शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

तेढ नसताना जतला पोलीस फौजफाटा कशाला?, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 13:11 IST

शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडूनच ही वसुली करुन घ्यावी

जत : कोणतीही जातीय, राजकीय दंगल, खून, मारामारी असा कोणताही प्रकार घडला नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा पोलीस फौजफाटा जत शहरात तैनात केला आहे. शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडूनच ही वसुली करुन घ्यावी, अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी घेतल्याशिवाय बसविला जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे आम्हाला त्यांचे विचार पटले नाहीत. त्यामुळे आम्ही बैठक सोडून बाहेर आलो. यापूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विनापरवाना मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. तासगाव आणि विश्वजीत कदम यांच्या मतदारसंघात मूर्ती बसविण्यात आली आहे.कदम व त्यांचे नातेवाईक आ. विक्रम सावंत यांनी प्रशासनावर दबाव टाकल्याने शिवाजी पुतळा उभारणीत आडकाठी आणली गेली. जिल्हाधिकाऱ्यांनी विनाकारण तीन उपाधीक्षक, बारा पोलीस निरीक्षक, यासह बाराशे पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. कोणतीही राजकीय दंगल, खून, मारामारी असे प्रकार झाले नसताना शहराला छावणीचे स्वरूप देण्यात आले आहे.

ते म्हणाले की, कोरोना काळात विविध वैद्यकीय उपचारांसाठी कोट्यवधींचा खर्च दाखविला आहे. याला स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमुळे पोलीस बंदोबस्तावर शासनाचा दीड ते दोन लाख खर्च पडत आहे. हा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा. मी स्वतःच्या हिमतीवर दोन वेळा कारखान्यावर, बँकेवर व आमदार म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे राजकीय स्टंट करण्याचा संबंधच येत नाही. उलट जिल्हा बँकेत पराभव झाल्याने अस्तित्व संपण्याची भीती वाटत असल्याने आ. सावंत माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत.

जयंतरावांच्या भेटीनंतर पुढील निर्णय

शिवाजी पुतळ्याबाबत वर्गणी गोळा करायला वेळ लागला, त्यामुळे पुतळ्याचे काम रखडले. हे आम्ही मान्य करतो. मात्र, आमदार सावंत यांनी एका पैशाचीही मदत या पुतळ्यासाठी दिली नाही. पुतळा बसवू नये यासाठी पोलिसांचा प्रचंड दबाव आला आहे. यासाठी आम्ही पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार असून, त्यानंतरच पुढील दिशा ठरेल, असे जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज