चांदाेली डाव्या कालव्याचे पाणी आरळ्याच्या बसस्थानकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:23+5:302020-12-05T05:09:23+5:30
वारणावती : चांदोली धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. कालव्यांच्या गळतीमुळे आरळा स्टँड परिसरात ...

चांदाेली डाव्या कालव्याचे पाणी आरळ्याच्या बसस्थानकात
वारणावती : चांदोली धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. कालव्यांच्या गळतीमुळे आरळा स्टँड परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. पाणीच पाणी सगळीकडे, गेला कालवा कुणीकडे? अशी स्थिती पाहावयास मिळत आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या शेतीसाठी धरणाच्या कालव्यातून तीनशे क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडले जात आहे. पण कालव्यातून झिरपणारे पाणी कालव्याखालील शिवारात साठून शेती नापिक होत आहे. शेतकऱ्यांना पिकांची मशागत करता येत नाही. काही ठिकाणी शिवार पिकाविना पडून आहे. असे चित्र असतानाच, आता कालव्यातून झिरपणारे पाणी आरळा येथील गटारीतून चक्क आरळा स्टँड परिसरात रस्त्यावर येत आहे. पावसाळ्यात पाहायला मिळाले नाही इतके पाणी रस्त्यावर आहे. वाहनांमुळे रस्त्याकडेने पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडत आहे; तर रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे परिसरातील लोकांचे, व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याकडे धरणाच्या कालवा विभागाच्या प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कालव्यातून झिरपणारे पाणी रस्त्यावर येते. त्याचा बंदोबस्त करण्याची लोकांची मागणी आहे.
फोटो :
ओळ : चांदोली धरणाच्या कालव्याचे पाणी आरळा स्टँड परिसरातील रस्त्यावर असे वाहत आहे.