शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

घासावरही कर लावताय? सामान्यांनी जगायचे कसे?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:13 IST

केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी एकीची वज्रमूठ आवळावी लागेल

इस्लामपूर : भाजपचे केंद्र सरकार, सामान्य माणसाच्या प्रत्येक घासावर कर लावत असेल, तर सामान्य माणसाने जगायचे कसे? आता स्वस्थ बसून चालणार नाही. केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी एकीची वज्रमूठ आवळावी लागेल, अशी भावना माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.आंबेडकरनगर येथे शहरी आरोग्य केंद्र उभारून शहरातील नागरिकांना सुलभ व स्वस्त आरोग्य सुविधा देत आहोत. शहरात वेगवेगळ्या भागात आणखी तीन आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळविली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, केंद्र सरकारने कपड्यावर कर आकारला. अलीकडे त्यांनी अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटी आकारला आहे. सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे.येथील बेघर वसाहत, मॉडर्न हायस्कूल, सिध्देश्वर मंदिर, पोतदार हॉल व माळी गल्ली येथील संवाद बैठकीमध्ये ते बोलत होते. युवा नेते प्रतीक पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, ॲड. चिमण डांगे, खंडेराव जाधव, सुभाषराव सूर्यवंशी, दादासाहेब पाटील, ॲड. धैर्यशील पाटील उपस्थित होते.यावेळी माजी नगरसेवक डॉ. संग्राम पाटील, माजी नगरसेविका जयश्री माळी, केदार पाटील, प्रणव जाधव, हर्षवर्धन मोहिते यांचीही भाषणे झाली. प्रा. शामराव पाटील, बाळासाहेब पाटील, शंकरराव पाटील, ॲड. संपतराव पाटील, आनंदराव पाटील उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलCentral Governmentकेंद्र सरकारTaxकर