शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

वीज बिलाशिवाय म्हैसाळचे पाणी नाही

By admin | Updated: March 8, 2015 00:21 IST

संजय पाटील : मिरजेतील बैठकीत शेतकऱ्यांना वीज बिलाचे पैसे भरण्याचे आवाहन

मिरज : म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर मोठे बागायत क्षेत्र अवलंबून आहे. थकित बिलांसाठी आवर्तन रखडल्यास त्याची शेतकऱ्यांना किंमत मोजावी लागेल. टंचाई निधी मिळणार नसल्याने थकित वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मिरजेत सर्वपक्षीय बैठकीत खा. संजय पाटील यांनी केले. खा. पाटील यांच्या आवाहनानुसार दि. ९ मार्च (सोमवार) पासून गावनिहाय वसुली मोहीम राबविण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. मिरज पंचायत समितीच्या सभागृहात म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु करण्यासाठी व योजनेच्या थकित बिलांवर चर्चा करण्यासाठी खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, सभापती दिलीप बुरसे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. योजनेचे कार्यकारी अभियंता एम. एस. धुळे यांनी म्हैसाळ योजनेच्या वीज वितरण कंपनीचे आक्टोबरपर्यंत व्याजासह ५ कोटी ६९ लाख रुपये वीज बिल थकित आहे. १ कोटी ६२ लाख रुपयेचा टंचाई निधी वजा करता ४ कोटी ७ लाख रुपये भरल्याशिवाय ही योजना सुरु करता येणार नाही, असे सांगितले.आर. आर. पाटील, खंडेराव जगताप, तानाजी पाटील यांनी ४ कोटी ७ लाखांच्या वसुलीचे गावनिहाय उद्दिष्ट दिल्यास वसुलीसाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली. जि. प. सदस्य प्रकाश कांबळे यांनी टंचाई निधीतून पाणी सोडण्याची मागणी केली. खा. संजय पाटील म्हणाले, सध्या टंचाई परिस्थिती नसल्याने शासनाकडून निधी मिळणार नाही. जे होणार नाही, त्या गोष्टी मागण्यात अर्थ नाही. म्हैसाळ योजनेचे पाणी व विजेचे १५ कोटी बिल थकित आहे. पाणीपट्टी भरण्याचे बाजूला ठेवूया, मात्र ५ कोटी ६९ लाख वीजबिल थकित आहे. टंचाई निधीतून १ कोटी ६२ लाख उपलब्ध झाल्याने ४ कोटी ७ लाख रुपये भरल्याशिवाय योजना सुरु होणार नाही. शेतकऱ्यांनी ती भरल्याशिवाय योजना सुरु होणार नाही, असे स्पष्ट करुन ते म्हणाले की, वीज नियामक आयोगाचे आदेश असल्याने शेतकऱ्यांनी ही विजेची थकबाकी भरण्यास सहकार्य केले तरच आवर्तन सुरु होणार आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर बागायतक्षेत्र अवलंबून आहे. थकित बिलासाठी योजनेचे आवर्तन रखडल्यास पाण्याअभावी होणाऱ्या नुकसानीची शेतकऱ्यांना किंमत मोजावी लागणार आहे. याची दखल घेऊन राजकारण बाजूला ठेवून गावनिहाय बैठका घेऊन थकित बिलाच्या उद्दिष्टानुसार वसुलीस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनानुसार दि. ९ मार्चपासून गावनिहाय वसुली मोहीम राबविण्याचा बैठकीत निर्णय झाला. शेतकऱ्यांना वसुलीच्या प्रबोधनासाठी सर्वपक्षीय समिती नेमण्यात येणार असल्याचे यावेळी आ. सुरेश खाडे यांनी सांगितले. भविष्यात पाणीपट्टीची व विजेचे बिले थकित होऊ नयेत यासाठी सोसायट्या व साखर कारखान्यांच्या माध्यमातून वसुली करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. याबाबत सहकार विभागाशी चर्चा करणार असल्याचे खा. पाटील व आ. खाडे यांनी सांगितले. तहसीलदार किशोर घाटगे, सहाय्यक गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, दीपक शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे, सतीश निळकंठ यांच्यासह पाटबंधारेचे अधिकारी उपस्थित होते.शेतकरी संघटनेचा वसुलीस विरोधशेतकरी संघटनेचे महादेव कोरे यांनी पाणीपट्टी वसुलीस विरोध केला. महावितरणला शासन अनुदान देते. तसे प्रतिज्ञापत्र महावितरणने उच्च न्यायालयात दिले आहे. त्यामुळे बिलाची अट न घालता योजनेचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली. खा. पाटील व आ. खाडे यांनी तो बैठकीचा विषय नाही, असे म्हणत कोरे यांच्या मागणीला बगल दिली.