शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पाण्याचे संकट, होत चालले बिकट..!

By admin | Updated: March 21, 2017 23:40 IST

भूजल पातळीत घट : अवर्षणग्रस्तसह सधन तालुक्यात चिंताजनक स्थिती

शीतल पाटील ल्ल सांगलीजिल्ह्यात सुरू असलेला बेसुमार पाणी उपसा, पावसाचे कमी झालेले प्रमाण, जलसाक्षरतेबाबत उदासीनता, पाणी संवर्धनाबाबतची अनास्था अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील भूजल पाणी पातळी वेगाने घटत आहे. यंदा दुष्काळी कवठेमहांकाळ, आटपाडी, जत या तालुक्यांसह सधन असणाऱ्या मिरज, पलूस, वाळवा या तालुक्यातील भूजल पातळीत घट झाल्याची धक्कादायक बाब भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. ही निश्चित चिंतेची बाब असून, वेळीच उपाययोजना न केल्यास जिल्ह्याला पुन्हा दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ येईल. जिल्ह्यात वर्षाला सरासरी ५१० मिलिमीटर पावसाची नोंद होते. गतवर्षीही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अर्धा ते दीड मिलिमीटरची वाढ झाली होती. या काळातही पलूस व तासगाव या दोन तालुक्यातील भूजल पातळीत मात्र घट झाल्याचे दिसून येते. पलूस तालुक्यात पाच वर्षांच्या तुलनेत उणे १९, तर तासगावमध्ये उणे ७६ मीटर पाणीपातळी घटली. पावसानंतर भूजल सर्वेक्षण विभागाने घेतलेली ही आकडेवारी चिंताजनक होती. भूजल सर्वेक्षणकडून जिल्ह्यातील ८४ निरीक्षण विहिरींचा अभ्यास करून भूजल पातळीचा आलेख तयार केला आहे. वर्षातून आॅक्टोबर, जानेवारी, मार्च व मे या चार महिन्यांत या विभागाकडून भूजल पातळी घेतली जाते. या अहवालावरच टंचाईग्रस्त गावांची निश्चिती केली जाते. आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात सरासरी पाणीपातळीत वाढ दिसत असली, तरी तासगाव, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील काही गावातील पाणीपातळीत सर्वाधिक घट झाली आहे. आॅक्टोबर महिन्यापेक्षा जानेवारी महिन्यातील आकडेवारी पाहता पाणीपातळीची स्थिती खालावल्याचे दिसून येते. जानेवारीत आटपाडी तालुक्यात ०.१४, जतला १.०२, कवठेमहांकाळला २.०८, कडेगावमध्ये १.८३, खानापुरात १.२५, मिरज ०.८७, पलूस ०. ६६, शिराळा ०. ७३, तासगाव ०. ६३ आणि वाळवा तालुक्यात ०.९८ मीटरने पाणीपातळीत घट झाली आहे. पावसाने अथवा पाणी स्रोतांच्या माध्यमातून मुरलेल्या पाण्यापेक्षा जादा पाण्याचा वापर झाल्यानेच तालुक्यातील पाणी पातळीत घट नोंदविली आहे. वाळवा तालुक्यातील उसाचे क्षेत्र आणि त्यासाठीच्या पाणी वापरामुळेही तालुक्यावर ही परिस्थिती ओढविल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जानेवारीच्या सरासरी पाणीपातळीत आटपाडी तालुक्याच्या सरासरीत कमी घट झाली असली तरी, खरसुंडी, उंबरगाव, पांढरेवाडी या परिसरात ४ ते ५ मीटरपेक्षा जास्त पाणीपातळीत घट झाली आहे. जत तालुक्यातील बागेवाडी, जाडरबोबलाद, उटगी या परिसरातही २ ते ४ मीटरने घट झाली आहे. सर्वाधिक घट कवठेमहांकाळ तालुक्यात नोंदविली गेली असून, ती दोन मीटरपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात अतिशोषित भागाचा जादा समावेश आहे. पाच वर्षांतील मूल्यांकनावरून कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज आणि जत तालुक्यातील २० गावे अतिशोषित आहेत. पाण्याची उपलब्धता लक्षात न घेताच बेसुमार उपसा केल्यानेच भूजल पातळी चिंताजनक बनली आहे. काय कराव्यात उपाय योजना...दरवर्षी शासनाकडून जलयुक्त शिवार, राष्ट्रीय पेयजल योजनेतून पुनर्भरणाची कामे होतात; पण जनतेचा सहभाग वाढला नसल्याने अद्याप अपेक्षित परिणाम समोर आलेले नाहीत. शासनाने भूजल अधिनियम २००९ कायदा केला आहे. त्यातून ६० मीटरपेक्षा अधिक खोलीवर कूपनलिका खोदता येत नाहीत. बोअरवेलच्या गाड्यांची नोंदणी सक्तीची आहे; पण लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे या कायद्याची अंमलबजावणीही होताना दिसत नाही. विहिरींचे पुनर्भरण करणे, पावसाचे पाणी अडविणे, शोषखड्डे तयार करणे अशाप्रकारे पाण्याच्या थेंबा-थेंबाचे नियोजन करणे आवश्यक आहे, तरच भूगर्भाची पातळी वाढेल. अन्यथा भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.