शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

१७६८ गावांत प्रवचनकार करणार स्वच्छतेचा जागर! : १२४ जणांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 21:42 IST

सातारा : जिल्'ाने हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेत नावलौकिक मिळविला असताना आता स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रवचनकार पुढे आले आहेत. ...

ठळक मुद्देलोकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी प्रयत्न

सातारा : जिल्'ाने हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेत नावलौकिक मिळविला असताना आता स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रवचनकार पुढे आले आहेत. त्यासंबंधीची बैठक जिल्हा परिषदेत झाली असून, एकूण १२४ प्रवचनकारांनी उपस्थिती लावली होती. या सर्वांच्या माध्यमातून जिल्'ातील १७६८ गावांत स्वच्छतेचा जागर होणार आहे.

 

येथील जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, वारकरी साहित्य परिषद आणि सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मधुकर दीक्षित, बाबा महाराज गजवडीकर, दीपक दाभाडे महाराज, हणमंत महाराज, किशोर जाधव शेणोलीकर, आनंदराव देसाई, संदीप गबाळे आदी उपस्थित होते.

संजीवराजे म्हणाले, ‘सातारा जिल्'ातील स्वच्छतेच्या बाबतीत समाजातील सर्व घटकांनी योगदान दिलेले आहे. त्यातच सातारा राज्यातील पहिला हागणदारीमुक्त आणि देशातील पहिला स्वच्छ जिल्हा ठरला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकांबरोबरच प्रवचन आणि कीर्तनकारांचाही सहभाग राहिला आहे. याच जिल्'ातील हैबतबाबांनी पंढरपूरची वारी सुरू करून वारकरी सांप्रदायाला संघटित करण्याचे काम केले. आता याच पद्धतीने राज्य शासनाने प्रवचनकारांना एकत्र करून स्वच्छतेसाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक प्रवचनकार २४ गावांत जाऊन संदेश देणार आहे. यामुळे सातारा जिल्'ातही स्वच्छतेबाबत प्रबोधन होणार आहे. या माध्यमातून वैयक्तिक शौचालय वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता, प्लास्टिक बंदी याबाबत लोकांची मानसिकता बदलण्यात येणार आहे.’

यावेळी धनाजी पाटील, अजय राऊत, हृषीकेश शिलवंत, राजेश भोसले, चंद्रकांत देशमुख, राजेश इंगळे, रवींद्र सोनावणे, संजय पवार, नीलिमा सन्मुख आदी उपस्थित होते.बोला पुंडलिकचा गजर...जिल्हा परिषदेतील बैठकीत प्रवचनकारांनी टाळ वाजवत ‘बोला पुंडलीक’चा गजर केला. तसेच यावेळी भजन, पसायदान म्हणण्यात आले. यामुळे जिल्हा परिषदेत धार्मिक वातावरण तयार झाले होते. 

सातारा जिल्हा स्वच्छतेत अग्रेसर आहे. प्रवचनकारांनी भजन, भारुड आणि प्रवचनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रबोधन करून स्वच्छतेची जिल्'ाची परंपरा कायम पुढे घेऊन जावी.-किरण सायमोते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर