शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मिरज लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण, कर्नाटकात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस विजेवर धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 16:44 IST

सदानंद औंधे मिरज : मिरज लोंढा मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने मिरज बंगळुरू मार्गावर १५ जूनपासून विद्युत इंजिनावर गाड्या धावणार ...

सदानंद औंधेमिरज : मिरज लोंढा मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने मिरज बंगळुरू मार्गावर १५ जूनपासून विद्युत इंजिनावर गाड्या धावणार आहेत. मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्या विजेवर धावणार असल्याने रेल्वे प्रवास जलद होणार आहे.पुणे-मिरज-लोंढा मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण गेली सात वर्षे सुरू आहे. मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज या २८० किमी व दक्षिण पश्चिम रेल्वेच्या मिरज लोंढा या १६० किमी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण करण्यात येत आहे. लोंढा मिरज दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले, मात्र विद्युतीकरणाचे काम बाकी होते. कुडची ते मिरज या २० किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात असून, १५ जूनपासून या मार्गावर विद्युत इंजिनावर रेल्वेगाड्या धावणार असल्याचे दक्षिण पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे.पुणे-मिरजदरम्यान एका मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने गेल्या वर्षभर मिरज पुणेदरम्यान विद्युत इंजिनावर रेल्वेगाड्या धावत आहेत. मात्र बेळगाव मिरजदरम्यान विद्युतीकरणाचे काम अपूर्ण असल्याने बंगळुरू ते पुणे धावणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या डिझेल इंजिनावर सोडण्यात येत होत्या. या गाड्यांचे डिझेल इंजिन पुण्यात बदलून विद्युत इंजिन जोडण्यात येत होते. आता या रेल्वेमार्गावर रेल्वे इंजिन बदलण्याची गरज राहिली नाही.

पुणे ते लोंढा विद्युतीकरण पूर्ण झाल्याने पुणे-मिरज-बंगलोर दरम्यान सर्वच एक्स्प्रेस गाड्या विद्युत इंजिनवर धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून, हे दुहेरीकरण पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभर लागणार आहे. मात्र मिरज - लोंढादरम्यान दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्याने १५ जूनपासून हरिप्रिया एक्स्प्रेस, राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस, हुबळी-दादर एक्स्प्रेस, दादर तिरुनेलवेल्ली एक्स्प्रेस, अजमेर, जोधपूर, गांधी धाम एक्स्प्रेस या कर्नाटकात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्या विद्युत इंजिनवर धावणार आहेत.यामुळे रेल्वे प्रवास जलद होणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. पुणे - मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर मिरज स्थानकातून दक्षिण व उत्तर भारतात जाणाऱ्या नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरू होणार आहेत. मुंबई-कोल्हापूर व मिरज-सोलापूर मार्गावर नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे. हे दुहेरी रेल्वेमार्ग सुरू झाल्याने मिरज जंक्शन स्थानकाचे महत्त्व आणखी वाढणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजKarnatakकर्नाटकrailwayरेल्वेelectricityवीज