शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे युवा नेते अस्वस्थ, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 17:57 IST

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी हाेणार? याबाबत प्रश्नचिन्ह कायम

अशोक पाटीलइस्लामपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी हाेणार? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. राजकीयदृष्ट्या नेहमीच संवेदनशील असलेल्या वाळवा-शिराळा तालुक्यात गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीतील युवा नेत्यांनी जाेरदार तयारी केली आहे. परंतु, निवडणुकीसंदर्भातील निर्णय न्यायालयीन कक्षेत प्रलंबित आहे. त्यामुळे तिसऱ्या फळीतील सर्वच युवा नेते अस्वस्थ आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूर मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व सूत्रे राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील यांच्याकडे देण्याची शक्यता हाेती. परंतु, निवडणुकाच लांबणीवर पडल्या आहेत.आष्टा शहरासह परिसरातील काही गावात दिवंगत आमदार विलासराव शिंदे यांचा गट प्रबळ आहे. त्यांचे चिरंजीव वैभव शिंदे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. गतवेळी बागणी जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवली होती. परंतु, बंडखोरी झाल्यामुळे शिंदे यांचा पराभव झाला. त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे त्यांचे लक्ष्य लागून राहिले आहे.वाळवा तालुक्यातील शिराळा मतदारसंघात असलेल्या ४८ गावांतीलही राष्ट्रवादीचे तिसऱ्या फळीतील नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. या भागातील जबाबदारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता होती. परंतु, निवडणुकाच लांबणीवर पडल्याने ४८ गावांतील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

शिराळा मतदारसंघात आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव विराज नाईक राष्ट्रवादीची जबाबदारी पेलत आहेत. त्यांना ताकद देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांचीही साथ मोलाची आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीतील तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची ताकद मजबूत करण्यासाठी दोन नाईक एकत्र आले आहेत. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नसल्याचे चित्र आहे. एकंदरीत आगामी स्थानिक संस्थेच्या निवडणुकीकडे डोळे लावून बसणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

स्थानिक संस्थेच्या निवडणुका पाच वर्षांत घेणे शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. परंतु, आरक्षणाचा विषय न्यायालयीन कक्षेत आहे. त्यामुळे निवडणूका लांबणीवर पडत आहेत. शासनाने जबाबदारीने हा निर्णय लागण्यासाठी न्यायालयात आपली बाजू त्वरित मांडणे गरजेचे आहे. - रणधीर नाईक, माजी जि. प. सदस्य

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस