शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे संकट, होत चालले बिकट..!

By admin | Updated: March 21, 2017 23:40 IST

भूजल पातळीत घट : अवर्षणग्रस्तसह सधन तालुक्यात चिंताजनक स्थिती

शीतल पाटील ल्ल सांगलीजिल्ह्यात सुरू असलेला बेसुमार पाणी उपसा, पावसाचे कमी झालेले प्रमाण, जलसाक्षरतेबाबत उदासीनता, पाणी संवर्धनाबाबतची अनास्था अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील भूजल पाणी पातळी वेगाने घटत आहे. यंदा दुष्काळी कवठेमहांकाळ, आटपाडी, जत या तालुक्यांसह सधन असणाऱ्या मिरज, पलूस, वाळवा या तालुक्यातील भूजल पातळीत घट झाल्याची धक्कादायक बाब भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. ही निश्चित चिंतेची बाब असून, वेळीच उपाययोजना न केल्यास जिल्ह्याला पुन्हा दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ येईल. जिल्ह्यात वर्षाला सरासरी ५१० मिलिमीटर पावसाची नोंद होते. गतवर्षीही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अर्धा ते दीड मिलिमीटरची वाढ झाली होती. या काळातही पलूस व तासगाव या दोन तालुक्यातील भूजल पातळीत मात्र घट झाल्याचे दिसून येते. पलूस तालुक्यात पाच वर्षांच्या तुलनेत उणे १९, तर तासगावमध्ये उणे ७६ मीटर पाणीपातळी घटली. पावसानंतर भूजल सर्वेक्षण विभागाने घेतलेली ही आकडेवारी चिंताजनक होती. भूजल सर्वेक्षणकडून जिल्ह्यातील ८४ निरीक्षण विहिरींचा अभ्यास करून भूजल पातळीचा आलेख तयार केला आहे. वर्षातून आॅक्टोबर, जानेवारी, मार्च व मे या चार महिन्यांत या विभागाकडून भूजल पातळी घेतली जाते. या अहवालावरच टंचाईग्रस्त गावांची निश्चिती केली जाते. आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात सरासरी पाणीपातळीत वाढ दिसत असली, तरी तासगाव, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील काही गावातील पाणीपातळीत सर्वाधिक घट झाली आहे. आॅक्टोबर महिन्यापेक्षा जानेवारी महिन्यातील आकडेवारी पाहता पाणीपातळीची स्थिती खालावल्याचे दिसून येते. जानेवारीत आटपाडी तालुक्यात ०.१४, जतला १.०२, कवठेमहांकाळला २.०८, कडेगावमध्ये १.८३, खानापुरात १.२५, मिरज ०.८७, पलूस ०. ६६, शिराळा ०. ७३, तासगाव ०. ६३ आणि वाळवा तालुक्यात ०.९८ मीटरने पाणीपातळीत घट झाली आहे. पावसाने अथवा पाणी स्रोतांच्या माध्यमातून मुरलेल्या पाण्यापेक्षा जादा पाण्याचा वापर झाल्यानेच तालुक्यातील पाणी पातळीत घट नोंदविली आहे. वाळवा तालुक्यातील उसाचे क्षेत्र आणि त्यासाठीच्या पाणी वापरामुळेही तालुक्यावर ही परिस्थिती ओढविल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जानेवारीच्या सरासरी पाणीपातळीत आटपाडी तालुक्याच्या सरासरीत कमी घट झाली असली तरी, खरसुंडी, उंबरगाव, पांढरेवाडी या परिसरात ४ ते ५ मीटरपेक्षा जास्त पाणीपातळीत घट झाली आहे. जत तालुक्यातील बागेवाडी, जाडरबोबलाद, उटगी या परिसरातही २ ते ४ मीटरने घट झाली आहे. सर्वाधिक घट कवठेमहांकाळ तालुक्यात नोंदविली गेली असून, ती दोन मीटरपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात अतिशोषित भागाचा जादा समावेश आहे. पाच वर्षांतील मूल्यांकनावरून कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज आणि जत तालुक्यातील २० गावे अतिशोषित आहेत. पाण्याची उपलब्धता लक्षात न घेताच बेसुमार उपसा केल्यानेच भूजल पातळी चिंताजनक बनली आहे. काय कराव्यात उपाय योजना...दरवर्षी शासनाकडून जलयुक्त शिवार, राष्ट्रीय पेयजल योजनेतून पुनर्भरणाची कामे होतात; पण जनतेचा सहभाग वाढला नसल्याने अद्याप अपेक्षित परिणाम समोर आलेले नाहीत. शासनाने भूजल अधिनियम २००९ कायदा केला आहे. त्यातून ६० मीटरपेक्षा अधिक खोलीवर कूपनलिका खोदता येत नाहीत. बोअरवेलच्या गाड्यांची नोंदणी सक्तीची आहे; पण लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे या कायद्याची अंमलबजावणीही होताना दिसत नाही. विहिरींचे पुनर्भरण करणे, पावसाचे पाणी अडविणे, शोषखड्डे तयार करणे अशाप्रकारे पाण्याच्या थेंबा-थेंबाचे नियोजन करणे आवश्यक आहे, तरच भूगर्भाची पातळी वाढेल. अन्यथा भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.