शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

Sangli: कृष्णा कालव्यातून दोन दिवसात पलूसला पाणी, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील 

By अशोक डोंबाळे | Updated: March 6, 2024 12:06 IST

रब्बी हंगामासाठी एक टीएमसी पाणी मिळणार

सांगली : कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार डुडी यांनी तारळी धरणातून कृष्णा कालव्यात एक टीएमसी पाणी सोडण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज, कऱ्हाड तालुक्यातील ५४ गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे.कृष्णा कालव्याचे पाणी पलूस तालुक्यातील तुपारी ते वसगडेपर्यंत जाते. तालुक्यातील बहुतांश शेती ही आरफळ व कृष्णा कालव्यावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने या भागातील शेती धोक्यात आली आहे. पाण्याअभावी सध्या ऊस, द्राक्ष, केळी, भाजीपाला, फुले व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.पाटबंधारे विभागातील राजकीय हस्तक्षेप थांबून कोर्टाच्या आदेशप्रमाणे कृष्णा कालव्यावर आरक्षित असलेले २.७० टीएमसी पाणी नियमित फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आवर्तन सुरळीत सुरू व्हावे, अन्यथा अजूनही भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. सर्व शेतकऱ्यांचा दृष्टीने कृष्णा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती.मात्र, सातारा जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे कृष्णा कालव्यात पाणी सोडले जात नव्हते. म्हणून शेतकरी आक्रमक झाले होते. याची गंभीर दखल घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे तारळी धरणातून कृष्णा कालव्यात रब्बी हंगामासाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे एक टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे.सातारा जिल्हाधिकारी डुडी यांनी सातारा जलसंपदा विभागाला तारळी धरणातून पाणी सोडण्याबाबत सूचना केली आहे. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, तासगाव व मिरज तालुक्यातील १३ हजार ३६६ हेक्टर क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

लोकप्रतिनिधी न्यायालयाचा आदेशही पाळणार नाहीत का?न्यायालयाने कृष्णा कालव्यात वर्षभरात २.७० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. तरीही पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि राजकीय नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ५४ गावांच्या हक्काचे पाणी अडविले जात आहे. खरीप आणि रब्बी हंगामामध्ये आतापर्यंत २.७० टीएमसीपैकी एकही टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला मिळाले नाही. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी न्यायालयाचे आदेशही पाळणार नाहीत का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरWaterपाणी