शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

सांगलीच्या पाण्यात शंभूराज देसाईंची आडकाठी कशासाठी?, पाणी टंचाईवरुन पालकमंत्री अडकले प्रश्नांच्या पिंजऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 16:35 IST

सातारा जिल्ह्यात कोयना धरण असल्याने तेथील पालकमंत्री शंभूराजे देसाई दादागिरी करत आहेत का?

सांगली : पाण्याअभावी कृष्णा नदी कोरडीठाक पडली असताना, पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये गेलेल्या पालकमंत्री सुरेश खाडे यांना शुक्रवारी प्रश्नांच्या फैरींचा सामना करावा लागला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत पत्रकारांच्या प्रश्नांना तोंड देताना त्यांची पुरेवाट झाली.आठवडाभरापासून कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडलेले असताना साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी फक्त एक टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. यावर पालकमंत्र्यांना थेट खुलासा करता आला नाही. प्रश्नांच्या फैरीत ते अडकले. 

पालकमंत्र्यांना निरुत्तर करणारे प्रश्न असे :

  • कृष्णेत पाणी सोडण्यासाठी कालवा समितीच्या बैठकीची वाट पाहण्याची गरज होती काय?
  • सातारा जिल्ह्यात कोयना धरण असल्याने तेथील पालकमंत्री शंभूराजे देसाई दादागिरी करत आहेत का?
  • कृष्णेतील टंचाईप्रश्नी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची संयुक्त बैठक का घेतली नाही?
  • काँग्रेस, राष्ट्रवादी रस्त्यावर आल्याने पाणी सोडावे लागले का?
  • पाण्यासाठी सांगली व सातारा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांत समन्वय आणि संवाद कमी पडतोय का?
  • साताऱ्याचे पालकमंत्री धरण आपल्या मालकीचे असल्याप्रमाणे का वागताहेत?
टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणीShambhuraj Desaiशंभूराज देसाई