शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

घासावरही कर लावताय? सामान्यांनी जगायचे कसे?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:13 IST

केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी एकीची वज्रमूठ आवळावी लागेल

इस्लामपूर : भाजपचे केंद्र सरकार, सामान्य माणसाच्या प्रत्येक घासावर कर लावत असेल, तर सामान्य माणसाने जगायचे कसे? आता स्वस्थ बसून चालणार नाही. केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी एकीची वज्रमूठ आवळावी लागेल, अशी भावना माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.आंबेडकरनगर येथे शहरी आरोग्य केंद्र उभारून शहरातील नागरिकांना सुलभ व स्वस्त आरोग्य सुविधा देत आहोत. शहरात वेगवेगळ्या भागात आणखी तीन आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळविली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, केंद्र सरकारने कपड्यावर कर आकारला. अलीकडे त्यांनी अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटी आकारला आहे. सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे.येथील बेघर वसाहत, मॉडर्न हायस्कूल, सिध्देश्वर मंदिर, पोतदार हॉल व माळी गल्ली येथील संवाद बैठकीमध्ये ते बोलत होते. युवा नेते प्रतीक पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, ॲड. चिमण डांगे, खंडेराव जाधव, सुभाषराव सूर्यवंशी, दादासाहेब पाटील, ॲड. धैर्यशील पाटील उपस्थित होते.यावेळी माजी नगरसेवक डॉ. संग्राम पाटील, माजी नगरसेविका जयश्री माळी, केदार पाटील, प्रणव जाधव, हर्षवर्धन मोहिते यांचीही भाषणे झाली. प्रा. शामराव पाटील, बाळासाहेब पाटील, शंकरराव पाटील, ॲड. संपतराव पाटील, आनंदराव पाटील उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलCentral Governmentकेंद्र सरकारTaxकर