शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

यंदाच्या वर्षी शेतीचे विक्रमी उत्पादन होईल : विश्वजीत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 16:11 IST

Vishwajeet Kadam Sangli : राज्य सरकारकडून राबवलेल्या कृषी धोरणांमुळे महाराष्ट्रात गतवर्षी १२ टक्क्यांनी शेतीचे उत्पन्न वाढले आहे. यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने आधुनिक पद्धतीने खरीपाचे नियोजन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतीचे विक्रमी उत्पादन होईल,असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देयंदाच्या वर्षी शेतीचे विक्रमी उत्पादन होईल : विश्वजीत कदमसांगलीतील नमराह कोरोना सेंटरला दिली सदिच्छा भेट

सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली : राज्य सरकारकडून राबवलेल्या कृषी धोरणांमुळे महाराष्ट्रात गतवर्षी १२ टक्क्यांनी शेतीचे उत्पन्न वाढले आहे. यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने आधुनिक पद्धतीने खरीपाचे नियोजन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतीचे विक्रमी उत्पादन होईल,असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.सांगलीतील नमराह कोरोना सेंटर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी ते म्हणाले, शहरासह ग्रामीण भागात आज अनेक कोरोना विलगीकरण कक्ष सुरू आहेत. त्या ठिकाणी रूग्णांच्या करमणुकीसाठी प्रयत्न करणार आहोत.

आज जे कलाकार काम नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत, त्यांनाही आर्थिक मदत देण्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी युवा नेते डॉ. जितेश कदम, नगरसेवक संतोष पाटील, नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, जावेद नायकवडी, रहीम मुल्ला, इरशाद सोलापुरे, डाँ.रौफ मुल्ला, मुन्ना पटेकरी, छोटू ऐनापुरे आदी उपस्थित होते.मंत्री कदम पुढे म्हणाले, यंदाच्या वर्षी हवामान खात्याकडून वेळेत मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारकडून जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरिपाच्या बैठकी पार पडलेल्या आहेत. योग्य त्या सूचना सर्व पातळ्यांवर देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांना लागेल, त्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तर गेल्या वर्षी महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये शेतीचे 12 टक्के उत्पन्न वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाकडून आधुनिक पद्धतीने उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचबरोबर चांगला पाऊस यामुळे यंदाच्या वर्षी राज्यात शेतीचा विक्रमी उत्पादन होईल, असा विश्वास विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केला आहे.केंद्र सरकारवर दाबव आणला पाहिजेमराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आघाडी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी सरकारकडून पावले टाकण्यात येत आहेत आणि भविष्यातही टाकली जातील. कायद्याने आरक्षण कसे घेता येईल याची चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर आहे. पण आंदोलन हा वेगळा विषय आहे. सर्वानी राज्य सरकार सोबत चर्चा चालू ठेवून केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमFarmerशेतकरीSangliसांगलीAgriculture Sectorशेती क्षेत्र