शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

कृष्णाकाठी वारणा नदीचे पाणी की चांदोली धरणाचे?; सांगलीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार की पुन्हा रेंगाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:53 IST

सत्तेच्या खेळात कधीही सांगलीचा पाणीप्रश्न सुटला नाही

सांगली : कृष्णाकाठी वसलेल्या सांगली शहराला शुद्ध व बारमाही मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या वारणा नदीचे पाणी आणण्याची चर्चा वारंवार होते. २००५ मध्ये ही योजना मंजूर केली. मात्र, काही वर्षांतच ही योजना रद्द झाली. आता पुन्हा याच योजनेसाठी सर्वेक्षण सुरू असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी चांदोली धरणातून पाण्याची योजना देण्याची मागणी केली आहे. कृष्णेप्रमाणे वारणाही प्रदूषित झाल्याने चांदोलीचा हा पर्याय ठेवण्यात आला आहे.सत्तेच्या खेळात कधीही सांगलीचा पाणीप्रश्न सुटला नाही. नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या शेरीनाल्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. २००५ मध्ये दिवंगत काँग्रेस नेते व तत्कालीन आमदार मदन पाटील यांच्या प्रयत्नातून वारणा उद्भव योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी त्यास मंजुरी दिली.टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात पाणी कमी राहणार म्हणून वारणा नदीपात्रातून पाणी उचलायचे नियोजन करण्यात आले होते. या योजनेचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते. २००८ मध्ये मदन पाटील यांची सत्ता जाऊन जयंत पाटील यांची महाविकास आघाडी महापालिकेत आली. त्यांनी ही योजना रद्द करून पाणी वितरण व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय घेतला.नवीन टाक्या व ७० एम.एल.डी. प्रकल्प करण्यात आला. आता पुन्हा वारणेतून पाणी उचलण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्याचवेळी नागरिक जागृती मंचने वारणेपेक्षा चांदोली धरणातून सांगलीला पाणी देण्याची मागणी केली आहे.

नवा प्रस्ताव ३०० कोटींचाएका खासगी कंपनीने वारणा योजनेसाठी सर्वेक्षण सुरू केले असून सुमारे ३०० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव असेल, असा अंदाज आहे.

काय आहे नवी मागणी ?कोल्हापूर, सोलापूरसह राज्यातील अनेक मोठ्या शहरांना धरणातून थेट पाइपलाइन टाकून पाणी दिले आहे. त्याप्रमाणे सांगलीलाही चांदोली धरणातून थेट पाइपलाइनने पाणी द्यावे, अशी मागणी नागरिक जागृती मंचने केली आहे.

कृष्णा नदी प्रदूषित आहे म्हणून वारणेतून पाणी आणायचा बेत आखला जात आहे; पण वारणा नदीही तितकीच प्रदूषित आहे. त्याठिकाणीही अनेक गावांत दरवर्षी नदीतील मासे मरतात. म्हैसाळला नदीत मोठा बंधारा बांधण्यात येणार आहे. त्याची फुग वारणा नदीपात्रातून खोची बंधारा व कसबे डिग्रज बंधाऱ्यापर्यंत येणार आहे. मग सांगली शहरातील शेरीनाला व अन्य ठिकाणचे सांडपाणी पात्रातच साचणार आहे. या सर्व बाबींचा विचार व अभ्यास करावा. चांदोली धरणातून पाणी देण्याचा विचारही व्हावा. - सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी