शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

भूमिहीन करणारा 'शक्तिपीठ' नको, अडीच लाखांवर शेतकरी सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविणार 

By अशोक डोंबाळे | Updated: April 13, 2024 18:30 IST

महामार्ग शेती बचाव कृती समितीचा पुढाकार

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाची आमच्यासह कुणाचीच मागणी नसताना शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यासाठी कशासाठी करत आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी करणारे निवेदन दोन लाख ५१ हजार शेतकरी पाठविणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला नाही तर सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर येतील, असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे.शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील १९ गावांतून जात आहे. या सर्व गावांतील हजारो हेक्टर जमीन बाधित होणार आहे. शक्तिपीठ महामार्ग बाधित क्षेत्रातील दोन लाख ५१ हजार शेतकरी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन पाठविणार आहेत.या निवेदनात म्हटले, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जमिनी बागायती करण्यासाठी कर्ज काढून भांडवल उभारले आहे. शेततळी काढली आहेत. विहिरी, कूपनलिकांची खुदाई केली आहे. फळझाडांची मोठ्या प्रमाणात लागण केली आहे. हा महामार्ग झाल्यास शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे. केंद्र शासनाच्या २०१३ च्या जमीन अधिग्रहण कायद्याची राज्य सरकारने ज्याप्रमाणे मोडतोड केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला पुरेसा मिळणार नाही. उलट शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. मिरज तालुक्यातील गावांची आणखी बिकट परिस्थिती होणार आहे.दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर येत असते. अगोदरच रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी भराव पडला आहे. भविष्यात या महामार्गापासून भराव पडल्यास पाण्याचा निचरा होणार नाही. उलट दरवर्षी पूरजन्य परिस्थिती तयार होणार आहे. त्याचा परिणाम सांगली शहर आणि मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांवर होणार आहे. दरवर्षी पूरजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. हा महामार्ग ज्या कारणासाठी निर्माण केला जातो आहे, ती देवस्थाने जोडण्यासाठी. या महामार्गाला समांतर असणारा रत्नागिरी ते नागपूर, विजापूर ते गुहागर असे पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत.या नवीन महामार्गाचा अट्टाहास कशासाठी ? शेतकरी, सामान्य नागरिक यांच्या मुळावर येणारा महामार्ग रद्द झाला पाहिजे, म्हणून ही सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील नागरिकांनी सह्यांच्या मोहिमेत शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी केले आहे.

कोणत्याही परिस्थितीत 'शक्तिपीठ' नकोच : उमेश देशमुखशक्तिपीठ महामार्ग स्वतंत्र असण्याची काहीच गरज नाही. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गापासून रत्नागिरी, विजापूर ते गुहागर असे अनेक महामार्ग आहेत. या महामार्गापासून जवळच अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. असे असताना हजारो कोटी खर्च करुन शेतकऱ्यांना भूमिहीन करुन ठेकेदारांना जगविण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग करण्याची काहीच गरज नाही. या प्रश्नावर आमचे आंदोलन चालूच असणार आहे, अशी प्रतिक्रिया किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदेhighwayमहामार्गFarmerशेतकरी