शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सांगली जिल्ह्यात २४८ गावांतील पाणी दूषित, नेमकी गावं कोणती...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 19:03 IST

सांगली : जिल्हा परिषद पाणीपुरवठा स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी शाळेसह गावांतील पाण्याचे पाच हजार २७६ नमुने घेतले होते. ...

सांगली : जिल्हा परिषद पाणीपुरवठा स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी शाळेसह गावांतील पाण्याचे पाच हजार २७६ नमुने घेतले होते. यापैकी २४८ गावांतील ३२७ पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. या गावातील शाळा, अंगणवाड्यांसह ग्रामपंचायतीला दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.आटपाडी तालुक्यातील करगणी, दिघंची, गोमेवाडी, शेटफळे, करगणीसह १३ गावांमधील १४ पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. जत तालुक्यातील संख, येळवी, माडग्याळ, उमदी, निगडी खुर्दसह १८ गावांमधील २० पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एस, बस्साप्पावाडी, कोकळे, कुकटोळी, मोरगाव या पाच गावांतील पाच नमुने दूषित, तर मिरज तालुक्यातील मालगाव, एरंडोली, खंडेराजुरी, सलगरे, कसबेडिग्रज, विजयनगर, कवठेपिरान, कवलापूर, भोसे, बुधगाव आदी ३९ गावांतील ६८ नमुने दूषित आले आहेत. तासगाव तालुक्यातील मांजर्डे, आरवडे, बस्तवडे, सावळज, वायफळे, जरंडी आदी १६ गावांतील पाण्याचे २४ नमुने दूषित आल्याने संबंधित ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी सेविकांना पाणी शुद्धीकरणाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाळवा, शिराळा, खानापूर, कडेगाव तालुक्यातीही पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. या गावामधील शाळा, अंगणवाडीसह ग्रामपंचायतींना दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानस्वच्छ पाण्याबाबत नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. दि. १ डिसेंबर २०२२ ते दि. २५ जानेवारी २०२३ या कालावधीत हे अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे आणि अंगणवाडी, शाळा, आश्रमशाळा, कॉलेज, हायस्कूल व सर्व शासकीय कार्यालयांतील पिण्यासाठी वापरात असणाऱ्या पाण्याचे पाणी नमुने तपासण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी