शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तेढ नसताना जतला पोलीस फौजफाटा कशाला?, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 13:11 IST

शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडूनच ही वसुली करुन घ्यावी

जत : कोणतीही जातीय, राजकीय दंगल, खून, मारामारी असा कोणताही प्रकार घडला नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा पोलीस फौजफाटा जत शहरात तैनात केला आहे. शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडूनच ही वसुली करुन घ्यावी, अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी घेतल्याशिवाय बसविला जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे आम्हाला त्यांचे विचार पटले नाहीत. त्यामुळे आम्ही बैठक सोडून बाहेर आलो. यापूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विनापरवाना मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. तासगाव आणि विश्वजीत कदम यांच्या मतदारसंघात मूर्ती बसविण्यात आली आहे.कदम व त्यांचे नातेवाईक आ. विक्रम सावंत यांनी प्रशासनावर दबाव टाकल्याने शिवाजी पुतळा उभारणीत आडकाठी आणली गेली. जिल्हाधिकाऱ्यांनी विनाकारण तीन उपाधीक्षक, बारा पोलीस निरीक्षक, यासह बाराशे पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. कोणतीही राजकीय दंगल, खून, मारामारी असे प्रकार झाले नसताना शहराला छावणीचे स्वरूप देण्यात आले आहे.

ते म्हणाले की, कोरोना काळात विविध वैद्यकीय उपचारांसाठी कोट्यवधींचा खर्च दाखविला आहे. याला स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमुळे पोलीस बंदोबस्तावर शासनाचा दीड ते दोन लाख खर्च पडत आहे. हा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा. मी स्वतःच्या हिमतीवर दोन वेळा कारखान्यावर, बँकेवर व आमदार म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे राजकीय स्टंट करण्याचा संबंधच येत नाही. उलट जिल्हा बँकेत पराभव झाल्याने अस्तित्व संपण्याची भीती वाटत असल्याने आ. सावंत माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत.

जयंतरावांच्या भेटीनंतर पुढील निर्णय

शिवाजी पुतळ्याबाबत वर्गणी गोळा करायला वेळ लागला, त्यामुळे पुतळ्याचे काम रखडले. हे आम्ही मान्य करतो. मात्र, आमदार सावंत यांनी एका पैशाचीही मदत या पुतळ्यासाठी दिली नाही. पुतळा बसवू नये यासाठी पोलिसांचा प्रचंड दबाव आला आहे. यासाठी आम्ही पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार असून, त्यानंतरच पुढील दिशा ठरेल, असे जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज