शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

शेतकऱ्यांची एक कोटी २९ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:23 PM

खंडाळा : ‘दीड वर्षात दुप्पट रक्कम करून देतो,’ असे आमिष दाखवून खंडाळा येथील शेतकरी व महिलांना १ कोटी २९ ...

खंडाळा : ‘दीड वर्षात दुप्पट रक्कम करून देतो,’ असे आमिष दाखवून खंडाळा येथील शेतकरी व महिलांना १ कोटी २९ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सच्या धामणकर दाम्पत्यावर खंडाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, दोघेही संशयित आरोपी फरार झाले आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खंडाळा येथील वैभव भास्कर-धामणकर व त्याची पत्नी नीलम यांच्या मालकीचे खंडाळा आणि वाई येथे ज्वेलर्सचे शोरुम आहेत. सन २०१६ मध्ये केसुर्डी (ता. खंडाळा) व परींंचे (ता. पुरंदर जि. पुणे) येथील शेतकºयांच्या जमिनी एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आल्या होत्या. त्या मोबदल्यात मोठ्या रकमा या शेतकºयांकडे जमा झाल्या.ही माहिती धामणकर पती-पत्नीला मिळाल्यानंतर संबंधित शेतकºयांशी त्यांनी जवळीक निर्माण केली. तसेच ‘आम्ही सोन्याची बिस्किटे तयार करून परदेशी पाठवतो. त्यातून पैसे दामदुप्पट केले जातात. आपली संपत्ती मोठी आहे,’ असे भासवून शेतकºयांचा विश्वास संपादन केला.संबंधित पाच शेतकºयांना आपली रक्कम आमच्याकडे गुंतवा. दीड वर्षात दुप्पट रक्कम देतो. या रकमेचा चेक अथवा बँक खात्यावर देऊ, असे त्यांनी आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून या पाच शेतकºयांनी १ कोटी २९ लाख पन्नास हजार रुपये धनादेशाद्वारे धामणकर यांना दिले.मुदत संपल्यानंतर सर्वजण पैसे मागण्यास गेले असता धामणकर दाम्पत्याकडून रक्कम देण्यास टाळाटाळ होऊ लागली. काही शेतकºयांना दिलेले धनादेश बँकेत वटले नाहीत. त्याचवेळी शेतकºयांना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यानंतर त्यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन धामणकर दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यासाठी खंडाळापोलीस गेले असता दोघेही फरार झाले. फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील हे अधिक तपास करीत आहेत.आणखी तक्रारी वाढण्याची शक्यताआर्थिक आमिष दाखवून शेतकºयांची सुमारे दीड कोटीची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर यात आणखी काही शेतकरी अडकले आहेत का? याबाबत पोलीस चाचपणी करीत आहे. औद्योगिकीकरणाच्या वाढीनंतर काही खासगी संस्था आणि वैयक्तिक लोकांकडे रक्कम वाढीसाठी गुंतवणुका केल्याचे यापूर्वीही उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा व्यवहारात अडकलेल्या लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.