शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

सातारा जिल्ह्यातील १०० गावांचं पाऊल प्लास्टिक कचरामुक्तीकडे

By नितीन काळेल | Updated: December 11, 2023 19:06 IST

जिल्हा परिषदेचा पुढाकार; गावांचं बकालपण जाणार

सातारा : कचरा न संपणारी गोष्ट आहे. शहराप्रमाणचे ग्रामीण भागातही कचऱ्याची समस्या आहे. त्याचबरोबर प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने गावांना बकाल रुप येत आहे. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने १०० गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करुन प्लास्टिकमुक्तीकडे पाऊल टाकले आहे. त्यामुळे भविष्यात याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत.

कचरा हा आरोग्यासाठी घातकच. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावावी लागते. शहराच्या ठिकाणी घंटागाडीतून कचरा नेण्यात येतो. पण, प्लास्टिक कचऱ्याची समस्या आहेच. कारण, शहरातील रस्त्यांच्या बाजुने पाहिले तर सर्वत्र प्लास्टिकच दिसून येते. तर ग्रामीण भागात ओला आणि सुका कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित होत नाही हेही वास्तव आहे. त्यातच प्लास्टिकने गावांना बकालरुप येत आहे. रस्ते असो किंवा ओढे, नाले, नद्या अशा ठिकाणी प्लास्टिक कचराच दिसतो. या कचऱ्याचे वर्गीकरणच होत नाही. त्यामुळे गावांना बकालपण येत आहे. हे बकालपण टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घेतला आहे.ग्रामपंचायतींना १५ वा वित्त आयोग तसेच विविध याेजनांतून निधी मिळतो. त्यामुळे ग्रामपंचायतींचीही जबाबदारी लोकांना सुविधा पुरविण्याची आहे. त्यामुळे आता प्लास्टिक कचऱ्याची समस्या टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनाही एक पाऊल उचलावे लागत आहे. यासाठी ग्रामस्थांनी घरातील प्लास्टिक उंबऱ्या बाहेर येऊ नये यासाठी दक्षता घ्यायची आहे. घरातच प्लास्टिक गोळा करुन ठेवायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने आठवड्यातून एकदातरी घरातील प्लास्टिक जमा करणे आवश्यक आहे.नंतर या प्लास्टिक कचऱ्यावर पुर्नप्रक्रिया करुन ते पुन्हा वापरात कसे येईल, हे पाहिले जाणार आहे. अशाप्रकारे प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यात १०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आलेली आहे. यामुळे गावातील प्लास्टिक कचऱ्यांचे ढिगारे कमी होणार आहेत. तसेच कोठेही प्लास्टिक दिसणार नाही. त्यामुळे गावाचे बकालपणही जाण्यास मदत होणार आहे. या सर्व प्रक्रियेत ग्रामपंचायतींची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे.

यावर चालणार काम..

प्लास्टिक मुक्तीसाठी १०० ग्रामपंचायतींची निवड झालेली आहे. यामध्ये त्रिसुत्रीचा वापर केला जाणार आहे. प्लास्टिकचा वापर कमी करणे, त्याचा पुन्हा वापर करणे आणि प्लास्टिकवर पुर्नप्रक्रिया ही त्रिसुत्री राहणार आहे.

आपले गाव स्वच्छ आणि सुंदर असणे महत्वाचे असते. यासाठी कचरामुक्त गाव ठेवण्याची गरज आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे तर गावांचे साैंदर्य हरवतं. यासाठी प्लास्टिक कचरा उघड्यावर पडू नये यासाठी जिल्ह्यातील १०० गावांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रामस्थांनी प्लास्टिक घरात गोळा करायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायती प्लास्टिक जमा करुन ते पुढील पुर्नप्रक्रियेससाठी पाठवतील. यामुळे गावे कचरामुक्त होतील. - अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPlastic banप्लॅस्टिक बंदीzpजिल्हा परिषद