शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

तुकडा तांदळावरील निर्यातबंदी तातडीने मागे घ्या, किसान सभेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 12:16 IST

सरकारने पंधरवड्यापूर्वी तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली

सांगली : केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घेण्याची मागणी किसान सभेने केली आहे. निर्यातबंदीमुळे भात उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचे म्हटले आहे.सरकारने पंधरवड्यापूर्वी तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरही २० टक्के निर्यात कर लागू केला. त्यावर सभेने तीव्र प्रतिक्रिया नोंदविली आहे. प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, कांदा, गहू आणि तांदळावर निर्यातबंदी लागू करून सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. यावर्षी खरीप हंगामात भात उत्पादन घटून ६० ते ७० लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात दर वाढले आहेत.पशुखाद्य आणि इथेनॉल मिश्रणासाठी उपलब्धता घटल्याने निर्यातबंदी लागू केल्याचा युक्तिवाद सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र मुबलक तांदूळ उपलब्ध आहे. निर्यातबंदीची आवश्यकता अजिबात नाही. एकूण उत्पादनाच्या तुलनेत यंदा केवळ ४.५ ते ५ टक्के घट होणार आहे. सन २०२१-२२ मध्ये विक्रमी १३०२.९ लाख टन उत्पादन झाले होते. त्याआधीच्या वर्षी १२४३.७ लाख टन झाले होते. ही आकडेवारी पाहता निर्यातबंदीची गरज नाही. निवेदनावर डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले आदींच्या सह्या आहेत.कार्पोरेट कंपन्यांच्या नफ्यासाठीच निर्यातबंदीबफर स्टॉकसाठी १३५ लाख टन तांदूळ लागतो. प्रत्यक्षात अन्न महामंडळाकडे ४७० लाख टन साठा उपलब्ध आहे. गरजेपेक्षा ३३५ लाख टन अधिक उपलब्ध आहे. अतिरिक्त तांदळाचे काय करायचे, असा प्रश्न आहे. भाव पाडून कॉर्पोरेट कंपन्यांच्या नफ्यासाठीच निर्यातबंदी लागू केली आहे. ती मागे घेतली नाही, तर भात उत्पादक रस्त्यावर उतरतील असे किसान सभेने म्हटले आहे.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार