शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे युवा नेते अस्वस्थ, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 17:57 IST

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी हाेणार? याबाबत प्रश्नचिन्ह कायम

अशोक पाटीलइस्लामपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी हाेणार? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. राजकीयदृष्ट्या नेहमीच संवेदनशील असलेल्या वाळवा-शिराळा तालुक्यात गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीतील युवा नेत्यांनी जाेरदार तयारी केली आहे. परंतु, निवडणुकीसंदर्भातील निर्णय न्यायालयीन कक्षेत प्रलंबित आहे. त्यामुळे तिसऱ्या फळीतील सर्वच युवा नेते अस्वस्थ आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूर मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व सूत्रे राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील यांच्याकडे देण्याची शक्यता हाेती. परंतु, निवडणुकाच लांबणीवर पडल्या आहेत.आष्टा शहरासह परिसरातील काही गावात दिवंगत आमदार विलासराव शिंदे यांचा गट प्रबळ आहे. त्यांचे चिरंजीव वैभव शिंदे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. गतवेळी बागणी जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवली होती. परंतु, बंडखोरी झाल्यामुळे शिंदे यांचा पराभव झाला. त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे त्यांचे लक्ष्य लागून राहिले आहे.वाळवा तालुक्यातील शिराळा मतदारसंघात असलेल्या ४८ गावांतीलही राष्ट्रवादीचे तिसऱ्या फळीतील नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. या भागातील जबाबदारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता होती. परंतु, निवडणुकाच लांबणीवर पडल्याने ४८ गावांतील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

शिराळा मतदारसंघात आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव विराज नाईक राष्ट्रवादीची जबाबदारी पेलत आहेत. त्यांना ताकद देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांचीही साथ मोलाची आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीतील तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची ताकद मजबूत करण्यासाठी दोन नाईक एकत्र आले आहेत. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नसल्याचे चित्र आहे. एकंदरीत आगामी स्थानिक संस्थेच्या निवडणुकीकडे डोळे लावून बसणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

स्थानिक संस्थेच्या निवडणुका पाच वर्षांत घेणे शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. परंतु, आरक्षणाचा विषय न्यायालयीन कक्षेत आहे. त्यामुळे निवडणूका लांबणीवर पडत आहेत. शासनाने जबाबदारीने हा निर्णय लागण्यासाठी न्यायालयात आपली बाजू त्वरित मांडणे गरजेचे आहे. - रणधीर नाईक, माजी जि. प. सदस्य

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस