शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सांगलीत टँकरमुक्ती नावाला, टंचाईचा गावाला; पूर्व भागास म्हैसाळ योजनेचाच आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:31 IST

जिल्हा टँकरमुक्त झाल्याने पाणीटंचाई कागदोपत्री संपली, प्रत्यक्षात अनेक गावांत टँकरची घरघर रात्रंदिवस सुरुच आहे. टँकरमुक्तीच्या नावाखाली प्रशासन टँकर देत नाही, परिणामी बेडगसारख्या गावात ग्रामपंचायतीला किंवा नेतेमंडळींना खिशातून पैसे घालून गावकऱ्यांची सोय करावी लागत आहे.

सांगली : जिल्हा टँकरमुक्त झाल्याने पाणीटंचाई कागदोपत्री संपली, प्रत्यक्षात अनेक गावांत टँकरची घरघर रात्रंदिवस सुरुच आहे. टँकरमुक्तीच्या नावाखाली प्रशासन टँकर देत नाही, परिणामी बेडगसारख्या गावात ग्रामपंचायतीला किंवा नेतेमंडळींना खिशातून पैसे घालून गावकऱ्यांची सोय करावी लागत आहे. बहुतांश गावांत स्वत:च्या पाणीयोजना आहेत. त्यासाठी विहीर, गावतलाव, कूपनलिका येथून पाणी घेतले जाते.उन्हाळ्यात पाणीसाठा आटल्याने ठरलेली असते. ग्रामपंचायतीकडून टँकरसाठी अर्ज जातात, पण एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर व शेवटी जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचेपर्यंत पावसाळा येतो. म्हैसाळ योजनेतून सध्या पाणी सोडले आहे, त्यामुळे विहीरी, कूपनलिकांची पाणीपातळी वाढून टंचाई काही प्रमाणात सुसह्य झाली आहे. घरगुती वापरासाठी व जनावरांसाठी या पाण्याचा वापर होतो. पिण्यासाठी मात्र गावातील वॉटर एटीएममधून कॅन न्यावे लागतात.

पिण्याच्या जारवर महिन्याला हजार खर्चवॉटर एटीएममध्ये वीस रुपयांना पिण्याच्या पाण्याचा जार मिळतो. एका कुटुंबाला महिन्याकाठी जारच्या माध्यमातून हजारभर रुपयांचा खर्च शुद्ध पाण्यासाठी करावा लागतो.

आठ दिवसांतून एकदा पाणी, नळ काय कामाचे?

सकस आहार विहिरीतून घरोघरी नळाद्वारे पाणी येते, पण त्याचे वेळापत्रक बेभरवशाचे आहे. आठवड्यातून एकदा काही वेळ पाणी सुटते. अशावेळी छोटी मोटर लावून पाणी खेचण्याची स्पर्धा सुरु होते. या स्पर्धेत गेल्यावर्षी एका तरुणाने विजेचा धक्का बसून जीवही गमावला.

नळ असूनही दररोज पाणी नाहीबेडगमध्ये गावाची स्वत:ची नळपाणी योजना आहे, पण ती संपूर्ण गावाची तहान भागवू शकत नाही. सकस आहार विहिरीमध्ये सध्या म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी सोडले आहे. तेथून नळाद्वारे घरोघरी पाणी सोडले जाते. त्याचा वापर स्वच्छतेसाठी व जनावरांसाठी केला जातो. पिण्यासाठी मात्र कॅन आणावे लागतात.

हजार रुपयांस ६००० लि. पाणी

सहा हजार लिटर पाण्याचा टँकर  सरासरी हजार रुपयांना मिळतो. प्रत्यक्षात टँकरमध्ये चार सहा हजार लिटर पाण्याचा टँकर हजार हजार लिटरच पाणी येते. विहिरींचे मालक उन्हाळ्यात पाणीविक्रीचा धंदा जोरात करतात.

तहान भागविण्यासाठी ग्रामपंचायतीची धडपड

बेडगमध्ये ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी प्रत्येक उन्हाळ्यात ग्रामपंचायतीची धडपड सुरु होते. गल्लोगल्ली टँकर सुरु केले जातात. गावाची मरगाई देवीची यात्रा ऐन उन्हाळ्यात मार्च- एप्रिलमध्ये येते, यात्रेतही टँकरची सोय करावी लागते. त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च होतो.

पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाहीनळाचे पाणी वेळेत येत : शिवाजी जाधव

नळाचे पाणी वेळेत येत नाही, त्यामुळे विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो. स्वच्छतेसाठी व जनावरांसाठी पाणी कसेबसे उपलब्ध होते, पण पिण्यासाठी वॉटर एटीएमचाच पर्याय आहे.दररोज जार लागतोच: सिद्धेश्वर पाटील

पाण्यासाठी दररोज एक- दोन जार आणावे लागतात. त्यासाठी महिन्याला आमच्या कुटुंबाला हजारभर रुपयांचा खर्च करावा लागतो.

पर्यायी व्यवस्था अपुरीच: विष्णू पाटी

ग्रामपंचायत पाण्याची पर्यायी व्यवस्था करते, पण ती अपुरी ठरते. पाणीयोजना राबविल्याविना टंचाईचा हा प्रश्न कायमचा मिटणार नाही. त्यादृष्टीने प्रयल हवेत.

जिल्ह्यातून एकाही केली नाही. मागणी आल्यास गावाने टँकरची मागणी निर्णय घेतला जातो. प्रथम शासकीय टँकरने पाणी दिले जाते. मागणी वाढल्यास ठेकेदारामार्फत टँकर सुरू केले जातात. सध्या कोठेही टँकरने पुरवठा सुरू नाही. - शीतल उपाध्ये, उपकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी