शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत टँकरमुक्ती नावाला, टंचाईचा गावाला; पूर्व भागास म्हैसाळ योजनेचाच आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:31 IST

जिल्हा टँकरमुक्त झाल्याने पाणीटंचाई कागदोपत्री संपली, प्रत्यक्षात अनेक गावांत टँकरची घरघर रात्रंदिवस सुरुच आहे. टँकरमुक्तीच्या नावाखाली प्रशासन टँकर देत नाही, परिणामी बेडगसारख्या गावात ग्रामपंचायतीला किंवा नेतेमंडळींना खिशातून पैसे घालून गावकऱ्यांची सोय करावी लागत आहे.

सांगली : जिल्हा टँकरमुक्त झाल्याने पाणीटंचाई कागदोपत्री संपली, प्रत्यक्षात अनेक गावांत टँकरची घरघर रात्रंदिवस सुरुच आहे. टँकरमुक्तीच्या नावाखाली प्रशासन टँकर देत नाही, परिणामी बेडगसारख्या गावात ग्रामपंचायतीला किंवा नेतेमंडळींना खिशातून पैसे घालून गावकऱ्यांची सोय करावी लागत आहे. बहुतांश गावांत स्वत:च्या पाणीयोजना आहेत. त्यासाठी विहीर, गावतलाव, कूपनलिका येथून पाणी घेतले जाते.उन्हाळ्यात पाणीसाठा आटल्याने ठरलेली असते. ग्रामपंचायतीकडून टँकरसाठी अर्ज जातात, पण एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर व शेवटी जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचेपर्यंत पावसाळा येतो. म्हैसाळ योजनेतून सध्या पाणी सोडले आहे, त्यामुळे विहीरी, कूपनलिकांची पाणीपातळी वाढून टंचाई काही प्रमाणात सुसह्य झाली आहे. घरगुती वापरासाठी व जनावरांसाठी या पाण्याचा वापर होतो. पिण्यासाठी मात्र गावातील वॉटर एटीएममधून कॅन न्यावे लागतात.

पिण्याच्या जारवर महिन्याला हजार खर्चवॉटर एटीएममध्ये वीस रुपयांना पिण्याच्या पाण्याचा जार मिळतो. एका कुटुंबाला महिन्याकाठी जारच्या माध्यमातून हजारभर रुपयांचा खर्च शुद्ध पाण्यासाठी करावा लागतो.

आठ दिवसांतून एकदा पाणी, नळ काय कामाचे?

सकस आहार विहिरीतून घरोघरी नळाद्वारे पाणी येते, पण त्याचे वेळापत्रक बेभरवशाचे आहे. आठवड्यातून एकदा काही वेळ पाणी सुटते. अशावेळी छोटी मोटर लावून पाणी खेचण्याची स्पर्धा सुरु होते. या स्पर्धेत गेल्यावर्षी एका तरुणाने विजेचा धक्का बसून जीवही गमावला.

नळ असूनही दररोज पाणी नाहीबेडगमध्ये गावाची स्वत:ची नळपाणी योजना आहे, पण ती संपूर्ण गावाची तहान भागवू शकत नाही. सकस आहार विहिरीमध्ये सध्या म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी सोडले आहे. तेथून नळाद्वारे घरोघरी पाणी सोडले जाते. त्याचा वापर स्वच्छतेसाठी व जनावरांसाठी केला जातो. पिण्यासाठी मात्र कॅन आणावे लागतात.

हजार रुपयांस ६००० लि. पाणी

सहा हजार लिटर पाण्याचा टँकर  सरासरी हजार रुपयांना मिळतो. प्रत्यक्षात टँकरमध्ये चार सहा हजार लिटर पाण्याचा टँकर हजार हजार लिटरच पाणी येते. विहिरींचे मालक उन्हाळ्यात पाणीविक्रीचा धंदा जोरात करतात.

तहान भागविण्यासाठी ग्रामपंचायतीची धडपड

बेडगमध्ये ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी प्रत्येक उन्हाळ्यात ग्रामपंचायतीची धडपड सुरु होते. गल्लोगल्ली टँकर सुरु केले जातात. गावाची मरगाई देवीची यात्रा ऐन उन्हाळ्यात मार्च- एप्रिलमध्ये येते, यात्रेतही टँकरची सोय करावी लागते. त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च होतो.

पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाहीनळाचे पाणी वेळेत येत : शिवाजी जाधव

नळाचे पाणी वेळेत येत नाही, त्यामुळे विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो. स्वच्छतेसाठी व जनावरांसाठी पाणी कसेबसे उपलब्ध होते, पण पिण्यासाठी वॉटर एटीएमचाच पर्याय आहे.दररोज जार लागतोच: सिद्धेश्वर पाटील

पाण्यासाठी दररोज एक- दोन जार आणावे लागतात. त्यासाठी महिन्याला आमच्या कुटुंबाला हजारभर रुपयांचा खर्च करावा लागतो.

पर्यायी व्यवस्था अपुरीच: विष्णू पाटी

ग्रामपंचायत पाण्याची पर्यायी व्यवस्था करते, पण ती अपुरी ठरते. पाणीयोजना राबविल्याविना टंचाईचा हा प्रश्न कायमचा मिटणार नाही. त्यादृष्टीने प्रयल हवेत.

जिल्ह्यातून एकाही केली नाही. मागणी आल्यास गावाने टँकरची मागणी निर्णय घेतला जातो. प्रथम शासकीय टँकरने पाणी दिले जाते. मागणी वाढल्यास ठेकेदारामार्फत टँकर सुरू केले जातात. सध्या कोठेही टँकरने पुरवठा सुरू नाही. - शीतल उपाध्ये, उपकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी