शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

वसतिगृहांचे चार कोटी थकित अनुदान मिळणार कधी?

By admin | Updated: December 4, 2014 23:39 IST

जिल्ह्यातील स्थिती : अनुदानाअभावी २,८३३ विद्यार्थ्यांच्या पोटाची आबाळ, वसतिगृहांमध्ये दुजाभाव

अशोक डोंबाळे - सांगली -राज्य शासनाकडील विशेष समाजकल्याण विभागाची जिल्ह्यात १८ वसतिगृहे असून, येथील विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी महिन्याला ४ हजार ३०० रूपये अनुदान दिले आहे. तेथे ठेकेदारांच्या खाबुगिरीमुळे विद्यार्थ्यांच्या पोटाची आबाळ होत आहे. दुसऱ्याबाजूला जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून जिल्ह्यात ६७ वसतिगृहे चालविली जात असून तेथील प्रतिविद्यार्थ्यांना भोजनासाठी महिन्याला ९०० रूपये अनुदान मिळत आहे. तेही अनुदान वेळेत मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. भेदभाव करू नये, अशी शिकवण विद्यार्थ्यांना शाळेत गुरुजींकडून दिली जाते. परंतु, याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे भेदभाव निर्माण होत आहे. विशेष समाजकल्याण विभागासाठी शासनाकडून प्रति विद्यार्थ्याच्या भोजन, नाष्ट्यांसाठी चार हजार ३०० रूपये शासन ठेकेदार देत आहे. परंतु, ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या पोटाचे हाल होत आहेत. त्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असून, नाष्टा, दूध व्यवस्थित मिळत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. निधीची तरतूद चांगली असतानाही यातून विद्यार्थ्यांचे पोषण होण्याऐवजी ठेकेदार, उपठेकेदारच गलेलठ्ठ होताना दिसत आहे. यावर अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करण्याऐवजी काही अधिकारीच त्यांना संरक्षण देत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून ६७ वसतिगृहे चालविली जात आहेत. या वसतिगृहात सध्या दोन हजार ८३३ विद्यार्थी असून, त्यांच्या भोजनासाठी प्रतिविद्यार्थी प्रतिदिन केवळ तीस रूपयांचे अनुदान शासन देत आहे. म्हणजेच महिन्याला प्रतिविद्यार्थी ९०० रूपये अनुदान मिळत आहे. या तुटपुंज्या अनुदानात विद्यार्थ्यांना संस्था चालक व्यवस्थित जेवण देऊ शकत नाहीत. यात पुन्हा भर म्हणून वसतिगृह चालविणाऱ्या संस्थांना भोजनाचे अनुदानच वर्षभरापासून मिळाले नाही. जेवण, कर्मचाऱ्यांचे पगार असे जवळपास चार कोटींचे अनुदान शासनाकडून मिळाले नाही. यामुळे संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांना वेळेवर आणि पुरेसे जेवण मिळत नाही. संस्थाचालकांकडे याबद्दल जाब विचारलाच तर ते अनुदान नसल्याचे कारण सांगत आहेत. या वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी मागासवर्गीय आणि गोरगरीब आहेत. जिल्हा परिषद वसतिगृहात ऊस तोडणी मजुरांच्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. या विद्यार्थ्यांना कोण न्याय देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (समाप्त)जि. प. वसतिगृहांचे थकित अनुदानतालुकाभोजन अनुदानमिरज१९,६०,000क़महांकाळ१०,३६,000वाळवा१८,५७,000खानापूर३,५६,000कडेगाव४,२१,000पलूस५,२९,000तासगाव२,५९,000शिराळा६,४८,000आटपाडी९,0७,000जत७३,२२,000एकूण१,५२,00,000