शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

पाण्याअभावी ३००० एकर डाळिंबबागा जतमध्ये वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:09 IST

भीषण दुष्काळी परिस्थितीने जत तालुक्यातील ३००० एकर क्षेत्रातील डाळिंब बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. बागा काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला

संख : भीषण दुष्काळी परिस्थितीने जत तालुक्यातील ३००० एकर क्षेत्रातील डाळिंब बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. बागा काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही.                       

अनुकूल हवामान, कमी पाण्यात व खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे डाळिंब पीक आहे. ठिबक सिंचन, शेततलाव, कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. गणेश, केशर, भगवा वाणाच्या बागा आहेत. बाजारात भाव चांगला मिळत असल्यामुळे केशर जातीच्या बागांचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. दरीबडची, उमदी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, आसंगी (जत), दरीकोणूर, वाळेखिंडी, काशिलिंगवाडी या परिसरात डाळिंब क्षेत्र अधिक आहे.

 तालुक्यात २६ पाटबंधारे व साठवण तलाव, २ मध्यम प्रकल्प आहेत. अनेक शेतकºयांनी तलावातून तसेच तलावाशेजारी ओढ्यालगत विहीर खोदून पाईपलाईन करून  पाणी आणले. मात्र यावर्षी ४८.३ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे १६ तलाव कोरडे पडले आहेत, तर संख, दोड्डनाला मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी मृत संचयाखाली गेली आहे. 

पश्चिम भागातील तलावांना म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. सध्या तलावातील पाणीसाठा ६ टक्के शिल्लक आहे. हा साठा ३१४.४६ द.घ.ल.फू आहे. पूर्व भागातील अंकलगी तलाव वगळता सर्व तलाव चार महिन्यांपूर्वीच कोरडे पडलेले आहेत. पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटापर्यंत गेली आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. 

जानेवारीपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. डाळिंब बागांना गेल्या तीन महिन्यांपासून पाणी मिळालेले नाही. त्यामुळे बागा पूर्णपणे वाळून गेल्याने फक्त सांगाडेच राहिले आहेत. परिणामी बागायतदारांसमोर बागा काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी