शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

महांकाली कारखान्याच्या कामगारांचा मोर्चा: थकीत पगारासह भविष्य निर्वाह निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:37 IST

अकरा महिन्यांच्या थकीत पगारासह इतर मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या हजारो कामगारांनी गुरुवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन , उपदान देण्याची मागणी; तीव्र आंदोलनाचा इशारा

कवठेमहांकाळ : अकरा महिन्यांच्या थकीत पगारासह इतर मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या हजारो कामगारांनी गुरुवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

महांकाली साखर कारखान्याच्या कामगारांनी २४ एप्रिलपासून थकीत पगार, प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी मिळावी, यासाठी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. परंतु कारखाना प्रशासनाने कामगारांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने कामगार संतप्त झाले. त्यांनी गुरुवारी हजारोंच्या संख्येने थेट रस्त्यावर उतरत मोर्चा काढला. मोर्चाला कारखान्यापासून सुरुवात झाली. शहरातील मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा युववाणी चौक, शिवाजी चौक यामार्गे मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयाच्या आवारात आला. यावेळी ‘घामाचे दाम मिळालेच पाहिजे’, ‘गली गली मे शोर है कारखानदार चोर है’, ‘वेतन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

तहसील कार्यालयाच्या आवारात मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी कामगार नेते नेताजी पाटील म्हणाले की, १५ वर्षे झाली कामगारांची गळचेपी सुरू आहे. कामगारांचे संसार देशोधडीला लागले. मात्र कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांची संपत्ती शेकडो कोटीत गेली आहे. याची चौकशी झाली पाहिजे. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता हे आंदोलन मागे घेणार नाही. हा निर्णायक लढा आम्ही जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला. खराडे म्हणाले, कारखान्याच्या कामगारांना न्याय मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना कामगारांच्या पाठीशी ठाम उभी राहील. तसेच कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक मनोज सगरे यांच्या संपत्तीची चौकशी करावी आणि त्यांना हटवावे.

बळीराजा संघटनेचे नेते उमेश पाटील म्हणाले, कामगारांच्या कष्टावर हा कारखाना नावारूपाला आला आहे. मात्र कारखाना अध्यक्ष व कार्यकारी संचालक हा कारखाना स्वत:चा असल्यासारखे वागत आहेत. कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे.यावेळी सूरज पाटील, महादेव माळी, उद्धव पाटील, पंडितराव शिंदे, नारायण पाटील, हणमंत कुंभारकर, शहाजी कोळेकर, कलाप्पा फुटाणे, विठ्ठल जाधव, नंदकुमार पाटील यांच्यासह साखर कारखान्याचे हजारो कामगार आंदोलनामध्ये सहभागी होते.राज्यकर्त्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्षनिवडणुकीवेळी मतांचे राजकारण करणारे, उपेक्षित, वंचित, कामगारांचे स्वत:ला नेते म्हणवून घेणारे राजकीय नेते या आंदोलनाकडे फिरकले नाहीत, याची चर्चा कामगारांमध्ये होती. मते मागायला हे लोकप्रतिनिधी आमच्या दारात येऊ देत, त्यांना आम्ही जागा दाखवून देऊ, असे कामगारांनी यावेळी सांगितले.कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या....११ महिन्यांचा थकीत पगार त्वरित द्यावा.३६ महिन्यांची ग्रॅच्युईटी आणि फंडाची रक्कम भरावी.कामगारांना महिन्याच्या महिन्याला पगार देण्यात यावा.कारखाना प्रशासनाची सीबीआय चौकशी करण्यात यावी.शेतकऱ्यांची बिले द्यावीत.कारखान्यावरील कर्जाचा व व्याजाचा आकडा त्वरित जाहीर करावा.संपत्तीची चौकशी कराबळीराजा शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी कामगारांना आधार देत पाठिंबा दिला. प्रभारी कार्यकारी संचालक मनोज सगरे व कारखाना अध्यक्ष यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केली.प्रथमच रस्त्यावरकारखान्याच्या स्थापनेच्या इतिहासात प्रथमच कामगारांनी कारखाना प्रशासनाच्या अन्यायाविरोधात एकीची वज्रमूठ बांधत आंदोलन केले. याची तालुकाभर चर्चा होती.

 

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप