शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सांगलीत टँकरमुक्ती नावाला, टंचाईचा गावाला; पूर्व भागास म्हैसाळ योजनेचाच आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:31 IST

जिल्हा टँकरमुक्त झाल्याने पाणीटंचाई कागदोपत्री संपली, प्रत्यक्षात अनेक गावांत टँकरची घरघर रात्रंदिवस सुरुच आहे. टँकरमुक्तीच्या नावाखाली प्रशासन टँकर देत नाही, परिणामी बेडगसारख्या गावात ग्रामपंचायतीला किंवा नेतेमंडळींना खिशातून पैसे घालून गावकऱ्यांची सोय करावी लागत आहे.

सांगली : जिल्हा टँकरमुक्त झाल्याने पाणीटंचाई कागदोपत्री संपली, प्रत्यक्षात अनेक गावांत टँकरची घरघर रात्रंदिवस सुरुच आहे. टँकरमुक्तीच्या नावाखाली प्रशासन टँकर देत नाही, परिणामी बेडगसारख्या गावात ग्रामपंचायतीला किंवा नेतेमंडळींना खिशातून पैसे घालून गावकऱ्यांची सोय करावी लागत आहे. बहुतांश गावांत स्वत:च्या पाणीयोजना आहेत. त्यासाठी विहीर, गावतलाव, कूपनलिका येथून पाणी घेतले जाते.उन्हाळ्यात पाणीसाठा आटल्याने ठरलेली असते. ग्रामपंचायतीकडून टँकरसाठी अर्ज जातात, पण एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर व शेवटी जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचेपर्यंत पावसाळा येतो. म्हैसाळ योजनेतून सध्या पाणी सोडले आहे, त्यामुळे विहीरी, कूपनलिकांची पाणीपातळी वाढून टंचाई काही प्रमाणात सुसह्य झाली आहे. घरगुती वापरासाठी व जनावरांसाठी या पाण्याचा वापर होतो. पिण्यासाठी मात्र गावातील वॉटर एटीएममधून कॅन न्यावे लागतात.

पिण्याच्या जारवर महिन्याला हजार खर्चवॉटर एटीएममध्ये वीस रुपयांना पिण्याच्या पाण्याचा जार मिळतो. एका कुटुंबाला महिन्याकाठी जारच्या माध्यमातून हजारभर रुपयांचा खर्च शुद्ध पाण्यासाठी करावा लागतो.

आठ दिवसांतून एकदा पाणी, नळ काय कामाचे?

सकस आहार विहिरीतून घरोघरी नळाद्वारे पाणी येते, पण त्याचे वेळापत्रक बेभरवशाचे आहे. आठवड्यातून एकदा काही वेळ पाणी सुटते. अशावेळी छोटी मोटर लावून पाणी खेचण्याची स्पर्धा सुरु होते. या स्पर्धेत गेल्यावर्षी एका तरुणाने विजेचा धक्का बसून जीवही गमावला.

नळ असूनही दररोज पाणी नाहीबेडगमध्ये गावाची स्वत:ची नळपाणी योजना आहे, पण ती संपूर्ण गावाची तहान भागवू शकत नाही. सकस आहार विहिरीमध्ये सध्या म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी सोडले आहे. तेथून नळाद्वारे घरोघरी पाणी सोडले जाते. त्याचा वापर स्वच्छतेसाठी व जनावरांसाठी केला जातो. पिण्यासाठी मात्र कॅन आणावे लागतात.

हजार रुपयांस ६००० लि. पाणी

सहा हजार लिटर पाण्याचा टँकर  सरासरी हजार रुपयांना मिळतो. प्रत्यक्षात टँकरमध्ये चार सहा हजार लिटर पाण्याचा टँकर हजार हजार लिटरच पाणी येते. विहिरींचे मालक उन्हाळ्यात पाणीविक्रीचा धंदा जोरात करतात.

तहान भागविण्यासाठी ग्रामपंचायतीची धडपड

बेडगमध्ये ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी प्रत्येक उन्हाळ्यात ग्रामपंचायतीची धडपड सुरु होते. गल्लोगल्ली टँकर सुरु केले जातात. गावाची मरगाई देवीची यात्रा ऐन उन्हाळ्यात मार्च- एप्रिलमध्ये येते, यात्रेतही टँकरची सोय करावी लागते. त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च होतो.

पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाहीनळाचे पाणी वेळेत येत : शिवाजी जाधव

नळाचे पाणी वेळेत येत नाही, त्यामुळे विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो. स्वच्छतेसाठी व जनावरांसाठी पाणी कसेबसे उपलब्ध होते, पण पिण्यासाठी वॉटर एटीएमचाच पर्याय आहे.दररोज जार लागतोच: सिद्धेश्वर पाटील

पाण्यासाठी दररोज एक- दोन जार आणावे लागतात. त्यासाठी महिन्याला आमच्या कुटुंबाला हजारभर रुपयांचा खर्च करावा लागतो.

पर्यायी व्यवस्था अपुरीच: विष्णू पाटी

ग्रामपंचायत पाण्याची पर्यायी व्यवस्था करते, पण ती अपुरी ठरते. पाणीयोजना राबविल्याविना टंचाईचा हा प्रश्न कायमचा मिटणार नाही. त्यादृष्टीने प्रयल हवेत.

जिल्ह्यातून एकाही केली नाही. मागणी आल्यास गावाने टँकरची मागणी निर्णय घेतला जातो. प्रथम शासकीय टँकरने पाणी दिले जाते. मागणी वाढल्यास ठेकेदारामार्फत टँकर सुरू केले जातात. सध्या कोठेही टँकरने पुरवठा सुरू नाही. - शीतल उपाध्ये, उपकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी