शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

१७६८ गावांत प्रवचनकार करणार स्वच्छतेचा जागर! : १२४ जणांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 21:42 IST

सातारा : जिल्'ाने हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेत नावलौकिक मिळविला असताना आता स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रवचनकार पुढे आले आहेत. ...

ठळक मुद्देलोकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी प्रयत्न

सातारा : जिल्'ाने हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेत नावलौकिक मिळविला असताना आता स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रवचनकार पुढे आले आहेत. त्यासंबंधीची बैठक जिल्हा परिषदेत झाली असून, एकूण १२४ प्रवचनकारांनी उपस्थिती लावली होती. या सर्वांच्या माध्यमातून जिल्'ातील १७६८ गावांत स्वच्छतेचा जागर होणार आहे.

 

येथील जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, वारकरी साहित्य परिषद आणि सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मधुकर दीक्षित, बाबा महाराज गजवडीकर, दीपक दाभाडे महाराज, हणमंत महाराज, किशोर जाधव शेणोलीकर, आनंदराव देसाई, संदीप गबाळे आदी उपस्थित होते.

संजीवराजे म्हणाले, ‘सातारा जिल्'ातील स्वच्छतेच्या बाबतीत समाजातील सर्व घटकांनी योगदान दिलेले आहे. त्यातच सातारा राज्यातील पहिला हागणदारीमुक्त आणि देशातील पहिला स्वच्छ जिल्हा ठरला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकांबरोबरच प्रवचन आणि कीर्तनकारांचाही सहभाग राहिला आहे. याच जिल्'ातील हैबतबाबांनी पंढरपूरची वारी सुरू करून वारकरी सांप्रदायाला संघटित करण्याचे काम केले. आता याच पद्धतीने राज्य शासनाने प्रवचनकारांना एकत्र करून स्वच्छतेसाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक प्रवचनकार २४ गावांत जाऊन संदेश देणार आहे. यामुळे सातारा जिल्'ातही स्वच्छतेबाबत प्रबोधन होणार आहे. या माध्यमातून वैयक्तिक शौचालय वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता, प्लास्टिक बंदी याबाबत लोकांची मानसिकता बदलण्यात येणार आहे.’

यावेळी धनाजी पाटील, अजय राऊत, हृषीकेश शिलवंत, राजेश भोसले, चंद्रकांत देशमुख, राजेश इंगळे, रवींद्र सोनावणे, संजय पवार, नीलिमा सन्मुख आदी उपस्थित होते.बोला पुंडलिकचा गजर...जिल्हा परिषदेतील बैठकीत प्रवचनकारांनी टाळ वाजवत ‘बोला पुंडलीक’चा गजर केला. तसेच यावेळी भजन, पसायदान म्हणण्यात आले. यामुळे जिल्हा परिषदेत धार्मिक वातावरण तयार झाले होते. 

सातारा जिल्हा स्वच्छतेत अग्रेसर आहे. प्रवचनकारांनी भजन, भारुड आणि प्रवचनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रबोधन करून स्वच्छतेची जिल्'ाची परंपरा कायम पुढे घेऊन जावी.-किरण सायमोते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर