शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

दुष्काळाच्या यादीतून चार तालुके वंचित ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना भेटणार; सांगलीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी शासनाकडे न्याय मागणार

By अशोक डोंबाळे | Updated: October 20, 2023 17:48 IST

सांगली : यंदा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. ...

सांगली : यंदा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. मात्र जत, आटपाडी, खानापूर आणि कवठेमहांकाळ या तालुक्यात कमी पाऊस होऊनही पावसाचे मूल्यांकन करणाऱ्या नागपूरच्या कंपनीकडून शासनाला चुकीची माहिती दिली आहे. म्हणूनच हे चार तालुके दुष्काळग्रस्त यादीतून बाहेर राहिले आहेत. या प्रश्नावर जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री खाडे बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते.मंत्री सुरेश खाडे म्हणाले, जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दुष्काळाचे मूल्यांकन करण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे. खरीप हंगामात दुष्काळाचे मूल्यांकन महामदत प्रणालीमार्फत केले. जिल्हानिहाय दुष्काळ तीव्रतेचे निकष लागू झालेले तालुके निश्चित केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील तीन तालुक्यांना हे निकष लागू आहेत.मिरज, तासगाव आणि कडेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. राज्यातील सर्वांत कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यात सांगली जिल्ह्याचा समावेश असल्याचे सर्वश्रूत आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि खानापूर या तालुक्यात सर्वांत कमी पाऊस झाला आहे. परंतु, हे तालुके दुष्काळग्रस्त यादीतून शासनाने वगळल्याची बाब गंभीर आहे. क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी नागपूर येथील महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपयोजना केंद्राची निवड केली आहे.संबंधीत कंपनीने सखोल सर्वेक्षण करण्याची गरज होती. मात्र, चुकीची आकडेवारी त्यांनी शासनाकडे दिली आहे. यंत्रणा कशी चुकली, याबाबतचा जाब विचारला जाईल. जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार, आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना भेटून कंपनीच्या चुकीचा कारभार त्यांच्यासमोर मांडणार आहे.

सिंचन योजनांचे वीजबिल टंचाई निधीतूनजिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पिकांना पाण्याची गरज असल्याने सिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी दिले जात असताना योजनांच्या वीजबिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु वीजबिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढणार नाही. टंचाईच्या निधीतून वीजबिल भरण्याबाबतचा विचार सुरू आहे, असेही मंत्री खाडे म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदेdroughtदुष्काळ