शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
4
ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
5
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
6
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
7
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
8
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
10
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
11
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
12
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
13
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
14
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
15
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
16
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
17
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
18
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
19
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
20
Shivraj Patil Death: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णाकाठी वारणा नदीचे पाणी की चांदोली धरणाचे?; सांगलीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार की पुन्हा रेंगाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:53 IST

सत्तेच्या खेळात कधीही सांगलीचा पाणीप्रश्न सुटला नाही

सांगली : कृष्णाकाठी वसलेल्या सांगली शहराला शुद्ध व बारमाही मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या वारणा नदीचे पाणी आणण्याची चर्चा वारंवार होते. २००५ मध्ये ही योजना मंजूर केली. मात्र, काही वर्षांतच ही योजना रद्द झाली. आता पुन्हा याच योजनेसाठी सर्वेक्षण सुरू असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी चांदोली धरणातून पाण्याची योजना देण्याची मागणी केली आहे. कृष्णेप्रमाणे वारणाही प्रदूषित झाल्याने चांदोलीचा हा पर्याय ठेवण्यात आला आहे.सत्तेच्या खेळात कधीही सांगलीचा पाणीप्रश्न सुटला नाही. नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या शेरीनाल्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. २००५ मध्ये दिवंगत काँग्रेस नेते व तत्कालीन आमदार मदन पाटील यांच्या प्रयत्नातून वारणा उद्भव योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी त्यास मंजुरी दिली.टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात पाणी कमी राहणार म्हणून वारणा नदीपात्रातून पाणी उचलायचे नियोजन करण्यात आले होते. या योजनेचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते. २००८ मध्ये मदन पाटील यांची सत्ता जाऊन जयंत पाटील यांची महाविकास आघाडी महापालिकेत आली. त्यांनी ही योजना रद्द करून पाणी वितरण व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय घेतला.नवीन टाक्या व ७० एम.एल.डी. प्रकल्प करण्यात आला. आता पुन्हा वारणेतून पाणी उचलण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्याचवेळी नागरिक जागृती मंचने वारणेपेक्षा चांदोली धरणातून सांगलीला पाणी देण्याची मागणी केली आहे.

नवा प्रस्ताव ३०० कोटींचाएका खासगी कंपनीने वारणा योजनेसाठी सर्वेक्षण सुरू केले असून सुमारे ३०० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव असेल, असा अंदाज आहे.

काय आहे नवी मागणी ?कोल्हापूर, सोलापूरसह राज्यातील अनेक मोठ्या शहरांना धरणातून थेट पाइपलाइन टाकून पाणी दिले आहे. त्याप्रमाणे सांगलीलाही चांदोली धरणातून थेट पाइपलाइनने पाणी द्यावे, अशी मागणी नागरिक जागृती मंचने केली आहे.

कृष्णा नदी प्रदूषित आहे म्हणून वारणेतून पाणी आणायचा बेत आखला जात आहे; पण वारणा नदीही तितकीच प्रदूषित आहे. त्याठिकाणीही अनेक गावांत दरवर्षी नदीतील मासे मरतात. म्हैसाळला नदीत मोठा बंधारा बांधण्यात येणार आहे. त्याची फुग वारणा नदीपात्रातून खोची बंधारा व कसबे डिग्रज बंधाऱ्यापर्यंत येणार आहे. मग सांगली शहरातील शेरीनाला व अन्य ठिकाणचे सांडपाणी पात्रातच साचणार आहे. या सर्व बाबींचा विचार व अभ्यास करावा. चांदोली धरणातून पाणी देण्याचा विचारही व्हावा. - सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी