शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलाशिवाय म्हैसाळचे पाणी नाही

By admin | Updated: March 8, 2015 00:21 IST

संजय पाटील : मिरजेतील बैठकीत शेतकऱ्यांना वीज बिलाचे पैसे भरण्याचे आवाहन

मिरज : म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर मोठे बागायत क्षेत्र अवलंबून आहे. थकित बिलांसाठी आवर्तन रखडल्यास त्याची शेतकऱ्यांना किंमत मोजावी लागेल. टंचाई निधी मिळणार नसल्याने थकित वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मिरजेत सर्वपक्षीय बैठकीत खा. संजय पाटील यांनी केले. खा. पाटील यांच्या आवाहनानुसार दि. ९ मार्च (सोमवार) पासून गावनिहाय वसुली मोहीम राबविण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. मिरज पंचायत समितीच्या सभागृहात म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु करण्यासाठी व योजनेच्या थकित बिलांवर चर्चा करण्यासाठी खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, सभापती दिलीप बुरसे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. योजनेचे कार्यकारी अभियंता एम. एस. धुळे यांनी म्हैसाळ योजनेच्या वीज वितरण कंपनीचे आक्टोबरपर्यंत व्याजासह ५ कोटी ६९ लाख रुपये वीज बिल थकित आहे. १ कोटी ६२ लाख रुपयेचा टंचाई निधी वजा करता ४ कोटी ७ लाख रुपये भरल्याशिवाय ही योजना सुरु करता येणार नाही, असे सांगितले.आर. आर. पाटील, खंडेराव जगताप, तानाजी पाटील यांनी ४ कोटी ७ लाखांच्या वसुलीचे गावनिहाय उद्दिष्ट दिल्यास वसुलीसाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली. जि. प. सदस्य प्रकाश कांबळे यांनी टंचाई निधीतून पाणी सोडण्याची मागणी केली. खा. संजय पाटील म्हणाले, सध्या टंचाई परिस्थिती नसल्याने शासनाकडून निधी मिळणार नाही. जे होणार नाही, त्या गोष्टी मागण्यात अर्थ नाही. म्हैसाळ योजनेचे पाणी व विजेचे १५ कोटी बिल थकित आहे. पाणीपट्टी भरण्याचे बाजूला ठेवूया, मात्र ५ कोटी ६९ लाख वीजबिल थकित आहे. टंचाई निधीतून १ कोटी ६२ लाख उपलब्ध झाल्याने ४ कोटी ७ लाख रुपये भरल्याशिवाय योजना सुरु होणार नाही. शेतकऱ्यांनी ती भरल्याशिवाय योजना सुरु होणार नाही, असे स्पष्ट करुन ते म्हणाले की, वीज नियामक आयोगाचे आदेश असल्याने शेतकऱ्यांनी ही विजेची थकबाकी भरण्यास सहकार्य केले तरच आवर्तन सुरु होणार आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर बागायतक्षेत्र अवलंबून आहे. थकित बिलासाठी योजनेचे आवर्तन रखडल्यास पाण्याअभावी होणाऱ्या नुकसानीची शेतकऱ्यांना किंमत मोजावी लागणार आहे. याची दखल घेऊन राजकारण बाजूला ठेवून गावनिहाय बैठका घेऊन थकित बिलाच्या उद्दिष्टानुसार वसुलीस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनानुसार दि. ९ मार्चपासून गावनिहाय वसुली मोहीम राबविण्याचा बैठकीत निर्णय झाला. शेतकऱ्यांना वसुलीच्या प्रबोधनासाठी सर्वपक्षीय समिती नेमण्यात येणार असल्याचे यावेळी आ. सुरेश खाडे यांनी सांगितले. भविष्यात पाणीपट्टीची व विजेचे बिले थकित होऊ नयेत यासाठी सोसायट्या व साखर कारखान्यांच्या माध्यमातून वसुली करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. याबाबत सहकार विभागाशी चर्चा करणार असल्याचे खा. पाटील व आ. खाडे यांनी सांगितले. तहसीलदार किशोर घाटगे, सहाय्यक गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, दीपक शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे, सतीश निळकंठ यांच्यासह पाटबंधारेचे अधिकारी उपस्थित होते.शेतकरी संघटनेचा वसुलीस विरोधशेतकरी संघटनेचे महादेव कोरे यांनी पाणीपट्टी वसुलीस विरोध केला. महावितरणला शासन अनुदान देते. तसे प्रतिज्ञापत्र महावितरणने उच्च न्यायालयात दिले आहे. त्यामुळे बिलाची अट न घालता योजनेचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली. खा. पाटील व आ. खाडे यांनी तो बैठकीचा विषय नाही, असे म्हणत कोरे यांच्या मागणीला बगल दिली.