शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

भाजप सरकार मराठा आरक्षण देणार का? : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:34 IST

सांगली : राज्यातील भाजपचे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवत असून संघाचा सर्वच आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळे राज्यातील भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे का? त्यांच्या भूमिकेविषयी आमच्या मनात शंका आहे. सरकारने अंत पाहू नये. वेळकाढूपणा केल्याबद्दल भाजपने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी सांगली ...

ठळक मुद्देकाँग्रेस आमदारांची दोन दिवसांत बैठक

सांगली : राज्यातील भाजपचे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवत असून संघाचा सर्वच आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळे राज्यातील भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे का? त्यांच्या भूमिकेविषयी आमच्या मनात शंका आहे. सरकारने अंत पाहू नये. वेळकाढूपणा केल्याबद्दल भाजपने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी सांगलीत केली. मराठा आंदोलनाबाबत दोन दिवसात काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी चव्हाण सांगलीत आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनुसूचित जाती, जमातींना आरक्षण देण्यास विरोध केला होता. त्यांची भूमिका आरक्षणविरोधी राहिली आहे. भाजपचे सरकार तेच लोक चालवित आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या भूमिकेविषयी शंका येते. न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी भाजपला साडेतीन वर्षे लागली. शिष्यवृत्त्या, वसतिगृहांनी मराठा समाजाचे समाधान होणार नाही. आता सरकार आंदोलकांशी चर्चा करणार आहे. पण नेमकी चर्चा कोणाशी करणार? चर्चा करताना अजेंडा हवा. तोही भाजपकडे नाही. चर्चेवेळी न्यायालयाची पुढची तारीख कधी आहे, हे सांगणार आहात का?मराठा आरक्षणाबाबत काँग्रेस आघाडी सरकारवर आरोप केले जातात, पण ते साफ चुकीचे आहेत. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकीमुळे विधिमंडळाचे अधिवेशन होणार नसल्याचा अध्यादेश काढला. तो कायदेशीरच होता. पण नंतर सत्ताबदल होऊन भाजपचे सरकार आले. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवला. मुस्लिम आरक्षण रद्द केले. धनगर समाजाच्या आरक्षणाची आरोळी ठोकली, पण तेही दिले नाही. त्यामुळे आता सरकारच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी मराठा समाजाच्या आंदोलनात आक्रमकता आली. सरकारला पुन्हा विश्वास निर्माण करावा लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान सोडवू शकत नाहीत. ते न्यायालयावर दबाव आणणार आहेत का? दुसरीकडे शंभर वकिलांची फौज उभी करतो, असे भाजप सरकार म्हणत आहे. पण त्यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.बातमीला जोड....भ्रष्ट व अपयशी सरकारदेशातील व राज्यातील भाजप सरकार भ्रष्ट व अपयशी आहे. विधिमंडळात सिडकोचा १७०० कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. अखेर हा व्यवहार रद्द करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंचीही कमी केली. शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची आम्ही १६० मीटर ठेवली होती. भाजपने ती १२६ मीटर केली. मात्र सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची १५७ मीटर ठेवली आहे. सरकारच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. गतवर्षी ३० टक्के विकासकामांना कात्री लावली होती. शिवरायांच्या स्मारकाचा खर्च कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. नागरी प्रशासनातही सरकारला अपयश आल्याची टीका चव्हाण यांनी केली.

 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस