शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

जीव धोक्यात घालून पावसाळी पर्यटन काय कामाचे, रिल्स, सेल्फीच्या नादात जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 12:09 IST

अतिउत्साह जिवावर बेतण्याची भीती

नितीन नलवडेसांगली : सध्या पावसाळ्याचे दिवस असून, अनेकजण वर्षापर्यटनासाठी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जात असतात; परंतु अतिउत्साहामुळे काही वेळा आपला जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. पुण्याजवळील लोणावळा येथील घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला, तर दुसऱ्या एका घटनेत राधानगरीत पर्यटनासाठी गेलेले निपाणीतील दाेन युवक दुधगंगा नदीत बुडाले.सध्या रिल्सचा जमाना असून, या रिल्सच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजचे तरुण-तरुणी कोणत्याही थराला जात आहेत. रिल्सच्या नादाला लागून अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. सध्या पावसाला नुकताच सुरू झाला आहे. निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे. पर्यटनासाठी अनेक जण बाहेर पडत आहेत. उंचच उंच डोंगरावरून खाली पडणारा धबधबा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. यावेळी धबधब्याच्या ठिकाणी जाताना प्रवाहात वाहून जाण्याची मोठी शक्यता असते. यावेळी कुटुंबासोबत जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच सुटीच्या दिवशी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक जण आंबोली, कॅसलरारॅक, ठाेसेघर, गोकाक, राऊतवाडी, वजराई, नवजा आंबा घाटात आवर्जून जात असतात; परंतु अशा ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात, तसेच धबधब्याच्या ठिकाणी संरक्षक कठडे नसल्याने घसरून पडण्याची शकयता असते, तसेच सेल्फीसाठी अनेक जण जीव धोक्यात घालतात, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही, अशातच अजाणतेपणे लाखमोलाचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यासाठी निसर्गाचा आनंद लुटताना भान ठेवणे गरजेचे आहे.

रिल्स, सेल्फीसाठी वाटेल तेसध्या तरुणाईमध्ये रिल्सची जणू स्पर्धाच लागली आहे. यामध्ये अनेक तरुण, तरुणी आपला जीव धोक्यात घालून डोंगराच्या, तसेच दरीच्या टोकावर उभे राहून सेल्फी घेत असतात. यामध्ये ते आपल्या जिवाची पर्वा करत नाहीत, आणि लाखमोलाचा जीवच गमावून बसतात. वेगवेळे चॅलेंज स्वीकारण्याच्या नादात धबधब्याच्या मोठ्या प्रवाहात जाऊन अतिधाडस करतात; परंतु हेच धाडस जिवावर बेतू शकते.

टॅग्स :Sangliसांगलीtourismपर्यटनRainपाऊस