शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

कडेगावात तोडगा :- जलसमाधी आंदोलन आश्वासनानंतर स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:44 IST

अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. १५ आॅगस्टपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास २२ आॅगस्टरोजी पुन्हा जलसमाधी आंदोलन करणार आहे, असे आंदोलकांनी सांगितले.

ठळक मुद्दे१५ आॅगस्टपर्यंत मुदत, टेंभू योजनेच्या पाण्याची मागणी

कडेगाव : कडेगाव तलावाचा टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करावा तसेच टेंभूचे पाणी खंबाळे औंध येथून बंदिस्त पाईपलाईनद्वारे कडेगाव तलावात सोडावे, यासह अन्य मागण्यांसाठी येथील शेतकऱ्यांनी पुकारलेले जलसमाधी आंदोलन गुरुवारी आ. डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत तोडगा निघाल्याने मागे घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. १५ आॅगस्टपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास २२ आॅगस्टरोजी पुन्हा जलसमाधी आंदोलन करणार आहे, असे आंदोलकांनी सांगितले.

येथील सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांच्यासह पन्नास शेतकºयांचा गुरुवारी सकाळी १० वाजता नाथ मंदिर येथून कडेगाव तलावात जलसमाधी आंदोलन करण्यासाठी मोर्चा निघाला. शहरातील मुख्य रस्त्याने मोर्चा जुने बसस्थानक परिसरात आला असता आ. डॉ. कदम तसेच आंदोलक व प्रशासकीय अधिकारी यांच्यात चर्चा झाली. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, नगराध्यक्षा नीता देसाई, तहसीलदार अर्चना शेटे, टेंभू योजनेचे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे, नितीश सुतार, एस. एम. पाटील उपस्थित होते. पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी आंदोलन रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज केली होती. घार्गे यांनी वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करून आंदोलकांच्या मागणीप्रमाणे कडेगाव तलावात योजनेचे पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदिस्त पाईपलाईनसाठीचा प्रस्ताव तातडीने पाठवणार असल्याचे सांगितले.

आ. डॉ. कदम म्हणाले, कडेगावच्या पाणीप्रश्नाबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली आहे. शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनात उतरणार आहे.

यावर देशमुख यांच्यासह आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले व मागण्यांच्या पूर्ततेसाठी १५ आॅगस्टची अंतिम मुदत दिली. पाणीप्रश्नाबाबत अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, तसेच कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्या उपास्थितीत बैठक घेणार असल्याचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले . डी. एस. देशमुख, युनुस पटेल, आनंदराव रास्कर, सुनील मोहिते, मुकुंद कुलकर्णी, संजय तडसरे, महावीर माळी, जीवन करकटे, विजय शिंदे, सुनील गाढवे, अशोक शेटे, विक्रम शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली.जबाबदार अधिकाºयांचा बेजबाबदारपणापन्नास शेतकºयांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला असताना, आंदोलनस्थळी सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले व टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीय्यार अनुपस्थित होते. हा संवेदनशील विषय असतानाही जबाबदार अधिकारी मात्र बेजबाबदारपणे वागतात, याबाबत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. 

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप