शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार मराठा आरक्षण देणार का? : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:34 IST

सांगली : राज्यातील भाजपचे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवत असून संघाचा सर्वच आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळे राज्यातील भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे का? त्यांच्या भूमिकेविषयी आमच्या मनात शंका आहे. सरकारने अंत पाहू नये. वेळकाढूपणा केल्याबद्दल भाजपने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी सांगली ...

ठळक मुद्देकाँग्रेस आमदारांची दोन दिवसांत बैठक

सांगली : राज्यातील भाजपचे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवत असून संघाचा सर्वच आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळे राज्यातील भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे का? त्यांच्या भूमिकेविषयी आमच्या मनात शंका आहे. सरकारने अंत पाहू नये. वेळकाढूपणा केल्याबद्दल भाजपने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी सांगलीत केली. मराठा आंदोलनाबाबत दोन दिवसात काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी चव्हाण सांगलीत आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनुसूचित जाती, जमातींना आरक्षण देण्यास विरोध केला होता. त्यांची भूमिका आरक्षणविरोधी राहिली आहे. भाजपचे सरकार तेच लोक चालवित आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या भूमिकेविषयी शंका येते. न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी भाजपला साडेतीन वर्षे लागली. शिष्यवृत्त्या, वसतिगृहांनी मराठा समाजाचे समाधान होणार नाही. आता सरकार आंदोलकांशी चर्चा करणार आहे. पण नेमकी चर्चा कोणाशी करणार? चर्चा करताना अजेंडा हवा. तोही भाजपकडे नाही. चर्चेवेळी न्यायालयाची पुढची तारीख कधी आहे, हे सांगणार आहात का?मराठा आरक्षणाबाबत काँग्रेस आघाडी सरकारवर आरोप केले जातात, पण ते साफ चुकीचे आहेत. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकीमुळे विधिमंडळाचे अधिवेशन होणार नसल्याचा अध्यादेश काढला. तो कायदेशीरच होता. पण नंतर सत्ताबदल होऊन भाजपचे सरकार आले. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवला. मुस्लिम आरक्षण रद्द केले. धनगर समाजाच्या आरक्षणाची आरोळी ठोकली, पण तेही दिले नाही. त्यामुळे आता सरकारच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी मराठा समाजाच्या आंदोलनात आक्रमकता आली. सरकारला पुन्हा विश्वास निर्माण करावा लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान सोडवू शकत नाहीत. ते न्यायालयावर दबाव आणणार आहेत का? दुसरीकडे शंभर वकिलांची फौज उभी करतो, असे भाजप सरकार म्हणत आहे. पण त्यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.बातमीला जोड....भ्रष्ट व अपयशी सरकारदेशातील व राज्यातील भाजप सरकार भ्रष्ट व अपयशी आहे. विधिमंडळात सिडकोचा १७०० कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. अखेर हा व्यवहार रद्द करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंचीही कमी केली. शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची आम्ही १६० मीटर ठेवली होती. भाजपने ती १२६ मीटर केली. मात्र सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची १५७ मीटर ठेवली आहे. सरकारच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. गतवर्षी ३० टक्के विकासकामांना कात्री लावली होती. शिवरायांच्या स्मारकाचा खर्च कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. नागरी प्रशासनातही सरकारला अपयश आल्याची टीका चव्हाण यांनी केली.

 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस