शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

Sangli: कृष्णा कालव्यातून दोन दिवसात पलूसला पाणी, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील 

By अशोक डोंबाळे | Updated: March 6, 2024 12:06 IST

रब्बी हंगामासाठी एक टीएमसी पाणी मिळणार

सांगली : कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार डुडी यांनी तारळी धरणातून कृष्णा कालव्यात एक टीएमसी पाणी सोडण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज, कऱ्हाड तालुक्यातील ५४ गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे.कृष्णा कालव्याचे पाणी पलूस तालुक्यातील तुपारी ते वसगडेपर्यंत जाते. तालुक्यातील बहुतांश शेती ही आरफळ व कृष्णा कालव्यावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने या भागातील शेती धोक्यात आली आहे. पाण्याअभावी सध्या ऊस, द्राक्ष, केळी, भाजीपाला, फुले व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.पाटबंधारे विभागातील राजकीय हस्तक्षेप थांबून कोर्टाच्या आदेशप्रमाणे कृष्णा कालव्यावर आरक्षित असलेले २.७० टीएमसी पाणी नियमित फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आवर्तन सुरळीत सुरू व्हावे, अन्यथा अजूनही भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. सर्व शेतकऱ्यांचा दृष्टीने कृष्णा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती.मात्र, सातारा जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे कृष्णा कालव्यात पाणी सोडले जात नव्हते. म्हणून शेतकरी आक्रमक झाले होते. याची गंभीर दखल घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे तारळी धरणातून कृष्णा कालव्यात रब्बी हंगामासाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे एक टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे.सातारा जिल्हाधिकारी डुडी यांनी सातारा जलसंपदा विभागाला तारळी धरणातून पाणी सोडण्याबाबत सूचना केली आहे. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, तासगाव व मिरज तालुक्यातील १३ हजार ३६६ हेक्टर क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

लोकप्रतिनिधी न्यायालयाचा आदेशही पाळणार नाहीत का?न्यायालयाने कृष्णा कालव्यात वर्षभरात २.७० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. तरीही पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि राजकीय नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ५४ गावांच्या हक्काचे पाणी अडविले जात आहे. खरीप आणि रब्बी हंगामामध्ये आतापर्यंत २.७० टीएमसीपैकी एकही टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला मिळाले नाही. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी न्यायालयाचे आदेशही पाळणार नाहीत का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरWaterपाणी