शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

अच्छे दिन कुणाचे? काँग्रेस, भाजप की राष्ट्रवादीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 16:18 IST

सांगली जिल्ह्यात चौफेर उधळलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वारूला लगाम लागला, भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला, असं विरोधकांच्या तंबूत बोललं जाऊ लागलंय, तर भाजप ग्रामीण भागात रूजू लागलाय, २०१२ पेक्षा २०१७च्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसपेक्षा भाजपला जादा जागा मिळाल्यात, असा दावा भाजपनं केलाय.

ठळक मुद्देचौफेर उधळलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वारूला लगाम मिरज विधानसभा मतदारसंघातल्या शहराशेजारच्या सतरा गावांत खाडे यांची पॉवर शहरांशेजारच्या गावांमधले निकाल भाजपचा परतीचा प्रवास दाखवतात

श्रीनिवास नागेग्रामपंचायत निवडणुका मागच्या आठवड्यात संपल्या, पण आता त्यांचं कवित्व सुरू झालंय. बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थानिक पातळीवर, तेथील गटातटातील हेव्यादाव्यांवर लढल्या जातात. त्या व्यक्तिकेंद्रित राजकारणानुसारही फिरतात. मात्र त्यांना नंतर पक्षीय लेबल लावलं जातं. त्यामुळंच जिल्ह्यात चौफेर उधळलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वारूला लगाम लागला, भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला, असं विरोधकांच्या तंबूत बोललं जाऊ लागलंय, तर भाजप ग्रामीण भागात रूजू लागलाय, २०१२ पेक्षा २०१७च्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसपेक्षा भाजपला जादा जागा मिळाल्यात, असा दावा भाजपनं केलाय.

या निकालानंतर भाजप ग्रामीण भागात रूजू लागलाय, असं सांगणाऱ्या जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या स्वत:च्याच पलूस-कडेगावसह, जत, शिराळा, वाळवा, खानापूर आणि सांगली विधानसभा मतदारसंघांत भाजपला काँग्रेस-राष्ट्रवादीनं खोडा घातलाय.

भाजप म्हणजे शहरी पक्ष, असं तथाकथित समीकरण भाजपविरोधकांकडून मांडलं जातं. तसं असेल तर शहरांशेजारच्या ग्रामीण भागावरही या शहरी पक्षाचा प्रभाव असायला हवा, पण यालाही ग्रामपंचायत निवडणुकांनी छेद दिलाय... कारण सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गावांत परस्परविरोधी चित्र दिसतंय.

मिरज विधानसभा मतदारसंघातल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला धूळ चारलीय. मिरज तालुक्यातल्या एकोणीस ग्रामपंचायतींत (हा त्यांचा दावा हं!) भाजपनं झेंडा रोवलाय.

विशेष म्हणजे मिरज विधानसभा मतदारसंघातल्या शहराशेजारच्या सतरा गावांत आ. खाडे यांनी ताकद दाखवून दिलीय. अर्थात यात पक्षापेक्षा आ. खाडें यांचं स्वत:चं कर्तृत्व आणि त्यांच्याकडची पॉवरच कामी आलीय. इथं खासदार संजयकाका पाटील यांचाही स्वत:चा गट आहे आणि तो आ. खाडेंसोबत होता.(खासदारांचं आमदारांशी तसं जुळत नसतानाही!)

याच्या नेमकं उलटं चित्र सांगली विधानसभा मतदारसंघात दिसतंय. या मतदारसंघातल्या तेरापैकी सात गावांत निवडणूक झाली, पण केवळ दोन गावांत भाजपची सत्ता आली!

हरिपूर आणि माधवनगर ही सांगली शहराला खेटून असलेली गावं. हरिपुरातला भाजपचा विजय हा केवळ खासदार संजयकाका पाटील गटाचा. संजयकाकांच्या रसदीवर संगूदादा बोंद्रे गटाची सूत्रं हलवणाऱ्या अरविंद तांबवेकर यांनी एकतर्फी सत्ता आणली. माधवनगरच्या सत्तेसाठी तर टोकाचा संघर्ष झाला. पण बाजी मारली भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांच्या पॅनेलनं.

विशेष म्हणजे भाजपच्या दुसऱ्या गटानं विरोधात खेळ्या केल्या असतानाही डोंगरे यांनी वर्षानुवर्षांची हुकूमत सिद्ध केली. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा गट छुप्या पद्धतीनं त्यांच्या विरोधात होता.

शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार (ते खरंच शिवसेनेत आहेत का?) यांच्या पुढाकारानं तयार झालेल्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवाराला आरएसएसच्या गटाची मदत होती.(प्रचाराच्या पोस्टरवरचे, सोशल मीडियावरील प्रचारपत्रांवरचे चेहरे याचा पुरावा देतात...)

बुधगावात तर आमदारांचा गट आणि डोंगरे यांचा गट थेट विरोधात होते. डोंगरे यांनी पंचायत समितीचे सदस्य विक्रम पाटील यांच्यासोबत हातमिळवणी करत पॅनेल उभं केलं होतं, तर आ. गाडगीळ यांच्या गटानं काँग्रेसमधल्या मदनभाऊ पाटील गटाशी जुळवून घेत स्वतंत्र पॅनेल दिलं होतं.

परिणामी सरपंचपदाच्या लढतीत वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या गटाच्या अपक्षानं दोन्ही पॅनेलला धूळ चारली. भाजपला ना सत्ता मिळाली, ना सरपंचपद!

भाजपमधल्या गटबाजीनं नांद्रे आणि बिसूरमध्ये वाताहत झाली आणि काँग्रेसनं चारीमुंड्या चीत केलं. पद्माळेत तर भाजपला पॅनेलही मिळालं नाही. तिथं राष्ट्रवादीनं बाजी मारली. बामणोलीत आमदार आणि डोंगरे गट एकत्र असूनही सतरापैकी सात जागा मिळाल्या, राष्ट्रवादीनं नाकावर टिच्चून सत्ता काबीज केली.

जाता-जाता : मिरज विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत सांगली मतदारसंघातल्या सांगली-कुपवाड शहरांशेजारच्या गावांमधले हे निकाल भाजपचा परतीचा प्रवास दाखवतात, की काँग्रेस-राष्ट्रवादीचे सुरू झालेले अच्छे दिन ? हा व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा नमुना, की आमदार गटाच्या वाट्याला आलेलं नाकारलेपण? सांगली शहरातील बदलत्या राजकारणाचा प्रभाव की, स्थानिक पातळीवरचं राजकारण? भाजपमधल्या कुजबुजीतून प्रश्नांचं हे कवित्व सुरू झालंय...

ताजा कलम : वरील प्रश्नांनी अस्वस्थ होणाऱ्यानी आणि गुदगुल्या होणाऱ्यानी आपापल्या सोयीनं उत्तरं शोधावीत!

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBJPभाजपा