शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तलावाच्या जमिनीची भरपाई कधी?

By admin | Updated: February 2, 2015 00:03 IST

तिकोंडीतील शेतकऱ्यांचा सवाल : नुकसान, पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दरीबडची : तिकोंडी (ता. जत) येथील तलावासाठी संपादन केलेल्या जमिनीची नुकसानभरपाई, पुनर्वसन व पुनर्वसाहत करुन मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंद्रशेखर रेबगोंड, राजू पुजारी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे केली आहे.बागायत आणि जिरायत क्षेत्र याप्रमाणे भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता दाखविण्याचा हक्क अधिनियम २०१३ च्या ३० अन्वये व प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम १९९९ व २००१ या महाराष्ट्र अधिनियम क्र. ११ अन्वये जिल्हाधिकारी यांनी १८९९ चारमध्ये नमूद केलेले कोणतेही असल्यास बाजारमूल्य या कलमामध्ये जमिनीचे बाजारमूल्य निर्धारित करताना विचार करावयाचे निकष व घटक यासंबंधात तरतूद आहे. नुकसानभरपाईची रक्कम निर्धारित करण्याबाबत कलम २८ अन्वये तरतूद आहे. या कलमामध्ये सोलॅटियमच्या निवडीबाबत तरतूद आहे. सोलॅटियमची रक्कम ही नुकसान भरपाईच्या रकमेच्या १०० टक्के इतकी असेल, तसेच निवडीची किंवा ताबा घेण्याची तारीख यापैकी जी अधिक असेल, त्या तारखेपर्यंत जिल्हाधिकारी बाजार मूल्यांवर वार्षिक १२ टक्के दराने गणना केलेल्या रकमेच्या निवडी देईल, अशीदेखील तरतूद या कलमामध्ये आहे. परंतु भू-संपादन करताना बाजारमूल्य निर्धारित केलेले नाही. कमी मूल्य धरण्यात आले आहे. बाग, घर, विहीर, जमीन, कूपनलिकाचे मूल्यांकन कमी दराने केले आहे. केंद्राच्या भू-संपादन कराराप्रमाणे मिळावे. जमिनीची मोबदल रक्कम व ज्यांची घरे गेली आहेत, त्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनाची प्रत विशेष भूमिसंपादन अधिकारी नं. १ मिरज यांना दिली आहे. निवेदनावर मल्लाप्पा बळूर, विठ्ठल महाजन, यांच्यासह ९३ ग्रामस्थांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)एकरी केवळ साठ हजारांची भरपाईतिकोंडी येथील नवीन साठवण तलावासाठी पाच वर्षांपूर्वी जमीन संपादन करण्यात आली आहे. तलावात गेलेली जमीन, घरे, विहिरी, कूपनलिका, फळबागांचे सर्वेक्षण होऊनसुध्दा नुकसानभरपाई मिळालेली नाही. तलावासाठी ९३ शेतकऱ्यांची ७५ एकर जमीन पाच वर्षापूर्वी भूसंपादन करण्यात आली आहे. शासकीय दरानुसार संपादन केलेल्या जमिनीचा दर ठरविण्यात आला असून, एकरी ६० हजार इतकीच भरपाई मंजूर झाली आहे. जमिनीची भरपाई कमी असल्याने शेतकऱ्यांनी रक्कम स्वीकारली नाही.