शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
4
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
5
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
6
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
7
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
8
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
9
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
10
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
11
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
12
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
13
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
14
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
15
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
16
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
17
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
18
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
19
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...

तुकडा तांदळावरील निर्यातबंदी तातडीने मागे घ्या, किसान सभेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 12:16 IST

सरकारने पंधरवड्यापूर्वी तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली

सांगली : केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घेण्याची मागणी किसान सभेने केली आहे. निर्यातबंदीमुळे भात उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचे म्हटले आहे.सरकारने पंधरवड्यापूर्वी तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरही २० टक्के निर्यात कर लागू केला. त्यावर सभेने तीव्र प्रतिक्रिया नोंदविली आहे. प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, कांदा, गहू आणि तांदळावर निर्यातबंदी लागू करून सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. यावर्षी खरीप हंगामात भात उत्पादन घटून ६० ते ७० लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात दर वाढले आहेत.पशुखाद्य आणि इथेनॉल मिश्रणासाठी उपलब्धता घटल्याने निर्यातबंदी लागू केल्याचा युक्तिवाद सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र मुबलक तांदूळ उपलब्ध आहे. निर्यातबंदीची आवश्यकता अजिबात नाही. एकूण उत्पादनाच्या तुलनेत यंदा केवळ ४.५ ते ५ टक्के घट होणार आहे. सन २०२१-२२ मध्ये विक्रमी १३०२.९ लाख टन उत्पादन झाले होते. त्याआधीच्या वर्षी १२४३.७ लाख टन झाले होते. ही आकडेवारी पाहता निर्यातबंदीची गरज नाही. निवेदनावर डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले आदींच्या सह्या आहेत.कार्पोरेट कंपन्यांच्या नफ्यासाठीच निर्यातबंदीबफर स्टॉकसाठी १३५ लाख टन तांदूळ लागतो. प्रत्यक्षात अन्न महामंडळाकडे ४७० लाख टन साठा उपलब्ध आहे. गरजेपेक्षा ३३५ लाख टन अधिक उपलब्ध आहे. अतिरिक्त तांदळाचे काय करायचे, असा प्रश्न आहे. भाव पाडून कॉर्पोरेट कंपन्यांच्या नफ्यासाठीच निर्यातबंदी लागू केली आहे. ती मागे घेतली नाही, तर भात उत्पादक रस्त्यावर उतरतील असे किसान सभेने म्हटले आहे.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार