शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहीन करणारा 'शक्तिपीठ' नको, अडीच लाखांवर शेतकरी सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविणार 

By अशोक डोंबाळे | Updated: April 13, 2024 18:30 IST

महामार्ग शेती बचाव कृती समितीचा पुढाकार

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाची आमच्यासह कुणाचीच मागणी नसताना शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यासाठी कशासाठी करत आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी करणारे निवेदन दोन लाख ५१ हजार शेतकरी पाठविणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला नाही तर सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर येतील, असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे.शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील १९ गावांतून जात आहे. या सर्व गावांतील हजारो हेक्टर जमीन बाधित होणार आहे. शक्तिपीठ महामार्ग बाधित क्षेत्रातील दोन लाख ५१ हजार शेतकरी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन पाठविणार आहेत.या निवेदनात म्हटले, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जमिनी बागायती करण्यासाठी कर्ज काढून भांडवल उभारले आहे. शेततळी काढली आहेत. विहिरी, कूपनलिकांची खुदाई केली आहे. फळझाडांची मोठ्या प्रमाणात लागण केली आहे. हा महामार्ग झाल्यास शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे. केंद्र शासनाच्या २०१३ च्या जमीन अधिग्रहण कायद्याची राज्य सरकारने ज्याप्रमाणे मोडतोड केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला पुरेसा मिळणार नाही. उलट शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. मिरज तालुक्यातील गावांची आणखी बिकट परिस्थिती होणार आहे.दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर येत असते. अगोदरच रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी भराव पडला आहे. भविष्यात या महामार्गापासून भराव पडल्यास पाण्याचा निचरा होणार नाही. उलट दरवर्षी पूरजन्य परिस्थिती तयार होणार आहे. त्याचा परिणाम सांगली शहर आणि मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांवर होणार आहे. दरवर्षी पूरजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. हा महामार्ग ज्या कारणासाठी निर्माण केला जातो आहे, ती देवस्थाने जोडण्यासाठी. या महामार्गाला समांतर असणारा रत्नागिरी ते नागपूर, विजापूर ते गुहागर असे पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत.या नवीन महामार्गाचा अट्टाहास कशासाठी ? शेतकरी, सामान्य नागरिक यांच्या मुळावर येणारा महामार्ग रद्द झाला पाहिजे, म्हणून ही सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील नागरिकांनी सह्यांच्या मोहिमेत शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी केले आहे.

कोणत्याही परिस्थितीत 'शक्तिपीठ' नकोच : उमेश देशमुखशक्तिपीठ महामार्ग स्वतंत्र असण्याची काहीच गरज नाही. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गापासून रत्नागिरी, विजापूर ते गुहागर असे अनेक महामार्ग आहेत. या महामार्गापासून जवळच अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. असे असताना हजारो कोटी खर्च करुन शेतकऱ्यांना भूमिहीन करुन ठेकेदारांना जगविण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग करण्याची काहीच गरज नाही. या प्रश्नावर आमचे आंदोलन चालूच असणार आहे, अशी प्रतिक्रिया किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदेhighwayमहामार्गFarmerशेतकरी