शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कृष्णा कालव्यातून दोन दिवसात पलूसला पाणी, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील 

By अशोक डोंबाळे | Updated: March 6, 2024 12:06 IST

रब्बी हंगामासाठी एक टीएमसी पाणी मिळणार

सांगली : कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार डुडी यांनी तारळी धरणातून कृष्णा कालव्यात एक टीएमसी पाणी सोडण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज, कऱ्हाड तालुक्यातील ५४ गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे.कृष्णा कालव्याचे पाणी पलूस तालुक्यातील तुपारी ते वसगडेपर्यंत जाते. तालुक्यातील बहुतांश शेती ही आरफळ व कृष्णा कालव्यावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने या भागातील शेती धोक्यात आली आहे. पाण्याअभावी सध्या ऊस, द्राक्ष, केळी, भाजीपाला, फुले व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.पाटबंधारे विभागातील राजकीय हस्तक्षेप थांबून कोर्टाच्या आदेशप्रमाणे कृष्णा कालव्यावर आरक्षित असलेले २.७० टीएमसी पाणी नियमित फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आवर्तन सुरळीत सुरू व्हावे, अन्यथा अजूनही भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. सर्व शेतकऱ्यांचा दृष्टीने कृष्णा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती.मात्र, सातारा जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे कृष्णा कालव्यात पाणी सोडले जात नव्हते. म्हणून शेतकरी आक्रमक झाले होते. याची गंभीर दखल घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे तारळी धरणातून कृष्णा कालव्यात रब्बी हंगामासाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे एक टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे.सातारा जिल्हाधिकारी डुडी यांनी सातारा जलसंपदा विभागाला तारळी धरणातून पाणी सोडण्याबाबत सूचना केली आहे. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, तासगाव व मिरज तालुक्यातील १३ हजार ३६६ हेक्टर क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

लोकप्रतिनिधी न्यायालयाचा आदेशही पाळणार नाहीत का?न्यायालयाने कृष्णा कालव्यात वर्षभरात २.७० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. तरीही पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि राजकीय नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ५४ गावांच्या हक्काचे पाणी अडविले जात आहे. खरीप आणि रब्बी हंगामामध्ये आतापर्यंत २.७० टीएमसीपैकी एकही टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला मिळाले नाही. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी न्यायालयाचे आदेशही पाळणार नाहीत का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरWaterपाणी