शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

दंड महापालिकेला करून भुर्दंड जनतेला का?

By अविनाश कोळी | Updated: February 21, 2024 19:21 IST

पृथ्वीराज पवार : हरित न्यायालयात दाद मागणार

सांगली : कृष्णा नदीच्याप्रदूषणाला प्रशासकीय यंत्रणा, एमआयडीसी तसेच काही साखर कारखाने, उद्योग कारणीभूत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेच्या माध्यमातून सामान्य जनतेला दंड ठोठावला आहे. हे पैसे प्रदूषण नियंत्रण अधिकारी, महापालिकेचे अधिकारी तसेच प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांकडून वसूल करायला हवेत, असे मत भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले की, नागरिकांना या दंडाच्या माध्यमातून भुर्दंड बसू नये म्हणून आम्ही प्रसंगी हरित न्यायालयात दाद मागू. कृष्णा नदीच्या प्रदूषणाकडे सर्वच यंत्रणा अत्यंत क्रूरपणे पाहत आहेत. कुपवाड व मिरज एमआयडीसीमध्ये उद्योगांचा संयुक्त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद अवस्थेत आहे. या प्रकल्पाची जबाबदारी ना उद्योजक घेताहेत, ना एमआडीसी प्रशासन. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याबाबत हात वर केले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील रसायनयुक्त सांडपाणी नाल्याच्या माध्यमातून पुढे नदीत मिसळत आहे.नागरिकांच्या सांडपाण्यापेक्षा साखर कारखाने तसेच औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या घटकांवर व त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार शासकीय यंत्रणेवर कारवाई व्हायला हवी.महापालिकेचे अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच एमआयडीसी प्रशासन यास जबाबदार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून दंडाची वसुली केली जावी, अशी मागणी आम्ही याचिकेतून करणार आहोत.

कृष्णेची साथ सोडणे ही शाेकांतिकाकृष्णा नदीकाठी आपण राहात असतानाही प्रदूषणाची समस्या सोडून आपण वारणा नदी किंवा धरणातून पाणी आणण्यासाठी सरसावलो आहोत. आपल्या नदीची साथ सोडणे ही शोकांतिका आहे, असे पवार म्हणाले.

प्रतिसंगमावरून आंदोलनकृष्णा नदी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी. तरतूद झाली नाही, तर प्रीतीसंगमापासून मंत्रालयापर्यंत टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण