शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पाण्याचे व्यवस्थापन आणि हिशोब गरजेचा : ऋषिराज गोसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 10:43 IST

environment water scarcity Sangli : पाण्याचे व्यवस्थापन आणि पाण्याचा हिशोब ठेवणे आवश्यक आहे. पाण्याच्या शाश्वत विकासासाठी भूजल साक्षरतेच्या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या तरुणाईने कार्यरत राहण्याची गरज आहे. पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर अनर्थ अटळ आहे. विशेषतः भूजल पातळीत घट होणे सर्वच अर्थाने हानिकारक आहे. त्यादृष्टीने काळजी घ्यावी लागेल, असे मत वरिष्ठ भूजल वैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपाण्याचे व्यवस्थापन आणि हिशोब गरजेचा : ऋषिराज गोसकीभूजल साक्षरता या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचे उद्घाटन

सांगली : पाण्याचे व्यवस्थापन आणि पाण्याचा हिशोब ठेवणे आवश्यक आहे. पाण्याच्या शाश्वत विकासासाठी भूजल साक्षरतेच्या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या तरुणाईने कार्यरत राहण्याची गरज आहे. पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर अनर्थ अटळ आहे. विशेषतः भूजल पातळीत घट होणे सर्वच अर्थाने हानिकारक आहे. त्यादृष्टीने काळजी घ्यावी लागेल, असे मत वरिष्ठ भूजल वैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी व्यक्त केले.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय भूगोल विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भूजल साक्षरता या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचे उद्घाटन वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते.भूजल साक्षरता काळाची गरज या विषयावर बोलताना ऋषिराज गोसकी म्हणाले, पाण्याचे व्यवस्थापन आणि पाण्याचा हिशोब आपण ठेवत नाही हीच खरी मोठी अडचण आहे. पाण्याच्या बाबतीत आपण आपण गांभीर्याने विचार करीत नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भूजल सर्वेक्षण व साक्षरतेच्या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेची तरुणाई खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे हे नक्कीच आशादायी चित्र आहे. सर्वांनीच पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर फार मोठ्या अनर्थाला तोंड द्यावे लागणार आहे.प्राचार्य. डॉ. डी. जी. कणसे म्हणाले, मानवी जीवन हे नैसर्गिक साधनसामुग्रीवर अवलंबून आहे याचा आपणास विसर पडू लागल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषतः इथून पुढच्या काळात भुजलचा प्रश्न गांभीर्याने सोडविला पाहिजे. त्यासाठी देशातील तरुणाई व ग्रामस्थ यांनी अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. त्याशिवाय खऱ्या अर्थाने शाश्वत विकास होणार नाही.उपस्थितांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विकास आवळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रूपाली कांबळे यांनी केले. आभार डॉ. नितीन गायकवाड यांनी मानले.कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, भूगोल विषयाचे प्राध्यापक, महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमूख प्रा. डॉ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमूख प्रा. तानाजी सावंत व्यवसायिक विभाग प्रमूख डॉ. आनंदा सपकाळ, कनिष्ठ विभागाचे प्रमूख प्रा.ए.एल. जाधव त्याचबरोबर विविध शाखांचे विभाग प्रमुख, सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. 

टॅग्स :environmentपर्यावरणSangliसांगलीwater scarcityपाणी टंचाई