शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'जलसंपदा, महापालिकेच्या निष्क्रियतेमुळेच सांगलीत पाणी टंचाई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 18:43 IST

प्रदूषण अधिकारी गप्प का ?

सांगली : कोयना धरणात सध्या ६७ टीएमसी पाणीसाठा असतानाही केवळ जलसंपदा आणि महापालिका प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळे सांगली शहरातील नागरिकांवर पाणी टंचाईचे संकट आले आहे, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या या निष्क्रियतेबद्दल त्यांना जाब विचारण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील आणि सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले की, पाणी नसल्यामुळे कृष्णा नदीचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. नदीचे सध्याचे पात्र हे केवळ महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीही समन्वय नसल्यामुळेच कोरडे पडले आहे. कोयना धरणात सध्या पाणीसाठा ६७ टीएमसी आहे. जवळपास ६१ टक्के पाणीसाठा आहे. वारणेमध्ये २६ टीएमसी पाणी आहे. असे असताना सांगलीकरांना मात्र आता आठ दिवस दूषित पाणी प्यावे लागत आहे.

कऱ्हाड ते सांगलीपर्यंत गटारी, कारखाना मळी, औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे दूषित पाणी थेट नदीत मिसळत आहे. हेच दूषित पाणी सांगलीकरांना प्यावे लागत आहे. यामुळे अनेक आजाराचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याला महापालिका अधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा फटका जनतेला बसत आहे. या सर्वांचा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्याची गरज आहे. तरीही लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नसल्यामुळे जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे.

कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सांगलीच्या दूषित पाण्याबाबत तक्रार केली आहे. कृष्णा नदीतील पाण्याबाबत कोयना धरणातील अधिकाऱ्यांशी जलसंपदा आणि महापालिका अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवला पाहिजे, अशी मागणीही केली आहे. यावेळी बैठकीला विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, संजय कोरे, सतीश रांजणे, आदी उपस्थित होते.प्रदूषण अधिकारी गप्प का ?कृष्णा आणि वारणा नद्यांच्या दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना यापूर्वी कृष्णा नदीच्या दूषित पाणी आणि मृत माशाबद्दल जाब विचारला होता. तरीही त्यांच्याकडून दूषित पाण्यास जबाबदार कारखाने आणि महापालिकेवर कारवाई होत नाही, असा आरोपही कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी