शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आमचेही कुठे तरी चुकलेच !

By admin | Updated: May 28, 2014 00:43 IST

जयंत पाटील : जनतेचा कौल मान्य; कारभारात सुधारणा करू

सांगली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामागे अनेक कारणे आहेत. जनतेचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारला आहे. आमच्याही काही चुका झाल्या असतील. अशा चुकांची दुरुस्ती करून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ, असे मत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी आज, मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, लोकांमधून आलेल्या भावनांचे विश्लेषण आम्ही करीत आहोत. गॅस सिलिंडरची दरवाढ, केवायसीच्या माध्यमातून मतदारांचे झालेले हाल, अन्नसुरक्षा व जीवनदायी योजनेतील काही त्रुटी अशा कारणांनी मतदारांमध्ये शासनाबद्दल नाराजी दिसून आली. याशिवाय मोदींनी केलेला सोशल मीडियाचा प्रभावी वापरही लोकांच्या मतपरिवर्तनास कारणीभूत ठरला. जनता अधिक डोळस झाली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा हा कौल मान्य करीत आहोत. स्थानिक पातळीवर आमच्या ज्या काही चुका झाल्या असतील, त्यांतही सुधारणा करण्यात येतील. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी पाळला. काही लोकांचा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी नेते एकत्र होते. त्यामुळे आघाडी धर्माविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता होणे आवश्यक होते. त्यामुळेच निर्णयाला वेळ लागला. मंत्रिमंडळात आमच्यात आरक्षणावरून कोणतेही मतभेद नाहीत. शासन लवकरच याबाबत निर्णय घेईल. एलबीटीबाबतचा निर्णय नगरविकास खात्याच्या अखत्यारीत असल्याने मुख्यमंत्रीच याबाबत निर्णय घेतील. तरीही राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत व्यापार्‍यांशी चर्चा करून आमच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. आम्ही त्यासाठी पाठपुरावा करू. विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या त्रुटी दूर करण्याबाबतही शासनस्तरावर पावले उचलली जातील. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना सोशल मीडियाच्या वापराबाबत पक्षामार्फत प्रयत्न होतील. मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करणे शक्य नसल्याने झेपेल तेवढ्या प्रमाणात आम्ही याचा वापर करून लोकांपर्यंत आमच्या योजना व कार्य पोहोचवू, असे त्यांनी सांगितले. मला विश्वजितचा मुद्दा पटतो आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढण्याबाबत काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य वाटतो. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी विधानसभेत आघाडीच असायला हवी. लोकसभा निवडणुकीचा परिणाम विधानसभेवर होईल का, याचा विचार करण्यापेक्षा, लोकांचे प्रश्न सोडवून त्यांचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे वाटते. असे झाले तर निश्चितपणे आम्हाला जनता कौल देईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.