शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी परीक्षेच्या पेपरमधील प्रश्न चुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:03 IST

बोरगाव : महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सिव्हिल पदविकेच्या (डिप्लोमा) दुसऱ्या वर्षातील चौथ्या ...

बोरगाव : महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सिव्हिल पदविकेच्या (डिप्लोमा) दुसऱ्या वर्षातील चौथ्या सत्रातील ‘बिल्डिंग प्लॅनिंग अ‍ॅण्ड ड्रॉर्इंग’ या शेवटच्या परीक्षा पेपरमध्ये दोन प्रश्न चुकल्याने विद्यार्थ्यांचे तब्बल २४ गुणांचे नुकसान होणार आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असून, याबाबत बोर्डाने न्याय न दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.सोमवारी अभियांत्रिकी सिव्हिल द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्रातील ‘बिल्डिंग प्लॅनिंग अ‍ॅण्ड ड्रॉर्इंग’ या विषयाचा पेपर दुपारी दोन ते सहा या वेळेत होता. इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात असलेल्या केंद्रात दोन वाजता विद्यार्थांना प्रश्नपत्रिका वाटप केल्या. यावेळी प्रश्न क्रमांक तीन व सहाचे प्रत्येकी बारा गुणांचे दोन प्रश्न चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या लक्षात आणून दिले. यानंतर परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ निर्माण झाला. यावरून कॉलेज प्रशासनाचाही संभ्रम झाला. यानंतर तात्काळ महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांच्याशी संपर्क साधला असता, ते दोन्ही प्रश्न चुकीचे असल्याचे कबूल करून, चुकीचे दोन प्रश्न सोडून व त्यांचे प्रश्न क्रमांक लिहून जागा सोडून बाकीच्या प्रश्नांचीउत्तरे लिहिण्यास सांगितले. मात्र असे चुकीचे प्रश्न आले आहेत, एकूण सत्तर गुणांच्या या पेपरमधील चोवीस गुण कमी झाले, तर ४६ गुणांचा पेपर राहतो. त्यात २८ गुण मिळाले नाहीत, तर त्या एका विषयात तो विद्यार्थी नापास होणार आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल पालक करत आहेत.या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक तीनमध्ये ‘फिगर नंबर वन - शो लाइन प्लॅन आॅफ रेसीडेन्सीयल बिल्डिंग’ असे दिले आहे, मात्र तिथे ‘फिगर नंबर वन’ दिलेली नाही. म्हणजे थोडक्यात फिगर नाही, तर प्रश्न सोडवायचाच कसा? सहाव्या प्रश्नातही फिगर नाही. या प्रश्नातही तोच गोंधळ असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याला सर्वस्वी बोर्ड जबाबदार असून परीक्षा पुन्हा घेण्यापेक्षा ते २४ गुण विद्यार्थ्यांना द्यावेत, अन्यथा न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा पालकांनी दिला आहे. लवकरात लवकर बोर्डाने विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.