शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
4
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
5
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
6
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
7
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
8
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
9
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
10
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
11
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
12
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
13
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
14
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
15
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
16
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
17
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
18
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
19
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
20
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज

वसतिगृहांचे चार कोटी थकित अनुदान मिळणार कधी?

By admin | Updated: December 4, 2014 23:39 IST

जिल्ह्यातील स्थिती : अनुदानाअभावी २,८३३ विद्यार्थ्यांच्या पोटाची आबाळ, वसतिगृहांमध्ये दुजाभाव

अशोक डोंबाळे - सांगली -राज्य शासनाकडील विशेष समाजकल्याण विभागाची जिल्ह्यात १८ वसतिगृहे असून, येथील विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी महिन्याला ४ हजार ३०० रूपये अनुदान दिले आहे. तेथे ठेकेदारांच्या खाबुगिरीमुळे विद्यार्थ्यांच्या पोटाची आबाळ होत आहे. दुसऱ्याबाजूला जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून जिल्ह्यात ६७ वसतिगृहे चालविली जात असून तेथील प्रतिविद्यार्थ्यांना भोजनासाठी महिन्याला ९०० रूपये अनुदान मिळत आहे. तेही अनुदान वेळेत मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. भेदभाव करू नये, अशी शिकवण विद्यार्थ्यांना शाळेत गुरुजींकडून दिली जाते. परंतु, याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे भेदभाव निर्माण होत आहे. विशेष समाजकल्याण विभागासाठी शासनाकडून प्रति विद्यार्थ्याच्या भोजन, नाष्ट्यांसाठी चार हजार ३०० रूपये शासन ठेकेदार देत आहे. परंतु, ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या पोटाचे हाल होत आहेत. त्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असून, नाष्टा, दूध व्यवस्थित मिळत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. निधीची तरतूद चांगली असतानाही यातून विद्यार्थ्यांचे पोषण होण्याऐवजी ठेकेदार, उपठेकेदारच गलेलठ्ठ होताना दिसत आहे. यावर अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करण्याऐवजी काही अधिकारीच त्यांना संरक्षण देत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून ६७ वसतिगृहे चालविली जात आहेत. या वसतिगृहात सध्या दोन हजार ८३३ विद्यार्थी असून, त्यांच्या भोजनासाठी प्रतिविद्यार्थी प्रतिदिन केवळ तीस रूपयांचे अनुदान शासन देत आहे. म्हणजेच महिन्याला प्रतिविद्यार्थी ९०० रूपये अनुदान मिळत आहे. या तुटपुंज्या अनुदानात विद्यार्थ्यांना संस्था चालक व्यवस्थित जेवण देऊ शकत नाहीत. यात पुन्हा भर म्हणून वसतिगृह चालविणाऱ्या संस्थांना भोजनाचे अनुदानच वर्षभरापासून मिळाले नाही. जेवण, कर्मचाऱ्यांचे पगार असे जवळपास चार कोटींचे अनुदान शासनाकडून मिळाले नाही. यामुळे संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांना वेळेवर आणि पुरेसे जेवण मिळत नाही. संस्थाचालकांकडे याबद्दल जाब विचारलाच तर ते अनुदान नसल्याचे कारण सांगत आहेत. या वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी मागासवर्गीय आणि गोरगरीब आहेत. जिल्हा परिषद वसतिगृहात ऊस तोडणी मजुरांच्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. या विद्यार्थ्यांना कोण न्याय देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (समाप्त)जि. प. वसतिगृहांचे थकित अनुदानतालुकाभोजन अनुदानमिरज१९,६०,000क़महांकाळ१०,३६,000वाळवा१८,५७,000खानापूर३,५६,000कडेगाव४,२१,000पलूस५,२९,000तासगाव२,५९,000शिराळा६,४८,000आटपाडी९,0७,000जत७३,२२,000एकूण१,५२,00,000