोर जाधव शेणोलीकर, आनंदराव देसाई, संदीप गबाळे आदी उपस्थित होते.

संजीवराजे म्हणाले, ‘सातारा जिल्'ातील स्वच्छतेच्या बाबतीत समाजातील सर्व घटकांनी योगदान दिलेले आहे. त्यातच सातारा राज्यातील पहिला हागणदारीमुक्त आणि देशातील पहिला स्वच्छ जिल्हा ठरला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकांबरोबरच प्रवचन आणि कीर्तनकारांचाही सहभाग राहिला आहे. याच जिल्'ातील हैबतबाबांनी पंढरपूरची वारी सुरू करून वारकरी सांप्रदायाला संघटित करण्याचे काम केले. आता याच पद्धतीने राज्य शासनाने प्रवचनकारांना एकत्र करून स्वच्छतेसाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक प्रवचनकार २४ गावांत जाऊन संदेश देणार आहे. यामुळे सातारा जिल्'ातही स्वच्छतेबाबत प्रबोधन होणार आहे. या माध्यमातून वैयक्तिक शौचालय वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता, प्लास्टिक बंदी याबाबत लोकांची मानसिकता बदलण्यात येणार आहे.’

यावेळी धनाजी पाटील, अजय राऊत, हृषीकेश शिलवंत, राजेश भोसले, चंद्रकांत देशमुख, राजेश इंगळे, रवींद्र सोनावणे, संजय पवार, नीलिमा सन्मुख आदी उपस्थित होते.बोला पुंडलिकचा गजर...जिल्हा परिषदेतील बैठकीत प्रवचनकारांनी टाळ वाजवत ‘बोला पुंडलीक’चा गजर केला. तसेच यावेळी भजन, पसायदान म्हणण्यात आले. यामुळे जिल्हा परिषदेत धार्मिक वातावरण तयार झाले होते. 

सातारा जिल्हा स्वच्छतेत अग्रेसर आहे. प्रवचनकारांनी भजन, भारुड आणि प्रवचनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रबोधन करून स्वच्छतेची जिल्'ाची परंपरा कायम पुढे घेऊन जावी.-किरण सायमोते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर