शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महापालिकेतील भाजप महाआघाडीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 23:58 IST

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते, नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून घेऊन भाजपने महापालिकेची सत्ता मिळविली. वर्षभर गुण्यागोविंदाने कारभार झाला. पण स्थायी समिती ...

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते, नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून घेऊन भाजपने महापालिकेची सत्ता मिळविली. वर्षभर गुण्यागोविंदाने कारभार झाला. पण स्थायी समिती सदस्यांच्या निवडीवरून भाजपमध्ये पहिली ठिणगी पडली आहे. पूर्वाश्रमीचे काँग्रेसी भाजपच्या शिस्तबद्धतेमुळे अस्वस्थ झाले आहेत. ठिणगीचा वणवा पेटणार नाही, याची खबरदारी आता भाजप नेत्यांना घ्यावी लागेल. अन्यथा भाजपच्या सत्तेची वाटचालही महाआघाडीच्या दिशेने झाल्यास आश्चर्य वाटू नये.काँग्रेस-राष्ट्रवादीमधील महत्त्वाकांक्षी नेत्यांना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यातून ४० वर्षांची काँग्रेसची सत्ता घालविण्यात भाजपला यश आले. अनेकांनी या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पण भाजपच्या सत्तेत खारीचा वाटा हा पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी नगरसेवकांचाच आहे. भाजपचे संख्याबळ सहयोगी सदस्यांसह ४३ असले तरी, त्यापैकी १५ हून अधिक नगरसेवक हे पूर्वीचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. हे नगरसेवक व त्यांच्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेल्या नाहीत. सत्तेच्या चाव्या नेहमीच आपल्याकडे ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे.विकास महाआघाडीच्या काळापासून सत्तेचे काटे नेहमीच फिरले आहेत. त्यामागे पदाची अपेक्षा होती. या अपेक्षा नेत्यांनी पूर्ण न केल्याने सत्तेचा बट्ट्याबोळ झाला होता. हा सारा खेळ शेवटच्या अडीच वर्षात रंगत असे. पण भाजपच्या सत्ताकाळात पहिले वर्ष संपता संपताच ठिणग्या उडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच महापौर बदलावरून हालचाली गतिमान झाल्या होत्या. पण या हालचाली लवकरच थंडावल्या. पण स्थायी समिती सदस्य पदावरून मात्र मोठी ठिणगी पडली आहे. महापालिकेची तिजोरी आपल्या हातात असावी, अशी साऱ्यांचीच अपेक्षा असते. भाजपचे पहिले सभापती म्हणून अजिंक्य पाटील यांची निवड झाली. पण त्यांच्या कारभारावर माजी आमदार दिनकर पाटील, कोअर कमिटीचे सदस्य सुरेश आवटी यांचे ‘लक्ष’ होते. त्यानंतर पुढचा सभापतीही मर्जीतीलच हवा, म्हणून काहीजणांनी फिल्डिंग लावली. पण त्याला भाजपच्या नेत्यांनी धक्का दिला.पुढचा सभापती मिरजेचा होणार, अशी चर्चा होती. त्यासाठी पांडुरंग कोरे, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने अशी नावे चर्चेत होती. पण यापैकी एकालाही स्थायीत संधी मिळाली नाही. कोरे वगळता सुरेश आवटी गटाच्या दहा नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. अगदी राजीनाम्याचाही इशारा दिला आहे. सभेला आवटी गटाच्या दहा सदस्यांसह खुद्द कोरेही गैरहजर होते. यातून त्यांची नाराजी उघड आहे.महाआघाडीच्या काळातही आवटी गटाने पहिल्यांदा बंडाचे निशाण फडकविले होते. त्यानंतरचा इतिहास सांगलीकरांना माहीत आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळातही आवटी गट भाजपवासी झाला. त्यामुळे सत्तेचा लंबक नेहमीच झुकता राहिला. आताही भाजपमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे.स्थायी सदस्य निवडी पूर्ण झाल्या. लवकरच सभापतीही निवडला जाईल. तोंडावरच विधानसभा निवडणुका असल्याने या नाराजांना भाजपचे नेते शांतही करतील. पण दीड वर्षानंतर होणाºया महापौर निवडीवेळी मात्र भाजपच्या नेत्यांना सावध भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा शेवटच्या अडीच वर्षात भाजपची ‘महाआघाडी’ झाली तर नवल नाही.दिलीप सूर्यवंशी गटही : नाराजमहापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात माजी नगरसेवक दिलीप सूर्यवंशी गटाची भूमिकाही महत्त्वाची ठरली होती. सूर्यवंशी गटाचे चार नगरसेवक आहेत. त्यांचे पुतणे धीरज सध्या उपमहापौर आहेत. गेल्या सव्वा वर्षात धीरज सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या राजकारणात चांगलाच जम बसविला आहे. विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशीही त्यांचे सख्य आहे. सूर्यवंशी गटाने स्थायी समितीसाठी नगरसेवक संजय यमगर यांचे नाव सूचविले होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत यमगर यांचे नाव निश्चित असल्याचे सांगितले जात होते. पण अखेरीस यमगर यांचाही पत्ता कट झाला. त्यामुळे स्थायी सदस्यांची नावे सभागृहात वाचली जात असताना उपमहापौर धीरज सूर्यवंशी व्यासपीठावर नव्हते. ते सदस्यांत बसून होते. काहीजणांनी विनंती केल्यानंतर ते व्यासपीठावर गेले. यावरून त्यांच्या गटातही नाराजीचा सूर असल्याचे दिसून येते.