शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘अलमट्टी’च्या उंची वाढविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू - सर्जेराव पाटील 

By अशोक डोंबाळे | Updated: December 20, 2024 18:51 IST

उंची वाढविल्याचा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

सांगली : अलमट्टी धरणाची उंची वाढवून पाणी पातळी ५२४.२५६ करण्यात येणार आहे. यासंबंधीची घोषणा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या निर्णयाचा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसणार असल्यामुळे अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील आणि सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्राला पूर परिस्थितीचा धोका वाढणार आहे. कर्नाटकच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला सांगलीच्या कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने विरोध दर्शवला आहे. सध्या अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्याला फटका बसत आहे.जर पुन्हा कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास याची व्याप्ती आणखी वाढून थेट कऱ्हाडपर्यंत आणि कोल्हापूरच्या शिरोळबरोबर कर्नाटकच्या चिकोडीपर्यंत सगळे बुडण्याचा धोका आहे. कर्नाटक सरकारच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकार याचिका दाखल करणार नसेल तर कृष्णा महापूर नियंत्रण समितीतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आताच पूर, उंची वाढविल्यास महापूरसध्या अलमट्टी धरणाची उंची ५१९.६० मीटर इतकी आहे. सध्याच्या उंचीमुळे सांगलीपर्यंत बॅकवॉटर पूर येत आहे. कोल्हापूरच्या नरसोबावाडीपर्यंत फुग निर्माण होते. २००५, २०१९ आणि २०२१ मध्ये अलमट्टीचे बॅकवॉटर सांगली-कोल्हापूरच्या पुराला कारणीभूत असल्याचं समोर आलं होतं. आता अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. ५२४.६८ मीटर इतकी उंची करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापूर कायमचा असेल, असे मत प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केले.

चार जिल्ह्यांना फटकासांगली, सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याला कृष्णेच्या महापुराचा फटका बसू शकतो. सांगलीच्या पलूसपर्यंतचा बॅक वॉटर, सातारच्या कऱ्हाडपर्यंत जाण्याची शक्यता. कोल्हापूरच्या नरसोबावाडीपासून शिरोळ तालुक्यातील अनेक गाव महापुरात बुडण्याची भीती व्यक्त होत आहे. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्याला देखील अधिकचा फटका बसण्याची शक्यता आहे. चिक्कोडीपर्यंत अलमट्टी धरणाच्या पाण्याचे बॅकवॉटर जाऊ शकते, अशी भीती देखील प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकDamधरणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय