शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Satara: कोयना धरणात १०० टीएमसी पाणीसाठा; पायथा वीजगृहातून पाणी सोडले, कण्हेर, उरमोडीतूनही विसर्ग 

By नितीन काळेल | Updated: August 27, 2024 12:27 IST

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून कोयना धरणातील पाणीपातळीही १०० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ...

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून कोयना धरणातील पाणीपातळीही १०० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढल्याने धरणाच्या पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील कण्हेर, धोम, उरमोडी धरणातूनही पाणी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.जिल्ह्यात आॅगस्ट महिना सुरू झाल्यानंतर पाऊस कमी झाला होता. तर आॅगस्टच्या मध्यावर पावसाने काही दिवस विश्रांती घेतलेली. मात्र, मागील पाच दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. २९ आॅगस्टपर्यंत जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मागील पाच दिवसांत तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत आहे. कोयना, नवजा, कास, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर या भागात संततधार आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर पश्चिमेकडील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडीसह तारळी धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.

मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३६ तर नवजाला १३९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तसेच महाबळेश्वरला १४२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक टिकून आहे. सकाळच्या सुमारास ३८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली. ९८.८९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सायंकाळपर्यंत धरणसाठा १०० टीएमसीचा टप्पा पार करु शकतो. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी ११ पासून कोयना धरणातील पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करुन २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्याबाबत निर्णय झाला होता. परिणामी कोयना नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

धरणांमधून पुन्हा पाणी सोडले; नदीकाठी इशारा..कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील व पुणे जिल्ह्यातील वीर धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. यामुळे धरणात आवक वाढल्याने वीरमधून नीरा नदीपात्रात ४७ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. 

उरमोडी धरणातही पाणीसाठा वाढला. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून दरवाजातूनही सुमारे सहा हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. तर धरणाच्या वीजगृहातून ५०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. तर कण्हेर धरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. यामुळे दरवाजातून विसर्ग वाढविण्यात आलेला आहे. धरणांमधून पाणी सोडण्यात येत असल्याने कोयना, नीरा, उरमोडी आणि वेण्णा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण