शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

Sangli Crime: चारित्र्यावरुन संशय, झोपेत असतानाच पत्नीचा बांबूने मारून निर्घृण खून; फरार पतीला काही तासांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:23 IST

गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून अटक

सांगली : चारित्र्याच्या संशयावरून बांधकाम कामगार पतीने पत्नी शीलवंती पिंटू पाटील (वय ३०, रा. राजर्षी शाहूनगर, विजयनगर, सांगली) हिचा बांबूने कपाळावर व डोक्यावर हल्ला करून निर्घृण खून केला. गुरुवारी पहाटे हा प्रकार घडला. खुनानंतर पती पिंटू पाटील (वय ३६) हा दोन लहान मुलांना घेऊन पसार झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आंत्रोळी (ता. मंगळवेढा) येथून त्याला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी आहे. काही वर्षांपासून तो सांगलीत राहताे. गवंड्याच्या हाताखाली किंवा मजुरीची कामे तो करत होता. मूळच्या नंदूर (जि. सोलापूर) येथील परंतु सांगलीत हनुमाननगरमध्ये स्थायिक असलेल्या शीलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. सध्या विजयनगरजवळील राजर्षी शाहूनगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम चालू होते. तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शीलवंती दोन मुलांसह राहत होते. शीलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचे काम करत होती, तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता.काही दिवसांपासून पिंटू याला शीलवंती हिच्या चारित्र्याचा संशय होता. त्यावरून त्यांच्यात सतत वाद होता. तशातच शीलवंती दि. १३ जून रोजी घर सोडून निघून गेली होती. पिंटूने संजयनगर पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. शीलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती. शनिवारी ती घराकडे परत आली होती. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा चारित्र्याच्या संशयावरून भांडण सुरूच होते. शीलवंती परत आल्यानंतर पिंटूने संजयनगर पोलिसांना सांगितले नव्हते.बुधवारी रात्री पिंटू आणि शीलवंती यांच्यात पुन्हा संशयावरून जोरदार वादावादी झाली होती. त्यानंतर शीलवंती झोपल्यानंतर झोपेत असतानाच तिच्या डोक्यावर व कपाळावर बांबूने मारून खून केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला. पिंटूने पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला. त्या व्यक्तीने संजयनगर पोलिसांना कळवले.

त्यानंतर संजयनगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेले ठिकाण शोधले. शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शीलवंती पाटील हिचा खून झाल्याचे आढळून आले. परिसरातील नागरिकांना माहिती समजताच त्यांनी गर्दी केली होती. संजयनगरचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपअधीक्षक विमला एम. यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर तपासाबाबत सूचना केल्या.

गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून अटकपिंटू पाटील हा खुनानंतर दोन्ही मुलांना घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि संजयनगर पोलिसांचे पथक मंगळवेढा, सांगोला तालुक्याकडे रवाना झाले. आंत्रोळी (ता. मंगळवेढा) येथे गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर संजयनगर पोलिसांच्या ताब्यात आणून दिले.

नातेवाइकांचा आक्रोशशीलवंती पाटील हिची आई, भाऊ तसेच हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या नातेवाइकांना तिच्या खुनाची माहिती मिळताच ते दुपारी घटनास्थळी आले. त्यांनी शीलवंतीचा मृतदेह पाहून आक्रोश केला. शीलवंतीचा भाऊ आणि आई यांना तिच्या मृत्यूचा धक्का बसल्याचे दिसून आले.