शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
3
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
4
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
5
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
6
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
7
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
8
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
9
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
10
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
11
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
12
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
13
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
14
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
15
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
16
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
17
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
18
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
19
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
20
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!

३७९ धोकादायक इमारतींत १३५० नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST

सातारा : मालक व भाडेकरू या वादामुळे सातारा शहरातील धोकादायक इमारतींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पालिकेच्या सर्वेक्षणात अशा ...

सातारा : मालक व भाडेकरू या वादामुळे सातारा शहरातील धोकादायक इमारतींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पालिकेच्या सर्वेक्षणात अशा इमारतींची संख्या ३७९ असून, ५० इमारती बंद सध्या अवस्थेत आहे. तर उर्वरित इमारतींमध्ये सुमारे १३५० नागरिक धोका पत्करून आजही वास्तव्य करीत आहेत.

पालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मिळकतदारकांना नोटिसा बजावून इमारत पाडण्याच्या सूचना केल्या जातात. मात्र, अनेक मिळकती वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने मूळ मालक याकडे दुर्लक्ष करतात. तर हक्क संपुष्टात येईल, या भीतीने भाडेकरू जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करीत आहेत.

घरमालक व भाडेकरू यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट असल्याने इमारत पाडता येत नसल्याचा खुलासा मिळकतदारांकडून वारंवार केला जातो. त्यामुळे नगरपालिकेला नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही करता येत नसल्याने शहरातील धोकादायक इमारती संख्या यंदा ३७९ वर पोहोचली आहे. जीर्ण इमारती लोकवस्तीत तसेच रहदारीच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी वाईट घटना घडल्यास याचे विपरीत परिणाम सोसावे लागणार आहेत.

(कोट)

सारे काही कळते, पण कुठे जाणार?

१. गेल्या चाळीस वर्षांपासून आम्ही या इमारतीत भाडेकरू म्हणून राहत आहोत. इमारतीची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती आम्ही करत आहोत. आमचे स्वत:चे घर नाही. त्यामुळे आमच्यापुढे दुसरा कोणताच पर्याय नाही.

- विशाल पवार, सातारा

२. आमच्या घराची अद्याप वाटणी झाली नाही. वाटणी झाली तरी नवे घर बांधण्यासाठी आर्थिक संकट उभे आहे. पालिकेने अनेकदा नोटीस बजावली. परंतु काय करणार, ही इमारत सोडली तर राहणार कुठे?

- सागर जगदाळे, सातारा

३. आमची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. पावसाळा सुरू झाला की धडकीच भरते. जसे पैसे येतील तशी इमारतीची डागडुजी केली आहे. पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाली की आम्ही इमारत मोकळी करणार आहोत.

- शंकर जाधव, सातारा

(चौकट)

पालिकेने वारंवार बजावल्या नोटिसा

पालिकेकडून दरवर्षी मूळ मालकांना इमारत पाडण्याची अथवा ती खाली करण्याची नोटीस बजावली जाते. काही इमारतींवर धोक्याचा फलकही लावला जातो. मात्र, न्यायप्रविष्ट बाब असल्याने एकही मिळकतदार ही बाब गांभीर्याने घेत नाही. गेल्या १७ वर्षांत केवळ ५० मिळकतधारकांनी आपल्या इमारती स्वत:हून पाडल्या आहेत.

(चौकट)

इमारत पडल्यास जबाबदार कोण?

सातारा शहरात सहा वर्षांपूर्वी राजपथावरील धोकादायक इमारत कोसळल्याने तिघांना जीव गमवावा लागला होता. यानंतर धोकायदायक इमारतींचा प्रश्न चर्चेचा विषय बनला. पालिकेने सर्व्हे करून मिळतदारांना धोक्याची सूचना दिली; परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत केवळ दोनच इमारती पाडण्यात आल्या. पावसाळ्यात जर एखादी विपरीत घटना घडली तर जबाबदार कोण? याचा नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे.

(पॉइंटर)

धोकादायक इमारत ३७९

इमारतीमध्ये राहणाऱ्यांची संख्या १३५०