शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

३७९ धोकादायक इमारतींत १३५० नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST

सातारा : मालक व भाडेकरू या वादामुळे सातारा शहरातील धोकादायक इमारतींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पालिकेच्या सर्वेक्षणात अशा ...

सातारा : मालक व भाडेकरू या वादामुळे सातारा शहरातील धोकादायक इमारतींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पालिकेच्या सर्वेक्षणात अशा इमारतींची संख्या ३७९ असून, ५० इमारती बंद सध्या अवस्थेत आहे. तर उर्वरित इमारतींमध्ये सुमारे १३५० नागरिक धोका पत्करून आजही वास्तव्य करीत आहेत.

पालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मिळकतदारकांना नोटिसा बजावून इमारत पाडण्याच्या सूचना केल्या जातात. मात्र, अनेक मिळकती वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने मूळ मालक याकडे दुर्लक्ष करतात. तर हक्क संपुष्टात येईल, या भीतीने भाडेकरू जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करीत आहेत.

घरमालक व भाडेकरू यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट असल्याने इमारत पाडता येत नसल्याचा खुलासा मिळकतदारांकडून वारंवार केला जातो. त्यामुळे नगरपालिकेला नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही करता येत नसल्याने शहरातील धोकादायक इमारती संख्या यंदा ३७९ वर पोहोचली आहे. जीर्ण इमारती लोकवस्तीत तसेच रहदारीच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी वाईट घटना घडल्यास याचे विपरीत परिणाम सोसावे लागणार आहेत.

(कोट)

सारे काही कळते, पण कुठे जाणार?

१. गेल्या चाळीस वर्षांपासून आम्ही या इमारतीत भाडेकरू म्हणून राहत आहोत. इमारतीची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती आम्ही करत आहोत. आमचे स्वत:चे घर नाही. त्यामुळे आमच्यापुढे दुसरा कोणताच पर्याय नाही.

- विशाल पवार, सातारा

२. आमच्या घराची अद्याप वाटणी झाली नाही. वाटणी झाली तरी नवे घर बांधण्यासाठी आर्थिक संकट उभे आहे. पालिकेने अनेकदा नोटीस बजावली. परंतु काय करणार, ही इमारत सोडली तर राहणार कुठे?

- सागर जगदाळे, सातारा

३. आमची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. पावसाळा सुरू झाला की धडकीच भरते. जसे पैसे येतील तशी इमारतीची डागडुजी केली आहे. पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाली की आम्ही इमारत मोकळी करणार आहोत.

- शंकर जाधव, सातारा

(चौकट)

पालिकेने वारंवार बजावल्या नोटिसा

पालिकेकडून दरवर्षी मूळ मालकांना इमारत पाडण्याची अथवा ती खाली करण्याची नोटीस बजावली जाते. काही इमारतींवर धोक्याचा फलकही लावला जातो. मात्र, न्यायप्रविष्ट बाब असल्याने एकही मिळकतदार ही बाब गांभीर्याने घेत नाही. गेल्या १७ वर्षांत केवळ ५० मिळकतधारकांनी आपल्या इमारती स्वत:हून पाडल्या आहेत.

(चौकट)

इमारत पडल्यास जबाबदार कोण?

सातारा शहरात सहा वर्षांपूर्वी राजपथावरील धोकादायक इमारत कोसळल्याने तिघांना जीव गमवावा लागला होता. यानंतर धोकायदायक इमारतींचा प्रश्न चर्चेचा विषय बनला. पालिकेने सर्व्हे करून मिळतदारांना धोक्याची सूचना दिली; परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत केवळ दोनच इमारती पाडण्यात आल्या. पावसाळ्यात जर एखादी विपरीत घटना घडली तर जबाबदार कोण? याचा नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे.

(पॉइंटर)

धोकादायक इमारत ३७९

इमारतीमध्ये राहणाऱ्यांची संख्या १३५०